ETV Bharat / state

अर्धापूर नगरपंचायतीचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, 500 रुपये मागितली होती लाच

author img

By

Published : Aug 16, 2020, 7:01 AM IST

तक्रारदार विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी तो नगरपंचायत कार्यालयात गेला. यावेळी निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे (वय ५४) यांनी प्रमाणपत्रासाठी लागणारी फी म्हणून ५०० रुपये आणि लाच स्वरूपात ५०० रुपये असे १ हजार रुपये मागितले.

Acb action
Acb action

नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायत कार्यालयातील दोघे जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत. यामध्ये एक निरीक्षक व त्याच्या सेवकाचा समावेश आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायत येथील विवाह नोंदणी विभागामध्ये तक्रारदार आपल्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेले होते. विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी तो नगरपंचायत कार्यालयात गेला. यावेळी निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे (वय ५४) यांनी प्रमाणपत्रासाठी लागणारी फी म्हणून ५०० रुपये आणि लाच स्वरूपात ५०० रुपये असे १ हजार रुपये मागितले. तक्रारदार यांनी दि.१३ ऑगस्ट रोजी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

यानंतर पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १४ ऑगस्ट या दिवशी पाचशे रुपयाची लाच घेताना निरीक्षक हराळे आणि त्यांचा सेवक बालाजी चांदु पाटोळे या दोघांना रंगेहाथ पकडले.

पोलीस निरीक्षक कपिल पाटोळे जगन्नाथ अनंतवार, एकनाथ गंगातीर्थ, गणेश केजकर, शेख मुजीब, विलास राठोड आणि सचिन गायकवाड यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक कपिल पाटोळे यांच्या तक्रारीनुसार अर्धापूर पोलीस ठाण्यात लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायत कार्यालयातील दोघे जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत. यामध्ये एक निरीक्षक व त्याच्या सेवकाचा समावेश आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायत येथील विवाह नोंदणी विभागामध्ये तक्रारदार आपल्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेले होते. विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी तो नगरपंचायत कार्यालयात गेला. यावेळी निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे (वय ५४) यांनी प्रमाणपत्रासाठी लागणारी फी म्हणून ५०० रुपये आणि लाच स्वरूपात ५०० रुपये असे १ हजार रुपये मागितले. तक्रारदार यांनी दि.१३ ऑगस्ट रोजी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

यानंतर पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १४ ऑगस्ट या दिवशी पाचशे रुपयाची लाच घेताना निरीक्षक हराळे आणि त्यांचा सेवक बालाजी चांदु पाटोळे या दोघांना रंगेहाथ पकडले.

पोलीस निरीक्षक कपिल पाटोळे जगन्नाथ अनंतवार, एकनाथ गंगातीर्थ, गणेश केजकर, शेख मुजीब, विलास राठोड आणि सचिन गायकवाड यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक कपिल पाटोळे यांच्या तक्रारीनुसार अर्धापूर पोलीस ठाण्यात लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.