ETV Bharat / state

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील'

author img

By

Published : Oct 5, 2019, 7:24 PM IST

युतीच्या जागा वाटपात आरपीआय ला 10 जागांची अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रात देखील पक्षाला एकही जागा मिळलेली नाही. यावर आपण नाराज असल्याचे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे सरकार आल्यावर कॅबिनेट मंत्रीपद आणि महामंडळात जागा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आठवले यांनी यवेळी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

नाशिक - 'पुन्हा एकदा राज्यात युतीची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील' असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. केंद्र सरकारला बहुमत मिळाल्यानंतर जम्मू-कश्मीर येथील 370 कलम हटवण्यात आले. या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांचादेखील विरोध होता. ह्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील निवडणुकीत युती सरकारला होणार असून युतीला 240 ते 250 जागा मिळतील असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

युतीच्या जागा वाटपात आरपीआयला 10 जागांची अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रदेखील पक्षाला एकही जागा मिळलेली नाही. यावर आपण नाराज असल्याचे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे सरकार आल्यावर कॅबिनेट मंत्रीपद आणि महामंडळात जागा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आठवले यांनी यवेळी स्पष्ट केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना मिळाला नाही तेवढा वाटा आता आम्हाला युतीत राहून मिळतोय असेही आठवले म्हणाले.

हेही वाचा - येवल्यातून शक्तीप्रदर्शन करत छगन भुजबळांचा उमेदवारी अर्ज दाखल

येत्या निवडणुकीत आरपीआय मित्रपक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. बंडखोरांनी पक्षाचे काम करावे. आता संधी मिळाली नाही, तरी नंतर नक्कीच मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आरेच्या वृक्षतोडीबद्दल बोलताना ते म्हणाले, जंगल तोडू नये असे माझे मत आहे. मात्र, जेवढी झाडे तोडली त्यापेक्षा जास्त झाडे लावली जातील. डेव्हलपमेंटच्या वेळी लोकांनी विरोध करू नये.

नाशिक - 'पुन्हा एकदा राज्यात युतीची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील' असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. केंद्र सरकारला बहुमत मिळाल्यानंतर जम्मू-कश्मीर येथील 370 कलम हटवण्यात आले. या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांचादेखील विरोध होता. ह्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील निवडणुकीत युती सरकारला होणार असून युतीला 240 ते 250 जागा मिळतील असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

युतीच्या जागा वाटपात आरपीआयला 10 जागांची अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रदेखील पक्षाला एकही जागा मिळलेली नाही. यावर आपण नाराज असल्याचे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे सरकार आल्यावर कॅबिनेट मंत्रीपद आणि महामंडळात जागा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आठवले यांनी यवेळी स्पष्ट केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना मिळाला नाही तेवढा वाटा आता आम्हाला युतीत राहून मिळतोय असेही आठवले म्हणाले.

हेही वाचा - येवल्यातून शक्तीप्रदर्शन करत छगन भुजबळांचा उमेदवारी अर्ज दाखल

येत्या निवडणुकीत आरपीआय मित्रपक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. बंडखोरांनी पक्षाचे काम करावे. आता संधी मिळाली नाही, तरी नंतर नक्कीच मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आरेच्या वृक्षतोडीबद्दल बोलताना ते म्हणाले, जंगल तोडू नये असे माझे मत आहे. मात्र, जेवढी झाडे तोडली त्यापेक्षा जास्त झाडे लावली जातील. डेव्हलपमेंटच्या वेळी लोकांनी विरोध करू नये.

Intro:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील-रामदास आठवले


Body:पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं, नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते...

केंद्र सरकारला बहुमत मिळाल्यानंतर जम्मू -कश्मीर येथील 370 कलम हटवण्यात आलं,ह्या कलमाला बाळासाहेब आंबेडकर यांचा देखील विरोध होता,त्यामुळे ह्या चांगल्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील निवडणूकित युती सरकार ला होणार असून,मागील पाच वर्षात फडणवीस सरकारने देखील चागंले काम केले असून येत्या निवडणूकित युतीला 240 ते 250 जागा मिळतील असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे..

युतीच्या जागा वाटपात आरपीआय ला 10 जागा मिळायला हव्या होत्या,तसेच उत्तर महाराष्ट्र देखील एकही जागा आम्हाला मिळली नसून आम्ही नाराज असून,युतीचे सरकार आल्यावर आम्हाला कॅबिनेट मंत्री तसेच महामंडळात जागा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.कॉग्रेस राष्ट्रवादी असतांना मिळाला नाही तेवढा वाटा आता आम्हाला युतीत राहून मिळाला आहे..निवडणूकित आरपीआय मित्रपक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून त्याचा फायदा नक्कीच आम्हाला मिळणार आहे असं आठवले म्हणालेत..बंडखोरांना आव्हान आहे की त्यांनी पक्षाचे काम करावे,आता संधी मिळाली नाही तर नंतर नक्कीच मिळेल असं म्हणत खडसेंना गव्हर्नर पद नक्कीच मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला..
आरेचं जंगल तोडू नये असं माझं मत असून,मात्र जेवढे झाड तोडली त्या पेक्षा अधिक झाडं लावली जातील..डेव्हलपमेंट च्या वेळेस लोकांनीं विरोधात करू नये असं ही आठवले म्हणालेत ..
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत चांगली मतं मिळाली मात्र आता मिळणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील तर उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला....
बाईट रामदास आठवले

रिपोर्टर कपिल भास्कर नाशिक ..



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.