नांदेड - स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे ही खेदाची बाब आहे. तसेच आता शेतकऱ्यांनी एकजूट होण्याची गरज आहे, असे म्हणत तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
मोदी सरकारवर टीका - आगामी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा. महाराष्ट्राच्या सरकारला झुकावेच लागेल. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. त्यावर मोदी सरकराने एक शब्दही काढला नाही. त्यामुळे भाजप सरकारला शेतकऱ्यांची काहीच चिंता नसल्याची टीका केसीआर यांनी नांदेडमध्ये बोलताना केली.
-
BRS President, CM Sri K. Chandrashekar Rao addressing party joinings meeting in Nanded, Maharashtra https://t.co/mI2M3uGa7i
— BRS Party (@BRSparty) February 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BRS President, CM Sri K. Chandrashekar Rao addressing party joinings meeting in Nanded, Maharashtra https://t.co/mI2M3uGa7i
— BRS Party (@BRSparty) February 5, 2023BRS President, CM Sri K. Chandrashekar Rao addressing party joinings meeting in Nanded, Maharashtra https://t.co/mI2M3uGa7i
— BRS Party (@BRSparty) February 5, 2023
शेतकरी आत्महत्येचे दु:ख : भारत राष्ट्र समितीने रविवारी नांदेडमध्ये मोठी रॅली काढली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर सभेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही लोकांना ना पिण्यासाठी पाणी मिळत आहे, ना सिंचनासाठी. इतकी सरकारे आली आणि गेली त्यांनी काय केले? हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचे खुप दु:ख वाटते असे देखील राव म्हणाले.