ETV Bharat / state

सातपुड्यात रस्तेच नाहीत, अद्यापही 'बांबूलन्स'द्वारे रुग्णांना पोहोचवतात रुग्णालयात

author img

By

Published : Sep 3, 2020, 11:36 AM IST

Updated : Sep 3, 2020, 12:39 PM IST

सातपुडा पर्वतरांगेतील गावांमध्ये अद्यापही रस्ते नाहीत. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी नागरिक बांबूची झोळी तयार करतात. त्याला त्यांनी 'बांबूलन्स', असे नाव ठेवले आहे. मात्र, या 'बांबूलन्स'मधून रुग्णालयात पोहोचेपर्यंत जीव वाचेल, याची शाश्वती राहत नाही.

nandurbar latest news  nandurbar satpura range facilities news  problems of satpura range people  सातपुडा पर्वत रांगेतील रहिवाशांच्या समस्या  नंदुरबार लेटेस्ट न्यूज
सातपुड्यातील गावांमध्येच रस्ताच नाही, अद्यापही 'बांबूलन्स'द्वारे रुग्णांना पोहोचवतात रुग्णालयात

नंदुरबार - गावात रस्ता नाही. मोठमोठे दगड, दऱ्या, खोरे पार करत, डोंगर चढून प्रवास करावा लागतोय. त्यात कोणी आजारी असेल तर त्याला खांद्यावर नाहीतर 'बांबूलन्स' (बांबूची झोळी)मध्ये नेण्याशिवाय पर्याय नाही. प्रसंगी अनेकांचा जीवही जातो. ही वाईट अवस्था आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम भागातील गावांची...

सातपुड्यात रस्तेच नाहीत, अद्यापही 'बांबूलन्स'द्वारे रुग्णांना पोहोचवतात रुग्णालयात

महाराष्ट्रातील तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. मात्र, त्यापुढे काय? त्यापुढे असलेल्या नागरी वस्तीत रस्ते आहेत की नाही, याकडे कोणाचेच लक्ष नाही. सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा राज्यकर्त्यांकडून वारंवार केला जातो. मात्र, येथील गावांची स्थिती पाहिल्यानंतर हे दावे फोल ठरतात. सरकारचे या गावांकडे कायमच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिणामी, कोणीही आजारी पडल्यास आताही बांबूच्या झोळीमधून रुग्णालयात पोहोचवले जाते. सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतर चालून ग्रामस्थ रुग्णाला मुख्य रस्त्यापर्यंत आणतात. यामधील अनेकांना उपचार मिळत नाही. कोणाचा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच जीव जातो.

सातपुड्यातील अनेक गावांमध्ये गंभीर रुग्ण याच प्रकारे रुग्णालयात पोहोचवले जात आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली नाही. याबाबत पाठपुरावा होऊनही कोणीही लक्ष देत नाही. रस्ता निर्मितीसाठी अनेकवेळा प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनाने या मागणीला गांभिर्याने न घेतल्याने येथील समस्या आजही ‘जैसे थे’ आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही रस्ते नाहीत. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही उपाययोजना होत नाही. सरकार मोठमोठ्या जाहिराती करतात. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल? असा सवाल या दुर्गम भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.

नंदुरबार - गावात रस्ता नाही. मोठमोठे दगड, दऱ्या, खोरे पार करत, डोंगर चढून प्रवास करावा लागतोय. त्यात कोणी आजारी असेल तर त्याला खांद्यावर नाहीतर 'बांबूलन्स' (बांबूची झोळी)मध्ये नेण्याशिवाय पर्याय नाही. प्रसंगी अनेकांचा जीवही जातो. ही वाईट अवस्था आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम भागातील गावांची...

सातपुड्यात रस्तेच नाहीत, अद्यापही 'बांबूलन्स'द्वारे रुग्णांना पोहोचवतात रुग्णालयात

महाराष्ट्रातील तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. मात्र, त्यापुढे काय? त्यापुढे असलेल्या नागरी वस्तीत रस्ते आहेत की नाही, याकडे कोणाचेच लक्ष नाही. सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा राज्यकर्त्यांकडून वारंवार केला जातो. मात्र, येथील गावांची स्थिती पाहिल्यानंतर हे दावे फोल ठरतात. सरकारचे या गावांकडे कायमच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिणामी, कोणीही आजारी पडल्यास आताही बांबूच्या झोळीमधून रुग्णालयात पोहोचवले जाते. सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतर चालून ग्रामस्थ रुग्णाला मुख्य रस्त्यापर्यंत आणतात. यामधील अनेकांना उपचार मिळत नाही. कोणाचा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच जीव जातो.

सातपुड्यातील अनेक गावांमध्ये गंभीर रुग्ण याच प्रकारे रुग्णालयात पोहोचवले जात आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली नाही. याबाबत पाठपुरावा होऊनही कोणीही लक्ष देत नाही. रस्ता निर्मितीसाठी अनेकवेळा प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनाने या मागणीला गांभिर्याने न घेतल्याने येथील समस्या आजही ‘जैसे थे’ आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही रस्ते नाहीत. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही उपाययोजना होत नाही. सरकार मोठमोठ्या जाहिराती करतात. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल? असा सवाल या दुर्गम भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.

Last Updated : Sep 3, 2020, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.