ETV Bharat / state

'लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियमांचे काटेकोर पालन करा'

author img

By

Published : Feb 23, 2021, 7:14 AM IST

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकारने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरू केला आहे.

Ashok Chavan
अशोक चव्हाण

नांदेड - कोरोनाच्या नव्या संकटाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. टाळेबंदीसारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. अशोक चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी फेसबूकवरून नागरिकांशी संवाद साधताना हे आवाहन केले.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना अशोक चव्हाण
विदर्भातील 'या' तिन्ही जिल्ह्यांशी नांदेडचे रोजचे दळणवळण -

विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढला आहे. या तीनही जिल्ह्यांशी नांदेड जिल्ह्याचे रोजचे दळणवळण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत.

कोरोना झालेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोना -

भारतातील कोरोनाचा नवा विषाणू पूर्वीपेक्षाही अधिक घातक असल्याचे 'एम्स'चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी जाहीर केले आहे. कोरोना होऊन गेलेल्या आणि ज्यांच्या शरिरात 'अँटीबॉडी ' आहेत, अशानाही नव्या कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेतली पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

सार्वजनिक कार्यक्रम स्थगित -

कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे हे नवे संकट गंभीर ठरू शकते, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. सार्वजनिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक ठिकाणांसाठी असलेल्या नियमावलीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे. पन्नासहून अधिक लोक सहभागी असलेल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी देखील त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अनेक नागरिकांनी स्वतःहून आपल्याकडील सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ आदी कार्यक्रम स्थगित केले आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी होणारा 'संगीत शंकर दरबार' कार्यक्रमही यावर्षी रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

दंडात्मक कार्यवाहीच्या प्रशासनाला सूचना -

नागरिकांनी मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री स्वीकारण्याची गरज आहे. हा कोरोनाला दूर ठेवण्याचा सर्वात सुलभ पर्याय आहे. मात्र, काही नागरिक कोरोना संपल्याच्या अविर्भावात निष्काळजीपणे वागून स्वतःचे आणि इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत आहेत. या लोकांवर जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना आपण दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात तूर्तास टाळेबंदीचा विचार नाही -

नांदेड जिल्ह्यात अद्याप परिस्थिती नियंत्रणात असल्याने तूर्तास टाळेबंदीचा विचार नाही. गेल्या वर्षी आपण लॉकडाऊन आणि त्याचे दुष्परिणाम भोगलेले आहेत. त्यामुळे पुन्हा ती परिस्थिती येऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड - कोरोनाच्या नव्या संकटाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. टाळेबंदीसारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. अशोक चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी फेसबूकवरून नागरिकांशी संवाद साधताना हे आवाहन केले.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना अशोक चव्हाण
विदर्भातील 'या' तिन्ही जिल्ह्यांशी नांदेडचे रोजचे दळणवळण -

विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढला आहे. या तीनही जिल्ह्यांशी नांदेड जिल्ह्याचे रोजचे दळणवळण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत.

कोरोना झालेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोना -

भारतातील कोरोनाचा नवा विषाणू पूर्वीपेक्षाही अधिक घातक असल्याचे 'एम्स'चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी जाहीर केले आहे. कोरोना होऊन गेलेल्या आणि ज्यांच्या शरिरात 'अँटीबॉडी ' आहेत, अशानाही नव्या कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेतली पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

सार्वजनिक कार्यक्रम स्थगित -

कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे हे नवे संकट गंभीर ठरू शकते, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. सार्वजनिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक ठिकाणांसाठी असलेल्या नियमावलीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे. पन्नासहून अधिक लोक सहभागी असलेल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी देखील त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अनेक नागरिकांनी स्वतःहून आपल्याकडील सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ आदी कार्यक्रम स्थगित केले आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी होणारा 'संगीत शंकर दरबार' कार्यक्रमही यावर्षी रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

दंडात्मक कार्यवाहीच्या प्रशासनाला सूचना -

नागरिकांनी मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री स्वीकारण्याची गरज आहे. हा कोरोनाला दूर ठेवण्याचा सर्वात सुलभ पर्याय आहे. मात्र, काही नागरिक कोरोना संपल्याच्या अविर्भावात निष्काळजीपणे वागून स्वतःचे आणि इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत आहेत. या लोकांवर जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना आपण दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात तूर्तास टाळेबंदीचा विचार नाही -

नांदेड जिल्ह्यात अद्याप परिस्थिती नियंत्रणात असल्याने तूर्तास टाळेबंदीचा विचार नाही. गेल्या वर्षी आपण लॉकडाऊन आणि त्याचे दुष्परिणाम भोगलेले आहेत. त्यामुळे पुन्हा ती परिस्थिती येऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.