ETV Bharat / state

परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली; शेतकऱ्यांना मोठा फटका!

author img

By

Published : Sep 10, 2019, 9:52 PM IST

Updated : Sep 11, 2019, 12:00 AM IST

मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात लागवड केली होती. लागवडीनंतर अवघ्या दोनच महिन्यात रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला व ती करपली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली; शेतकऱ्यांना मोठा फटका!

नांदेड - मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात लागवड केली होती. लागवडीनंतर अवघ्या दोनच महिन्यात रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला व ती करपली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली; शेतकऱ्यांना मोठा फटका!

हेही वाचा - नांदेडमधील खरीप पीकांवर लष्करी अळीचा हल्ला; बळीराजा हतबल

अर्धापुर तालुक्यातील पार्डी येथील ५ ते ७ शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मे महिन्यात केळीच्या रोपांची नोंदणी केली होती. त्यानंतर जून व जुलै महिन्यात रोपांची लागवड केली. मात्र, दोन महिन्यांच्या कालावधीतच शेतातील रोपांची वाढ थांबली व रोगांचा प्रादुर्भाव वाढला तसेच केळीची रोपे करपण्यासही सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी केळीच्या रोपांची पाहणी केली. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन न केल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा - हातातोंडाशी आलेल्या कोथिंबीरीच्या शेतावर फिरवला ट्रॅक्टर...


गेल्या काही वर्षांपासून जेमतेम पावसाळा होत असल्याने तालुक्यात केळीचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, यावर्षी केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली शेतकऱ्यांनी परभणीच्या कृषी विद्यापीठातून केळीची रोपे आणून त्यांची लागवडही केली. मात्र, त्यांच्या वाट्याला नुकसानच आल्याने घोर निराश झाले असल्याचे येथील शेतकरी सांगत होते.

हेही वाचा - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये जाहीर करावे; शेतकरी नेते जावंधियांचे पंतप्रधान मोदींना पत्र

सुनील भगवानराव मरकुंदे या शेतकऱयाने ४ हजार रोपाची लागवड केली, नंदकिशोर देशमुख यांनी २०००, अविनाश देशमुख यांनी २१००, गोविंदराव देशमुख यांनी २०००, रितेश देशमुख यांनी ३३०० केळीच्या रोपांची लागवड केली होती. रोपे करपल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा अशीच काहीशी परिस्थिती झाल्याने आता जगायचं कसं हा प्रश्न उभा राहीला आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारले याबद्दल असता ते म्हणाले, आमची यात काही चूक नाही. या नुकसानीला जबाबदार नसल्याचेही अधिकारी म्हणत आहेत. असे शेतकरी म्हणाले.

रोपांची पाहणी करून विद्यापीठाने नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा आम्ही मराठवाडा कृषी विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शेतकऱ्याने सांगीतले आहे.

नांदेड - मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात लागवड केली होती. लागवडीनंतर अवघ्या दोनच महिन्यात रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला व ती करपली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली; शेतकऱ्यांना मोठा फटका!

हेही वाचा - नांदेडमधील खरीप पीकांवर लष्करी अळीचा हल्ला; बळीराजा हतबल

अर्धापुर तालुक्यातील पार्डी येथील ५ ते ७ शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मे महिन्यात केळीच्या रोपांची नोंदणी केली होती. त्यानंतर जून व जुलै महिन्यात रोपांची लागवड केली. मात्र, दोन महिन्यांच्या कालावधीतच शेतातील रोपांची वाढ थांबली व रोगांचा प्रादुर्भाव वाढला तसेच केळीची रोपे करपण्यासही सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी केळीच्या रोपांची पाहणी केली. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन न केल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा - हातातोंडाशी आलेल्या कोथिंबीरीच्या शेतावर फिरवला ट्रॅक्टर...


गेल्या काही वर्षांपासून जेमतेम पावसाळा होत असल्याने तालुक्यात केळीचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, यावर्षी केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली शेतकऱ्यांनी परभणीच्या कृषी विद्यापीठातून केळीची रोपे आणून त्यांची लागवडही केली. मात्र, त्यांच्या वाट्याला नुकसानच आल्याने घोर निराश झाले असल्याचे येथील शेतकरी सांगत होते.

हेही वाचा - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये जाहीर करावे; शेतकरी नेते जावंधियांचे पंतप्रधान मोदींना पत्र

सुनील भगवानराव मरकुंदे या शेतकऱयाने ४ हजार रोपाची लागवड केली, नंदकिशोर देशमुख यांनी २०००, अविनाश देशमुख यांनी २१००, गोविंदराव देशमुख यांनी २०००, रितेश देशमुख यांनी ३३०० केळीच्या रोपांची लागवड केली होती. रोपे करपल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा अशीच काहीशी परिस्थिती झाल्याने आता जगायचं कसं हा प्रश्न उभा राहीला आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारले याबद्दल असता ते म्हणाले, आमची यात काही चूक नाही. या नुकसानीला जबाबदार नसल्याचेही अधिकारी म्हणत आहेत. असे शेतकरी म्हणाले.

रोपांची पाहणी करून विद्यापीठाने नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा आम्ही मराठवाडा कृषी विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शेतकऱ्याने सांगीतले आहे.

Intro:परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली...; शेतकऱ्यांना मोठा फटका...!

नांदेड: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील केळीच्या रोपाची लागवड केली असून ती रोपे लागवडीनंतर दोन महिन्यात करपली असून त्यांच्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.
Body:परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली...; शेतकऱ्यांना मोठा फटका...!

नांदेड: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील केळीच्या रोपाची लागवड केली असून ती रोपे लागवडीनंतर दोन महिन्यात करपली असून त्यांच्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.

अर्धापुर तालुक्यातील पार्डी (म.) येथील पाच ते सात शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मे महिन्यात केळीच्या रोपाची बुकिंग केली होती व जून व जुलै महिन्यात केळीच्या रोपाची लागवड केली मात्र दोन महिन्यांच्या कालावधीत शेतातील रोपांची वाढ थांबली. तर त्यांच्यावर अनेक रोगांचे प्रादुर्भाव वाढले तसेच केळीची रोपे करपण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या केळीच्या रोपाची पाहणी केली. मात्र त्यांनी शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन उपाययोजना यांच्यावर माहिती दिली नसल्याने शेतकरी सांगत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून जेमतेम पावसाळा होत असल्याने तालुक्यात केळीचे प्रमाण कमी होत आहे. तसेच केळीच्या झाडाला योग्य दर मिळत नसल्याने केळीचे प्रमाण घेतले मात्र या वर्षात केळीला चांगला दर लागल्याने शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून पार्डी येथील पांच ते सात शेतकऱ्यांनी रोपाची लागवड केली आहे. त्यात सुनील भगवानराव मरकुंदे यांनी ४ हजार रोपाची लागवड केली नंदकिशोर देशमुख २ हजार , अविनाश देशमुख २ हजार शंभर, गोविंदराव देशमुख २ हजार , रितेश देशमुख ३ हजार तीनशे या शेतकऱ्यांनी परभणी टिशू रोपाची लागवड केली. मात्र दोन महिन्यांच्या कालावधीतच रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला असून येणाऱ्या उत्पन्नावरही याचा मोठा फटका बसला आहे. यावर्षी केळीला चांगला भाव कसा-बसा मिळाला. तर यावर्षी या नवीन संकटाने तोंड वर काढले आहे. या रोपाची पाहणी करून विद्यापीठाने नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा शेतकरी मराठवाडा कृषी विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.Conclusion:
Last Updated : Sep 11, 2019, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.