ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये सेंद्रिय शेतीसाठी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार; कार्यशाळेचे आयोजन

author img

By

Published : Jan 9, 2020, 10:32 AM IST

शेतांमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने उत्पन्नात वाढ झाली. मात्र, आरोग्य धोक्यात आल्याने सेंद्रिय शेती हाच आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ अजय सराफ यांनी केले. मातेचे पोषण झाले नाही, तर बालक कुपोषित जन्माला येते, असे ते म्हणाले.

organic farming workshop in nandurbar
नंदुरबारमध्ये सेंद्रिय शेतीसाठी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार; कार्यशाळेचे आयोजन

नंदुरबार - शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढल्याने उत्पन्नात वाढ झाली. मात्र, आरोग्य धोक्यात आल्याने सेंद्रिय शेती हाच आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ अजय सराफ यांनी केले आहे. ऑस्ट्रेलिया व युरोपच्या धर्तीवर आता सेंद्रिय गट शेती करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच सेंद्रिय शेतीविषयी नंदुरबारच्या शेतकर्‍यांनी निर्णय घेतल्यास त्यांना कॅनडातील गार्डन व्हिलेज ग्रुप मदत करेल, असे सराफ यांनी सांगितले.

नंदुरबारमध्ये सेंद्रिय शेतीसाठी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार; कार्यशाळेचे आयोजन

गार्डन व्हिलेज ग्रुपतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात लोक सहभागीय प्रकल्प सादरीकरण कार्यक्रम झाला. यावेळी कॅनडा येथील गार्डन व्हिलेज ग्रुपचे प्रमुख गार्थ वॉटसन, विनीत चोपडा, विदर्भातील शेतीतज्ज्ञ सुधीर इंगळे, राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.

हेही वाचा : नंदुरबार जिल्हापरिषद निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत 38 टक्के मतदान

आता भारताला विषमुक्त शेतीची गरज असल्याचे मत अजय सराफ यांनी मांडले. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मातेचे पोषण झाले नाही, तर बालक कुपोषित जन्माला येते, असे ते म्हणाले. तसेच शेती एक तंत्र आहे. ती करण्यासाठी आता जमिनीचा पोत सुधारला पाहिजे, अशी गरज सराफ यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गटशेतीचे महत्त्व समजवले. नियोजनपूर्वक सामूहिक शेती करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

हेही वाचा : शेतकरी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा

सेंद्रिय शेतीवर सराफ यांनी अमरावतीला कार्यशाळा घेतली. त्यानंतर त्यांनी नंदुरबारची निवड केली. पुढे बोलताना, आसाम व तसेच उत्तर पूर्व भागात रासायनिक खतांचा वापर न करता शेती केली जाते, असे सराफ यांनी सांगितले. मग महाराष्ट्रासह अन्य राज्यात हा प्रयोग का राबवला जात नाही, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी गार्थ वॉटसन यांनीही इंग्रजीत शेतकर्‍यांशी संवाद साधला.

नंदुरबार - शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढल्याने उत्पन्नात वाढ झाली. मात्र, आरोग्य धोक्यात आल्याने सेंद्रिय शेती हाच आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ अजय सराफ यांनी केले आहे. ऑस्ट्रेलिया व युरोपच्या धर्तीवर आता सेंद्रिय गट शेती करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच सेंद्रिय शेतीविषयी नंदुरबारच्या शेतकर्‍यांनी निर्णय घेतल्यास त्यांना कॅनडातील गार्डन व्हिलेज ग्रुप मदत करेल, असे सराफ यांनी सांगितले.

नंदुरबारमध्ये सेंद्रिय शेतीसाठी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार; कार्यशाळेचे आयोजन

गार्डन व्हिलेज ग्रुपतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात लोक सहभागीय प्रकल्प सादरीकरण कार्यक्रम झाला. यावेळी कॅनडा येथील गार्डन व्हिलेज ग्रुपचे प्रमुख गार्थ वॉटसन, विनीत चोपडा, विदर्भातील शेतीतज्ज्ञ सुधीर इंगळे, राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.

