ETV Bharat / state

नांदेड : मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान; तर अनेक घरांची पडझड

author img

By

Published : Jul 12, 2021, 4:39 PM IST

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतीतील सुपीक माती आणि पीके खरडून गेली. गाव शिवारातले नदी, नाले, ओढे पाण्याने आज सकाळीही तुडूंब भरून वाहत आहेत.

nanded Heavy rains news
मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान

नांदेड - काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ८० महसूल मंडळापैकी २८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच या ठिकाणी ६५ मिलीमीटर पेक्षा आधिक पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतीतील सुपीक माती आणि पीके खरडून गेली. गाव शिवारातले नदी, नाले, ओढे पाण्याने आज सकाळीही तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे गाव वाड्यातील काही घरांची पडझड झाली आहे.

नांदेड शहरात सर्वाधिक पावसाची नोंद -

गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नांदेड शहरात झाला आहे. येथे १४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अर्धापूर महसूल मंडळात १२२ मिलीमीटर पाऊस झाला. तर, धर्माबाद ८५ मिलीमीटर, कापशी ८१ मिलीमीटर, ऊमरी ७४ मिलीमीटर, कलंबर ७२ मिलीमीटर, शेवडी ७२ मिलीमीटर, सोनखेड ७२ मिलीमीटर, कंधार ६३ मिलीमीटर, सिंधी ५६ मिलीमीटर, माळाकोळी ५१ मिलीमीटर, गोळेगाव ५० मिलीमीटर, बिलोली ४२ मिलीमीटर, मुखेड ४१ मिलीमीटर, भोकर ३९ मिलीमीटर, नायगाव ३४ मिलीमीटर, किनवट २८ मिलीमीटर, हिमायतनगर ११ मिलीमीटर, हदगाव ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, माहूर परिसरात पाऊस झाला नाही.

अतिवृष्टी म्हणजे काय? -

नांदेड, अर्धापूर, धर्माबाद, ऊमरी, लोहा या भागात काल अडीच ते तीन तास पाऊस पडला. या भागातील झालेल्या पावसाचे शासकीय मोजमापात नोंद लक्षात घेता तेथील लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. सर्व साधारणपणे बारा तासांत ३०-३५ मिलीमीटर इतका पाऊस जमीनीत मुरला जातो. त्यापेक्षा आधिक ३५ ते ५० मिलीमीटर पाऊस झाला, तर काही वेळ खोलगट भागात पाणी साचते. त्यापेक्षा आधिक म्हणजे ६५ मिलीमीटर पाऊस झाल्याने पावसाचे पाणी प्रवाहीत होते. असा प्रवाह तीव्र असतो. काही वेळातच शिवारातील नदी, नाले भरून वाहू लागतात. शेतजमीनीची सुपीक माती खरडली जाते. पिकांच्या मूळ्या उघड्यावर पडतात. आशावेळी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून शासनाने ६५ मिलीमीटर पाऊस झाला तर त्या पावसाची व्याख्या अतिवृष्टी अशी केली आहे.

हेही वाचा - नागपुरच्या दामलेंचा 'अमन' निघाला जबलपुरचा 'मोहम्मद आमिर', आधारकार्डमुळे झाली जन्मदात्यांची भेट

नांदेड - काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ८० महसूल मंडळापैकी २८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच या ठिकाणी ६५ मिलीमीटर पेक्षा आधिक पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतीतील सुपीक माती आणि पीके खरडून गेली. गाव शिवारातले नदी, नाले, ओढे पाण्याने आज सकाळीही तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे गाव वाड्यातील काही घरांची पडझड झाली आहे.

नांदेड शहरात सर्वाधिक पावसाची नोंद -

गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नांदेड शहरात झाला आहे. येथे १४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अर्धापूर महसूल मंडळात १२२ मिलीमीटर पाऊस झाला. तर, धर्माबाद ८५ मिलीमीटर, कापशी ८१ मिलीमीटर, ऊमरी ७४ मिलीमीटर, कलंबर ७२ मिलीमीटर, शेवडी ७२ मिलीमीटर, सोनखेड ७२ मिलीमीटर, कंधार ६३ मिलीमीटर, सिंधी ५६ मिलीमीटर, माळाकोळी ५१ मिलीमीटर, गोळेगाव ५० मिलीमीटर, बिलोली ४२ मिलीमीटर, मुखेड ४१ मिलीमीटर, भोकर ३९ मिलीमीटर, नायगाव ३४ मिलीमीटर, किनवट २८ मिलीमीटर, हिमायतनगर ११ मिलीमीटर, हदगाव ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, माहूर परिसरात पाऊस झाला नाही.

अतिवृष्टी म्हणजे काय? -

नांदेड, अर्धापूर, धर्माबाद, ऊमरी, लोहा या भागात काल अडीच ते तीन तास पाऊस पडला. या भागातील झालेल्या पावसाचे शासकीय मोजमापात नोंद लक्षात घेता तेथील लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. सर्व साधारणपणे बारा तासांत ३०-३५ मिलीमीटर इतका पाऊस जमीनीत मुरला जातो. त्यापेक्षा आधिक ३५ ते ५० मिलीमीटर पाऊस झाला, तर काही वेळ खोलगट भागात पाणी साचते. त्यापेक्षा आधिक म्हणजे ६५ मिलीमीटर पाऊस झाल्याने पावसाचे पाणी प्रवाहीत होते. असा प्रवाह तीव्र असतो. काही वेळातच शिवारातील नदी, नाले भरून वाहू लागतात. शेतजमीनीची सुपीक माती खरडली जाते. पिकांच्या मूळ्या उघड्यावर पडतात. आशावेळी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून शासनाने ६५ मिलीमीटर पाऊस झाला तर त्या पावसाची व्याख्या अतिवृष्टी अशी केली आहे.

हेही वाचा - नागपुरच्या दामलेंचा 'अमन' निघाला जबलपुरचा 'मोहम्मद आमिर', आधारकार्डमुळे झाली जन्मदात्यांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.