ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; केळीच्या लागवडीचे क्षेत्र वाढणार

author img

By

Published : Aug 30, 2020, 7:56 PM IST

शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची खात्री असल्यास अनेक शेतकरी केळी लागवड करतात. त्यासाठी सोयाबीन, मूग या पिकांची पेरणी करताना त्यात केळी लागवडीसाठी सऱ्या सोडतात. यंदा सर्वच प्रकल्पांमधून पाणी मिळण्याची खात्री असल्याने केळीसह कांदा लागवड क्षेत्रातही वाढ होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

नांदेड जिल्हा केळी लागवड
नांदेड जिल्हा केळी लागवड

नांदेड - यंदा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. परिणामी, धरण लाभक्षेत्रात मूग व केळीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पाणीसाठा पर्याप्त असल्याने जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

पाण्याची शाश्वती असल्याने मूग, सोयाबीननंतर कांदे बाग केळीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. मराठवाड्यामध्ये केळी लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार हेक्टर आहे. तर, उत्पादकता ६१.२३ टन प्रतिहेक्टर एवढी आहे. मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांपैकी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात प्रामुख्याने केळीची लागवड केली जाते. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हदगाव, भोकर या तालुक्यांमध्ये गतवर्षी ७ हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. यंदा ८ हजार हेक्टरवर नवीन लागवड प्रस्तावित आहे.

जून महिन्यात मूग व केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा धरणातील पाणीसाठ्यावर जिल्ह्यातील केळी लागवडीचे भवितव्य अवलंबून असते. सध्या इसापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आहे, तर येलदरी-सिद्धेश्वर ही धरणे १०० टक्के भरलेली आहेत. त्यामुळे अर्धापूर, मुदखेड, हदगाव, नांदेड तालुक्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होईल. तसेच, बाजूच्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील केळी लागवडीखालील क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची खात्री असल्यास अनेक शेतकरी केळी लागवड करतात. त्यासाठी सोयाबीन, मूग या पिकांची पेरणी करताना त्यात केळी लागवडीसाठी सऱ्या सोडतात. यंदा सर्वच प्रकल्पांमधून पाणी मिळण्याची खात्री असल्याने केळीसह कांदा लागवड क्षेत्रातही वाढ होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- नांदेडमध्ये पशुधनावर लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

नांदेड - यंदा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. परिणामी, धरण लाभक्षेत्रात मूग व केळीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पाणीसाठा पर्याप्त असल्याने जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

पाण्याची शाश्वती असल्याने मूग, सोयाबीननंतर कांदे बाग केळीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. मराठवाड्यामध्ये केळी लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार हेक्टर आहे. तर, उत्पादकता ६१.२३ टन प्रतिहेक्टर एवढी आहे. मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांपैकी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात प्रामुख्याने केळीची लागवड केली जाते. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हदगाव, भोकर या तालुक्यांमध्ये गतवर्षी ७ हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. यंदा ८ हजार हेक्टरवर नवीन लागवड प्रस्तावित आहे.

जून महिन्यात मूग व केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा धरणातील पाणीसाठ्यावर जिल्ह्यातील केळी लागवडीचे भवितव्य अवलंबून असते. सध्या इसापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आहे, तर येलदरी-सिद्धेश्वर ही धरणे १०० टक्के भरलेली आहेत. त्यामुळे अर्धापूर, मुदखेड, हदगाव, नांदेड तालुक्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होईल. तसेच, बाजूच्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील केळी लागवडीखालील क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची खात्री असल्यास अनेक शेतकरी केळी लागवड करतात. त्यासाठी सोयाबीन, मूग या पिकांची पेरणी करताना त्यात केळी लागवडीसाठी सऱ्या सोडतात. यंदा सर्वच प्रकल्पांमधून पाणी मिळण्याची खात्री असल्याने केळीसह कांदा लागवड क्षेत्रातही वाढ होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- नांदेडमध्ये पशुधनावर लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.