हेही वाचा : नंदुरबार जिल्हापरिषद निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत 38 टक्के मतदान

आता भारताला विषमुक्त शेतीची गरज असल्याचे मत अजय सराफ यांनी मांडले. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मातेचे पोषण झाले नाही, तर बालक कुपोषित जन्माला येते, असे ते म्हणाले. तसेच शेती एक तंत्र आहे. ती करण्यासाठी आता जमिनीचा पोत सुधारला पाहिजे, अशी गरज सराफ यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गटशेतीचे महत्त्व समजवले. नियोजनपूर्वक सामूहिक शेती करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

हेही वाचा : शेतकरी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा

सेंद्रिय शेतीवर सराफ यांनी अमरावतीला कार्यशाळा घेतली. त्यानंतर त्यांनी नंदुरबारची निवड केली. पुढे बोलताना, आसाम व तसेच उत्तर पूर्व भागात रासायनिक खतांचा वापर न करता शेती केली जाते, असे सराफ यांनी सांगितले. मग महाराष्ट्रासह अन्य राज्यात हा प्रयोग का राबवला जात नाही, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी गार्थ वॉटसन यांनीही इंग्रजीत शेतकर्‍यांशी संवाद साधला.

Intro:नंदुरबार- शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढल्याने उत्पन्नात वाढ झाली. मात्र, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अन्नापेक्षा औषधांवर अधिक खर्च होत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती हाच आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. ऑस्ट्रेलिया व युरोपच्या धर्तीवर आता सेंद्रिय गट शेती करण्यावर भर दिला पाहिजे. सेंद्रिय शेतीविषयी नंदुरबारच्या शेतकर्‍यांनी निर्णय घेतल्यास त्यांना कॅनडातील गार्डन व्हिलेज ग्रुप मदत करेल. तसेच शेतकर्‍यांनी तयारी दर्शवली तर ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर नंदुरबारमध्ये लवकरच सेंद्रिय गट शेती केली जाईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय शेतीतज्ज्ञ अजय सराफ यांनी केले.Body:गार्डन व्हिलेज ग्रुपतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात लोक सहभागीय प्रकल्प सादरीकरण कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कॅनडा येथील गार्डन व्हिलेज ग्रुपचे प्रमुख गार्थ वाटसन, विनीत चोपडा, विदर्भातील शेतीतज्ज्ञ सुधीर इंगळे, राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते. अजय सराफ म्हणाले, आता भारताला विषमुक्त शेतीची गरज आहे. त्यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी आपण रासायनिक खतांचा वापर वाढवला. त्यामुळे उत्पन्न वाढले पण आरोग्य धोक्यात आले. मनुष्याचे आरोग्य जसे बिघडले तसा जमिनीची पोतही घसरला. मातेचे पोषण झाले नाही तर बालक कुपोषित जन्माला येते. तसेच शेतीचे तंत्र आहे. शेती करण्यासाठी आता जमिनीचा पोत सुधारला पाहिजे. त्यासाठी सेंद्रिय खतांची गरज आहे. शेती गट पध्दतीने करावी. त्यासाठी नियोजन करावे लागेल. आधी शेतकर्‍यांनी सामूहिक शेती करण्याचा निर्णय घ्यावा. त्यानंतर शेतकर्‍यांना तांत्रिक मदत करण्यात येईल. वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कधी अधिक तर कधी कमी पाऊस पडतो. सेंद्रिय शेतीवर अमरावतीला कार्यशाळा घेतली. त्यानंतर नंदुरबारची निवड केली. नंदुरबारमध्ये कुपोषित बालके अधिक आहे. हा जिल्हा आकांक्षित आहे. जिल्ह्यातील आदिवासी तसेच अन्य शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती राजेंद्रकुमार गावित यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. सेंद्रिय खतांपेक्षा रासायनिक खतांनी उत्पन्न वाढते हा गैरसमज खोडावा लागेल. सेंद्रिय खतांमुळे उत्पादीत शेतमालाला अधिक भाव मिळतो. शेतकर्‍यांनी गट सेंद्रिय शेती केली तर गार्डन व्हिलेज ग्रुपतर्फे शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून जाईल, असेही ते म्हणाले. सराफ यांनी सांगितले की, आसाम व तसेच उत्तर, पूर्व भागात रासायनिक खतांचा न वापर करताही शेती केली जाते. मग महाराष्ट्रासह अन्य राज्यात हा प्रयोग का राबवला जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दोनशे वर्षांपूर्वी भारतात रुग्णालये नव्हती. कारण त्यावेळेस सकस आहार मिळत होता. माणसे आजारी पडत नव्हती. प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता प्रत्येकात होती. आता हॉस्पिटल भरलेले असतात. कारण नागरिक रोज विषयुक्त अन्न सेवन करतात, असेही ते म्हणाले. या वेळी गार्थ वाटसन यांनी इंग्रजीत शेतकर्‍यांशी संवाद साधला.Conclusion:विनीत चोपडा
विदर्भातील शेतीतज्ज्ञ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.