ETV Bharat / state

नागपूर शहरात पाणी प्रश्न पेटला; राष्ट्रवादीचे मटका फोड आंदोलन

author img

By

Published : Jul 18, 2019, 8:59 PM IST

शहरात पाणी कपात होणार नाही असं छातीठोक पणे सांगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती आणलीच कशी? असा प्रश्न राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे मटका फोड आंदोलन

नागपूर - इतिहासात पहिल्यांदाच नागपूर शहरावर पाणीकपातीची नामुष्की आली आहे. मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही समस्या उद्भवली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर मटका फोड आंदोलन केले. भर पावसाळ्यात शहरावर जलसंकट कोसळल्याने महानगरपालिकेने योग्य वेळेस योग्य उपाययोजना केल्या नाहीत. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.

राष्ट्रवादीचे मटका फोड आंदोलन

जुलै महिना संपत आला तरी राज्याच्या बऱयाचशा भागात पाऊस झालेला नाही. जलाशय आणि विहिरींनी तळ गाठला आहे. तलावातील पाणीसाठा संपत आला असल्याने जलसंकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाचे सांगितले.

शहरात पाणी कपात होणार नाही असं छातीठोक पणे सांगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती आणलीच कशी? असा प्रश्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत होते.

नागपूर - इतिहासात पहिल्यांदाच नागपूर शहरावर पाणीकपातीची नामुष्की आली आहे. मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही समस्या उद्भवली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर मटका फोड आंदोलन केले. भर पावसाळ्यात शहरावर जलसंकट कोसळल्याने महानगरपालिकेने योग्य वेळेस योग्य उपाययोजना केल्या नाहीत. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.

राष्ट्रवादीचे मटका फोड आंदोलन

जुलै महिना संपत आला तरी राज्याच्या बऱयाचशा भागात पाऊस झालेला नाही. जलाशय आणि विहिरींनी तळ गाठला आहे. तलावातील पाणीसाठा संपत आला असल्याने जलसंकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाचे सांगितले.

शहरात पाणी कपात होणार नाही असं छातीठोक पणे सांगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती आणलीच कशी? असा प्रश्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत होते.

Intro:इतिहासात पहिल्यांदाच नागपूर शहरावर पाणीकपातीची नामुष्की आल्यानं ही समस्या मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे उद्भवलीय असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका मटका फोड आंदोलन केले भर पावसाळ्यात शहरावर 'जलसंकट कोसळल्याने महानगर पालिकेने योग्य वेळेस योग्य उपाययोजना केल्या नाहीत त्याचा परिणाम शहरातली लोकांना भोगावा लागतोय असे आरोप राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यानी महानगरपालिका प्रशासनावर केलेBody:जुलै महिना अर्धा संपला तरीही पाऊस नाही. जलाशय आणि विहिरींनी तळ गाठला. पाणीसाठाही संपत आलाय
जलसंकटावर मात करण्यासाठी मनपाने नागपूर शहरात तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला. शहरात पाणी कपात होणार नाही असं छातीठोक पणे सांगनाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनि ही परिस्थिती आणली अस राका च म्हणणं आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.