ETV Bharat / state

पाणीबाणीः आदिवासी बंजाराबहूल गावात टँकर मंजूर, तरीही पाणी पुरवठा बंदच

या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळाची स्थिती तीव्र असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे माहूर तालुक्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवण्यात येत नाही. माहूर तालुक्यातील मेंढकी, मुंगशी, पाचोंदा आणि सिंदखेड या चार गावांत पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

author img

By

Published : May 26, 2019, 1:50 PM IST

संग्रहित छायाचित्र

नांदेड - टँकर मंजुरीसाठी माहूर तालुक्यातील मेंढकी, मुंगशी, पाचोंदा आणि सिंदखेड या चार गावांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे पाठवून दिले आहेत. याला एक महिन्याच्या जवळपास कालावधी लोटला. तेव्हा प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करून टँकर मंजूर केले. मात्र ही मंजूरी मिळूनही 8 दिवस लोटले तरी, अद्याप आदिवासी बंजारा बहुल गावात पाण्याचे टँकर पोहोचले नाहीत. त्यामुळे अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे.


या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळाची स्थिती तीव्र असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे माहूर तालुक्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवण्यात येत नाही. माहूर तालुक्यातील मेंढकी, मुंगशी, पाचोंदा आणि सिंदखेड या चार गावांत पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरू करावा, यासाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून महिना लोटत आला आहे. तरीही प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


टंचाईग्रस्त गावांमधील सरपंचानी टँकर सुरू करावा, अशी मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. तेव्हा प्रशासनाने टँकरची मान्यता दिली असली तरी अद्याप टँकर या गावामध्ये पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे प्रशानसाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राज्यात लोकसभेसाठी आचारसंहिता लागू असतानाही, दुष्काळाची संबंधीच्या कामाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही काही उपाययोजना प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात करुन केलेल्या नाहीत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

नांदेड - टँकर मंजुरीसाठी माहूर तालुक्यातील मेंढकी, मुंगशी, पाचोंदा आणि सिंदखेड या चार गावांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे पाठवून दिले आहेत. याला एक महिन्याच्या जवळपास कालावधी लोटला. तेव्हा प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करून टँकर मंजूर केले. मात्र ही मंजूरी मिळूनही 8 दिवस लोटले तरी, अद्याप आदिवासी बंजारा बहुल गावात पाण्याचे टँकर पोहोचले नाहीत. त्यामुळे अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे.


या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळाची स्थिती तीव्र असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे माहूर तालुक्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवण्यात येत नाही. माहूर तालुक्यातील मेंढकी, मुंगशी, पाचोंदा आणि सिंदखेड या चार गावांत पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरू करावा, यासाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून महिना लोटत आला आहे. तरीही प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


टंचाईग्रस्त गावांमधील सरपंचानी टँकर सुरू करावा, अशी मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. तेव्हा प्रशासनाने टँकरची मान्यता दिली असली तरी अद्याप टँकर या गावामध्ये पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे प्रशानसाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राज्यात लोकसभेसाठी आचारसंहिता लागू असतानाही, दुष्काळाची संबंधीच्या कामाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही काही उपाययोजना प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात करुन केलेल्या नाहीत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Intro:नांदेड - आदिवासी बंजारा बहुल गावात पाण्याचे टॅंकर न पोहोचूदेण्या मागे पापाचे भागीदार कोण!
दुष्काळाची भीषण दाहकता नियोजन शून्य.



नांदेड : माहूर तालुक्यातील मेंढकी मुंगशी पाचोंदा, सिंदखेड, या चार गावांचे प्रस्ताव ग्राम पंचायत प्रशासना कडे पाठवून एक महिन्याच्या जवळपास कालावधी होत असून प्रशासकीय कचाट्यातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून टँकर मंजूर होऊन आठ दिवस लोटले तरी अद्याप आदिवासी बंजारा बहुल गावात पाण्याचे टँकर पोहोचले नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील संपूर्ण कुटुंबाला एक घडा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. माहूर तालुक्यामधील दुर्गम भागातील गावात टँकर न पोहोचू देण्याच्या मागे पापाचे भागीदार कोण ? असा सवाल येथील घश्याला कोरड पडलेली गोर गरीब जनता उपस्थित करीत असून पाण्याच्या तीव्र टंचाईचा फटका ग्रामीण भागाला बसत असताना प्रशासन मात्र कागदी घोडे नचविण्यात मग्न आहे. एकीकडे दुष्काळाशी सामना करण्यासाठी सरकार सज्ज असतांना माहूर तालुका मात्र टॅँकरच्या प्रतीक्षेत आहे.Body:यावर्षी पुन्हा एकदा दुष्काळाची तीव्र स्थिती आहे. वर्षे लागोपाठची दुष्काळआणि नापिकीमुळे ग्रामीण जनता संकटात आहे. अति तीव्र पाणी टंचाई, रोजगारासाठी वणवण, कर्जबाजारीपणा, महागाई हे सर्वात मोठी समस्या माहूर तालुक्यात असताना शाषण व प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्यानेच दुष्काळ ग्रस्त माहूर तालुक्यात अद्याप कुठलीच उपाय योजना राबविण्यात आलेली नाही.दुष्काळग्रस्त परिस्थिती बाबत दुष्काळ निवारण योजनांचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील सरकारच्या नावाच्या यंत्रणेने अद्याप केले नाही.किमान आम्हाला प्यायला पाणी तरी उपलब्ध करून द्या असा अर्त टाहो माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तहानलेली गावे करीत आहे.तालुक्याच्या मेंढकी मुंगशि पाचोंदा,सिंदखेड,या चार गावात पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरु करावा यासाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून महिना लोटत आला आहे. तरी प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने गावातील महिलांनी अखेर माहूर तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या चार ही गावातील सरपंच,उपसरपंच यांनी दिली आहे.Conclusion:
माहुर तालुक्यातील पाचुंदा गावातील व परीसरातील संपूर्ण पाणी साठे आटले असून जनावरासह माणसे पाण्यासाठी तडफडत आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीठ करावी लागत आहे.पाण्याविना हाल होत आहेत.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाचुंदा गावच्या सरपंच सौ.शेवंताबाई तुकाराम खुडे यांनी पंचायत समितीकडे विहीर अधिग्रहण करूण टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी प्रस्ताव दाखल केला.जिल्हास्तरावरुन त्यावर कार्यवाही करण्यात आली असून टॅंकरचे अधिकृत ठेकेदार पालदेवार प्रशांत ऍग्रोटेक प्रा.लि.वसंत नगर,नांदेड यांना दि.२१/०५/१९ रोजी आदेशित केले आहे.परंतु सदर ठेकेदारांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.यावर पाचुंदा येथिल सरपंचानी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता टॅंकर उपलब्ध नाही.उपलब्ध झाल्यावर पाठवू असे सांगितले.प्रशासनाकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.गावामधील लोकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे.सरपंचाकडे वारंवार विचारणा केली जात आहे.प्रशासन मात्र अशा ठेकेदारांची मनमानी सहन करण्यातच धन्यता मानत आहे.आदेश निर्गमित करुणही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही याला जबाबदार कोण.?सर्वसामान्यांच्या मागणीचा येथे कोणीही विचार करत नाहीत.जनप्रतिधीनांही याची कल्पना असूनही प्रशासन मात्र सुस्तावल्याचे दिसून येथे.पांचुंदा येथिल पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.