ETV Bharat / state

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू, वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

author img

By

Published : Dec 2, 2019, 2:00 AM IST

Updated : Dec 2, 2019, 5:41 AM IST

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मनमाडमधील वंजारवाडी येथे घडली. कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता भाऊसाहेब जाधव (वय ३३ वर्ष) यांना ११ हजार व्होल्टेज विजेच्या तारेचा जबर धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Bhausaheb Jadhav
मृतक भाऊसाहेब जाधव

नाशिक - वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मनमाडमधील वंजारवाडी येथे घडली. कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता भाऊसाहेब जाधव (वय ३३ वर्ष) यांना ११ हजार व्होल्टेज विजेच्या तारेचा जबर धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी - फडणवीस

शेतातून जाणारा वीज तारांचा खांब पडल्याची तक्रार जाधव कुटुंबीयांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानेच भाऊसाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा - कन्नड तालुक्यातील बळीराजा नैसर्गिक आघात विसरून पुन्हा लागला जोमाने कामाला

या घटनेमुळे मनमाडमधील नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भाऊसाहेबांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाईसह कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा - कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना

भाऊसाहेब जाधव ३३ वर्षांचे होते. त्यांच्यावर पत्नी, लहान मुलगा आणि आई-वडिलांची जबाबदारी होती. या कुटुंबाच्या उदर्निवाहासह मुलांच्या शिक्षणासाठी वीज वितरण कंपनीने आर्थिक साहाय्य करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नाशिक - वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मनमाडमधील वंजारवाडी येथे घडली. कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता भाऊसाहेब जाधव (वय ३३ वर्ष) यांना ११ हजार व्होल्टेज विजेच्या तारेचा जबर धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी - फडणवीस

शेतातून जाणारा वीज तारांचा खांब पडल्याची तक्रार जाधव कुटुंबीयांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानेच भाऊसाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा - कन्नड तालुक्यातील बळीराजा नैसर्गिक आघात विसरून पुन्हा लागला जोमाने कामाला

या घटनेमुळे मनमाडमधील नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भाऊसाहेबांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाईसह कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा - कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना

भाऊसाहेब जाधव ३३ वर्षांचे होते. त्यांच्यावर पत्नी, लहान मुलगा आणि आई-वडिलांची जबाबदारी होती. या कुटुंबाच्या उदर्निवाहासह मुलांच्या शिक्षणासाठी वीज वितरण कंपनीने आर्थिक साहाय्य करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Intro:-वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा भोंगळा कारभार आणि हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मनमाड पासून जवळ असलेल्या वंजारवाडी येथे घडली असून भाऊसाहेब जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी हा शेतकरी शेतात गेला असता शेतातून गेलेल्या ११ हजार वोल्टेज असलेल्या विजेच्या तारेचा त्याला जबर धक्का लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.शेतातून जाणाऱ्या वीज तारांचा खांब पडल्याची तक्रारी करून देखील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून भाऊसाहेबच्या मृत्यूला वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे .
  Body:   या घटनेमुळे समस्त ग्रामस्था सोबत मनमाड शहरातील नागरिकांमध्ये देखील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्या बाबत तीव्र असंतोष निर्माण झाला असून भाऊसाहेब याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्या बरोबरच त्याच्या कुटुंबियाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला असला तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.मुळात तो खांब गेल्या दोन महिण्यापासून पडलेला आहे याबाबत तक्रारही केली होती मात्र विज वितरण कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे हा अपघात होऊन भाऊसाहेबचा मृत्यु झाला आहे.Conclusion:भाऊसाहेब अवघा 33 वर्षांचा होता त्याच्यावर पत्नी लहान मुलगा व आई वडील यांची जबाबदारी होती आता कमीतकमी विज वितरण कंपनीने जास्तीत जास्त मदत करून त्याच्या मुलाचे शिक्षण व्यवस्थित होईल तसेच त्याच्या परिवाराला आधार मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
Last Updated : Dec 2, 2019, 5:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.