नंदुरबार- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबाचा रोजगार गेला त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी शहरातील शिवेसना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ पुढे आले आहे. यामंडळाकडून दररोज दोन हजार कुटुंबाना दोन वेळचे जेवण पुरवले जात आहे.
यशवंत विद्यालयात दररोज 5000 हजार लोकांना पुरेल इतक जेवण बनविले जाते. सकाळी भाजी पोळी आणि सायंकाळी खिचडी हे मेनू जेवणात दिले जात. त्याच ठिकाणी फूड पॅकेट तयार करून ती शहरातील झोपडपट्टी आणि ग्रामीण भागात पाठवली जातात.
कोरोनामुळे रोजगार तब्बल पाच हजार लोकांना या मंडळामार्फत जेवण घरपोच दिले जात आहे. प्रसिद्धीपासून दूर राहत संकटाच्या काळात मंडळाकडून काम सुरु आहे.