ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात पाणीबाणी; तब्बल 133 टँकरने होतोय पाणीपुरवठा

पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाल्याने नांदेड जिल्ह्यात पाणीबाणी लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे तब्बल 133 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

author img

By

Published : Jun 5, 2019, 12:52 PM IST

पाण्याच्या टँकरवर नागरिकांची गर्दी


नांदेड - सततच्या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाल्याने नांदेड जिल्ह्यात पाणीबाणी लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे तब्बल 133 टँकरनी पाणीपुरवठा करावा लागत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही, तर पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे.

उष्णतेमुळे गेले काही दिवस नांदेडकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. मागील आठवडाभर नांदेडचे तापमान 45 अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. एका बाजुला तापमान वाढत असताना दुसरीकडे पाणी टंचाईची समस्याही गंभीर होत चालली आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत.

नागरिकांची पाण्यासाठी भटकंटी


जिल्ह्यात 133 टँकरद्वारे पाणीपुरवठा -


सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 133 टँकरद्वारे 77 गावे आणि 26 वाडी - तांड्यावरील 1 लाख 95 हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे . सर्वाधिक टँकर मुखेड तालुक्यात सुरू आहेत. मुखेड तालुक्यातील 27 गावे, 15 वाड्यांवर, 55 खाजगी व 5 शासकीय अशा एकूण 60 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर नांदेड तालुक्याला 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. लोहा तालुक्यात 17 टँकर सुरू आहेत . तर कंधार मध्ये 7 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . लोहा नगरपालिका हद्दीतही 8 टँकर सुरू आहेत. याबरोबरच हदगाव तालुक्यातही 6 टँकरने पाणीपुरवटा सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 60 गावांमध्ये टँकरसाठी 90 तर टँकर व्यतिरिक्त 661 गावांतील अशा एकूण 1 हजार 66 खाजगी बोअर व विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. याद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
एकूणच प्रशासकीय पातळीवर पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अनेक गावात टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत. कागदावर दाखवलेल्या फेऱ्यापेक्षा कमी फेऱ्या मारून तसेच कमी क्षमतेच्या टँकरने (खेपा) पाणीपुरवठा केला जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही तर आणखी किमान 15 दिवस तरी नागरीकांचे पाण्यावाचून हाल होणार असल्याचे चित्र आहे.


नांदेड - सततच्या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाल्याने नांदेड जिल्ह्यात पाणीबाणी लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे तब्बल 133 टँकरनी पाणीपुरवठा करावा लागत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही, तर पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे.

उष्णतेमुळे गेले काही दिवस नांदेडकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. मागील आठवडाभर नांदेडचे तापमान 45 अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. एका बाजुला तापमान वाढत असताना दुसरीकडे पाणी टंचाईची समस्याही गंभीर होत चालली आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत.

नागरिकांची पाण्यासाठी भटकंटी


जिल्ह्यात 133 टँकरद्वारे पाणीपुरवठा -


सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 133 टँकरद्वारे 77 गावे आणि 26 वाडी - तांड्यावरील 1 लाख 95 हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे . सर्वाधिक टँकर मुखेड तालुक्यात सुरू आहेत. मुखेड तालुक्यातील 27 गावे, 15 वाड्यांवर, 55 खाजगी व 5 शासकीय अशा एकूण 60 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर नांदेड तालुक्याला 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. लोहा तालुक्यात 17 टँकर सुरू आहेत . तर कंधार मध्ये 7 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . लोहा नगरपालिका हद्दीतही 8 टँकर सुरू आहेत. याबरोबरच हदगाव तालुक्यातही 6 टँकरने पाणीपुरवटा सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 60 गावांमध्ये टँकरसाठी 90 तर टँकर व्यतिरिक्त 661 गावांतील अशा एकूण 1 हजार 66 खाजगी बोअर व विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. याद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
एकूणच प्रशासकीय पातळीवर पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अनेक गावात टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत. कागदावर दाखवलेल्या फेऱ्यापेक्षा कमी फेऱ्या मारून तसेच कमी क्षमतेच्या टँकरने (खेपा) पाणीपुरवठा केला जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही तर आणखी किमान 15 दिवस तरी नागरीकांचे पाण्यावाचून हाल होणार असल्याचे चित्र आहे.

Intro:नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईचे वाढते संकट; टँकरची संख्या १३३ वर.......!
नांदेड: सततच्या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे टँकरची संख्या १३३ वर पोहोचली आहे . जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे.
Body:नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईचे वाढते संकट; टँकरची संख्या १३३ वर.......!
नांदेड: सततच्या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे टँकरची संख्या १३३ वर पोहोचली आहे . जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे.

उष्णतेमुळे गेले काही दिवस नांदेडकर अक्षरशः होरपळून निघत आहेत . मागील आठवडाभर नांदेडचे तापमान ४५ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. एका बाजुला तापमान वाढत असताना दुसरीकडे पाणी टंचाईची समस्याही गंभीर होत आहे. यावर प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत .
सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात १३३ टँकरद्वारे ७७ गावे आणि २६ वाडी - तांड्यावरील १ लाख ९५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे . सर्वाधिक टँकर मुखेड तालुक्यात सुरू आहेत.
मुखेड तालुक्यातील २७ गावे १५ वाड्यांवर ५५ खाजगी व ५ शासकीय अशा एकूण ६० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर नांदेड तालुक्यात १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. लोहा तालुक्यात १७ टैंकर सुरू आहेत . तर कंधार मध्ये ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे .
लोहानगरपालिका हद्दीतही ८ टँकर सुरू आहेत. याबरोबरच हदगाव तालुक्यातही ६ टँकरने पाणीपुरवटा सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात १ हजार ६० गावांमध्ये टँकरसाठी ९० तर टँकर व्यतिरिक्त ६६१ गावांतील अशा एकूण १ हजार ६६ खाजगी बोअर व विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. याद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा केला जात आहे. एकूणच प्रशासकीय पातळीवर पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अनेक गावात टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत. कागदावर दाखवलेल्या फेऱ्यापेक्षा कमी फेऱ्या मारून तसेच कमी क्षमतेच्या टँकरने (खेपा) पाणीपुरवठा केला जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही तर आणखी किमान १५ दिवस तरी नागरीकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत असे चित्र आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.