ETV Bharat / state

दुष्काळ दौरा; अधिकाऱ्यांनी 'दांडी' मारल्याने पालकमंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली नाराजी..

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे वास्तव यावेळी मंत्र्यांसमोर आले. महाजन यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

author img

By

Published : May 6, 2019, 2:27 PM IST

Updated : May 6, 2019, 5:22 PM IST

पालकमंत्री गिरीश महाजन

नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे वास्तव यावेळी मंत्र्यांसमोर आले. महाजन यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पांगरी गावातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाला पालकमंत्री गिरीश महाजन यांना सामोरे जावे लागले. चारा आणि पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुष्काळ दौऱ्याला अधिकारी येत नसल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री गिरीश महाजन


आचारसंहितेच्या नावाखाली अधिकारी जास्त बाऊ करत असल्याचा आरोप देखील महाजन यांनी केला. या संदर्भात निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करून दुष्काळ दौर्‍यात अधिकाऱ्यांना हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.


आज सिन्नर तालुक्याचा दौरा केला आहे. मात्र या दौऱ्याला प्रांत तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना सूचना देणे कठीण जात आहे. दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना थेट सूचना करता येत नसल्याची माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.


महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आहेत. चारा आणि पाणी दिल्याने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर काही फरक पडेल असे मला वाटत नाही, असेही महाजन यांनी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याचे सांगत आचार संहिता शिथिल करण्याचे सांगितले. मात्र दोन दिवसानंतर फक्त पाण्यासंदर्भात अधिकारी निर्णय घेतील असे उत्तर निवडणूक आयोगाकडून आल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत देणे अवघड होत असून, दुष्काळी भागातील जनतेच्या असंतोषाला देखील सामोरे जावे लागत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.

नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे वास्तव यावेळी मंत्र्यांसमोर आले. महाजन यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पांगरी गावातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाला पालकमंत्री गिरीश महाजन यांना सामोरे जावे लागले. चारा आणि पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुष्काळ दौऱ्याला अधिकारी येत नसल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री गिरीश महाजन


आचारसंहितेच्या नावाखाली अधिकारी जास्त बाऊ करत असल्याचा आरोप देखील महाजन यांनी केला. या संदर्भात निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करून दुष्काळ दौर्‍यात अधिकाऱ्यांना हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.


आज सिन्नर तालुक्याचा दौरा केला आहे. मात्र या दौऱ्याला प्रांत तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना सूचना देणे कठीण जात आहे. दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना थेट सूचना करता येत नसल्याची माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.


महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आहेत. चारा आणि पाणी दिल्याने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर काही फरक पडेल असे मला वाटत नाही, असेही महाजन यांनी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याचे सांगत आचार संहिता शिथिल करण्याचे सांगितले. मात्र दोन दिवसानंतर फक्त पाण्यासंदर्भात अधिकारी निर्णय घेतील असे उत्तर निवडणूक आयोगाकडून आल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत देणे अवघड होत असून, दुष्काळी भागातील जनतेच्या असंतोषाला देखील सामोरे जावे लागत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.

Intro:आचार संहितेच्या नावाखाली अधिकारी जास्त बाऊ करत आहे- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन


दुष्काळ दौऱ्याला अधिकारी नसल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली नाराजी..


Body:लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली,नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळ वास्तव्य यावेळी मंत्र्यांसमोर आलं,यावेळी महाजन यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या,यावेळी पांगरी गावातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाला पालकमंत्री गिरीश महाजन यांना सामोरं जावं लागलं, चारा आणि पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात, दुष्काळ दौऱ्याला अधिकारी येत नसल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली,
आचारसंहितेच्या नावाखाली अधिकारी जास्तचं बाऊ करत असल्याचा आरोप देखील महाजन यांनी केला.. या संदर्भात निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करून दुष्काळ दौर्‍यात अधिकाऱ्यांना हजर राहण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी गिरीश महाजन यांनी केले आहे..


गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितलं आज मी आज सिन्नर तालुक्याचा दौरा केला आहे, मात्र या दौऱ्याला प्रांत तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना सूचना देणं कठीण जातं आहे...दुष्काळा मुळे चारा आणि पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना थेट सूचना करणे करता येत नाहीये,
महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आहेत चारा आणि पाणी दिल्याने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर काही फरक पडेल असे मला वाटत नाही असेही महाजन यांनी बोलताना सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्रा द्वारे महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याचं सांगत आचार संहिता शिथिल करा असं सांगितलं.
मात्र दोन दिवसानंतर फक्त पाण्यासंदर्भात अधिकारी निर्णय घेतील असं उत्तर निवडणूक आयोगाकडून आल्याचे महाजन यांनी सांगितलं...त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत देणे अवघड होत असून, दुष्काळ भागातील जनतेच्या असंतोषाला देखील सामोरे जावे लागत असल्याचेही महाजन यांनी म्हटलं आहे..
बाईट गिरीश महाजन..
nsk girish mahajan on dushkal viu 1
nsk girish mahajan on dushkal viu 2
nsk girish mahajan on dushkal viu 3
nsk girish mahajan on dushkal byte.



Conclusion:
Last Updated : May 6, 2019, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.