ETV Bharat / state

वसतिगृहात पाणी नसल्याने विद्यार्थींनींचे स्वगावी पलायन; नागपुरातील वसतिगृहामधील प्रकार

author img

By

Published : Jul 27, 2019, 9:21 PM IST

शहरात पाणीटंचाईच्या झळा आता वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही बसत आहे. मुलींच्या वसतिगृहात पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांनी घरचा रस्ता पकडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

नागपुरातील वसतीगृहामधील प्रकार

नागपूर - शहरातील पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. पाणी नसल्याने चित्रकला महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना चक्क स्वगावी पलायन करावे लागत असल्याचे समोर आले आहे. वसतिगृहात पिण्यासाठीही पाणी नसल्याने या विद्यार्थिंनींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

वसतिगृहात पाणी नसल्याने विद्यार्थींनींचे स्वगावी पलायन

नागपूरकर सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जल साठ्यांमध्ये पाणी नाही. परिणामी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे याचा फटका शहरवासियांसोबतच वसतिगृहातील विद्यार्थिनींनाही बसत आहे. पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी महाविद्यालय सोडून घरी जाणेच पसंत केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

चित्रकला महाविद्यालयातील वसतिगृहात एकूण ५० विद्यार्थी राहतात. मात्र या विद्यार्थिनींना पुरेल इतके पाणी पुरविले जात नाही. महानगरपालिकेला वसतीगृह प्रशासनाने पाण्याच्या टँकरची वारंवार मागणी केली. मात्र मनपाच्या दुर्लक्ष केल्यामुळे मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पाणी नसल्याने स्वच्छतागृहांचीही अवस्था वाईट आहे. स्वच्छतेअभावी रोगराई पसरू नये तसेच, पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे अभ्यास सोडून विद्यार्थिनींनी स्वतःचे घर गाठणेच पसंत केले आहे.

नागपूर - शहरातील पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. पाणी नसल्याने चित्रकला महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना चक्क स्वगावी पलायन करावे लागत असल्याचे समोर आले आहे. वसतिगृहात पिण्यासाठीही पाणी नसल्याने या विद्यार्थिंनींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

वसतिगृहात पाणी नसल्याने विद्यार्थींनींचे स्वगावी पलायन

नागपूरकर सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जल साठ्यांमध्ये पाणी नाही. परिणामी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे याचा फटका शहरवासियांसोबतच वसतिगृहातील विद्यार्थिनींनाही बसत आहे. पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी महाविद्यालय सोडून घरी जाणेच पसंत केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

चित्रकला महाविद्यालयातील वसतिगृहात एकूण ५० विद्यार्थी राहतात. मात्र या विद्यार्थिनींना पुरेल इतके पाणी पुरविले जात नाही. महानगरपालिकेला वसतीगृह प्रशासनाने पाण्याच्या टँकरची वारंवार मागणी केली. मात्र मनपाच्या दुर्लक्ष केल्यामुळे मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पाणी नसल्याने स्वच्छतागृहांचीही अवस्था वाईट आहे. स्वच्छतेअभावी रोगराई पसरू नये तसेच, पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे अभ्यास सोडून विद्यार्थिनींनी स्वतःचे घर गाठणेच पसंत केले आहे.

Intro:पाणी नसल्यानं नागपूर च्या चित्रकला महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिना चक्क स्वगावी पलायन केल्याचा प्रकार पुढे आलाय. वसतिगृहात पाणी नसल्यानं विद्यार्थिनीना काही दिवसांनसाठी स्वगावी गावाला जाऊन रहायची वेळ आलीय नागपूर कर सध्या पाणी टंचाई चा सामना करत आहेत. पावसाने दंडी मारल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जल साठ्यांमध्ये पाणी नाही. परीणामी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा करावा लागतोय.आणि याचा फटका वसतिगृहातील विद्यार्थिनींना बसतोय.


Body:चित्रकला महाविद्यालयातील वसतिगृहात एकूण ५० विद्यार्थी राहतात मात्र या विद्यार्थिनींना पुरेल इतकं पाणी सुद्धा वसतिगृहात पुरवलं जात नाही. महानगरपालिकेला वस्तीगृह प्रशासनाने पाण्याच्या टॅन्कर ची वारंवार मागणी केली मात्र मनपा च्या दुर्लक्षित पणा मुळे मुलींना नाहक त्रास सहन करावा लागला. पाणी नसल्याने स्वच्छता गृहांची अवस्था वाईट आहे. स्वच्छतेच्या अभावाने रोगराई पसरू नये तसंच विद्यर्थिनी ना प्यायला सुद्धा पाणी नाही.पाणी विकत घ्यावं लागतं आहे त्या मुळे अभ्यास सोडून विद्यार्थ्यांनि स्वतःच घर गाठले


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.