ETV Bharat / state

नांदेडात लिलाव लांबल्याने वाळू माफियांची 'लॉटरी'

वाळू घाटांचे सर्वेक्षण, त्यानंतर यावर नागरिकांकडून मागविण्यात आलेले अभिप्राय व त्यापुढे आता पर्यावरण विभागाची मान्यता यामुळे वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया लांबत चालली आहे. ही बाब वाळू माफियांसाठी जणू लॉटरीच लागली आहे. प्रशासन मात्र यांना आळा घालण्यास अपयशी ठरत आहे.

author img

By

Published : Jun 6, 2020, 6:57 AM IST

Updated : Jun 6, 2020, 10:21 AM IST

वाळू उपसा करताना
वाळू उपसा करताना

नांदेड - वाळू घाटांचे सर्वेक्षण, त्यानंतर यावर नागरिकांकडून मागविण्यात आलेले अभिप्राय व त्यापुढे आता पर्यावरण विभागाची मान्यता यामुळे वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया लांबत चालली आहे. ही बाब वाळू माफियांसाठी पर्वणीच ठरली आहे. लिलावात भाग घेण्याऐवजी प्रशासनातील काहींना हाताशी धरुन वाळू चोरटे अनेक भागात सक्रिय असून लिलावापूर्वीच वाळू काढून आपला 'कोटा' पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लिलावा अभावी वाळू चोरट्यांची लॉटरी लागली असताना अनेक कारवाया करूनही प्रशासन हे त्यांच्यासमोर हतबल असल्याचे दिसते.

अवैध वाळू उपसा करताना
अवैध वाळू उपसा ही बाब नांदेड जिल्ह्यात कोणीच थांबवू शकत नाही, असे चित्र वाळू माफियांनी निर्माण केले आहे. कारण, एकीकडे तराफे, बोटी उडविण्याचा धुमधडाका सुरु असताना दुसरीकडे गौणखनिजांचे अवैध उत्खनन सुरुच आहे. तालुका स्तरावरील यंत्रणेच्या नाकावर टिच्चून अनेक घाटांवर अवैध वाळू उपसा केला जात आहे. प्रत्यक्षात वाळू घाटांचा लिलाव झाला नसताना गौणखनिज माफिया जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहेत. तालुकास्तरीय व प्रशासनाला हाताशी धरुन हा धंदा जोरात सुरु आहे, अशी चर्चा होत आहे. नियमाप्रमाणे अगोदर वाळू घाटांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर अभिप्राय मागविताना घाटांच्या लिलावासाठी पर्यावरण विभागाची मान्यता घेण्याची प्रक्रिया लांबल्याने त्याचा थेट फायदा वाळू माफियांनी घेतला आहे. घाटांचे लिलाव होण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करुन अनेक घाट रिकामे करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. गौणखनिजांचे संरक्षण करण्यात प्रशासकीय यंत्रणा मात्र अपयशी ठरली आहे.

टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीस परवानगी असताना राजरोसपणे गौणखनिजांची वाहतूक होत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रक पकडले आहेत.
माती भरलेल्या पाच, एक ट्रक वाळू भरलेली आणि अन्य एका वाहनास त्यांनी पकडले आहे. काही दिवसांपूर्वीच अवैध वाळू उपसा करणारे तराफे आणि बोटी उडविल्यानंतरही वाळू चोरटे थांबले नाहीत. वाळू उपशासाठी त्यांनी नविन तराफे आणि बोटी सक्रीय करुन ठेवल्या आहेत. लांबलेल्या प्रक्रियेमुळे वाळूघाटांच्या लिलावात भाग घेण्याऐवजी मिळेल तेथून गौणखनिजांची चोरी करण्याची शर्यत जिल्ह्यात सुरु झाली आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडून नुकसान होत असले आहे.

एकीकडे कारवाई आणि दुसरीकडे अवैध उपसा चालू असल्याने प्रशासनाने गौणखनिज चोरट्यांसमोर हतबल झाल्याने जिल्ह्यात गौणखनिजांची चोरी सर्रासपणे होत आहे.

हेही वाचा - नांदेडात आढळले कोरोनाचे सात नवे रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 189 वर

नांदेड - वाळू घाटांचे सर्वेक्षण, त्यानंतर यावर नागरिकांकडून मागविण्यात आलेले अभिप्राय व त्यापुढे आता पर्यावरण विभागाची मान्यता यामुळे वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया लांबत चालली आहे. ही बाब वाळू माफियांसाठी पर्वणीच ठरली आहे. लिलावात भाग घेण्याऐवजी प्रशासनातील काहींना हाताशी धरुन वाळू चोरटे अनेक भागात सक्रिय असून लिलावापूर्वीच वाळू काढून आपला 'कोटा' पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लिलावा अभावी वाळू चोरट्यांची लॉटरी लागली असताना अनेक कारवाया करूनही प्रशासन हे त्यांच्यासमोर हतबल असल्याचे दिसते.

अवैध वाळू उपसा करताना
अवैध वाळू उपसा ही बाब नांदेड जिल्ह्यात कोणीच थांबवू शकत नाही, असे चित्र वाळू माफियांनी निर्माण केले आहे. कारण, एकीकडे तराफे, बोटी उडविण्याचा धुमधडाका सुरु असताना दुसरीकडे गौणखनिजांचे अवैध उत्खनन सुरुच आहे. तालुका स्तरावरील यंत्रणेच्या नाकावर टिच्चून अनेक घाटांवर अवैध वाळू उपसा केला जात आहे. प्रत्यक्षात वाळू घाटांचा लिलाव झाला नसताना गौणखनिज माफिया जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहेत. तालुकास्तरीय व प्रशासनाला हाताशी धरुन हा धंदा जोरात सुरु आहे, अशी चर्चा होत आहे. नियमाप्रमाणे अगोदर वाळू घाटांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर अभिप्राय मागविताना घाटांच्या लिलावासाठी पर्यावरण विभागाची मान्यता घेण्याची प्रक्रिया लांबल्याने त्याचा थेट फायदा वाळू माफियांनी घेतला आहे. घाटांचे लिलाव होण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करुन अनेक घाट रिकामे करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. गौणखनिजांचे संरक्षण करण्यात प्रशासकीय यंत्रणा मात्र अपयशी ठरली आहे.

टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीस परवानगी असताना राजरोसपणे गौणखनिजांची वाहतूक होत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रक पकडले आहेत.
माती भरलेल्या पाच, एक ट्रक वाळू भरलेली आणि अन्य एका वाहनास त्यांनी पकडले आहे. काही दिवसांपूर्वीच अवैध वाळू उपसा करणारे तराफे आणि बोटी उडविल्यानंतरही वाळू चोरटे थांबले नाहीत. वाळू उपशासाठी त्यांनी नविन तराफे आणि बोटी सक्रीय करुन ठेवल्या आहेत. लांबलेल्या प्रक्रियेमुळे वाळूघाटांच्या लिलावात भाग घेण्याऐवजी मिळेल तेथून गौणखनिजांची चोरी करण्याची शर्यत जिल्ह्यात सुरु झाली आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडून नुकसान होत असले आहे.

एकीकडे कारवाई आणि दुसरीकडे अवैध उपसा चालू असल्याने प्रशासनाने गौणखनिज चोरट्यांसमोर हतबल झाल्याने जिल्ह्यात गौणखनिजांची चोरी सर्रासपणे होत आहे.

हेही वाचा - नांदेडात आढळले कोरोनाचे सात नवे रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 189 वर

Last Updated : Jun 6, 2020, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.