ETV Bharat / state

महामार्गाच्या शेजारी जलसंधारणाचा प्रयोग देशभरात राबवणार - नितीन गडकरी - Vidarbha

देशासह राज्यात पावसाची टक्केवारी घटली असून नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंधारणाची गरज निर्माण झाली आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Jul 20, 2019, 8:52 PM IST

नागपूर - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाच्या बाजूला जलसंधारणाची कामे केली, त्याचा चांगला फायदा झाला. त्यामुळे हा प्रयोग देशभरात राबवणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते इंडियन बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राज्यासह देशभरात पावसाची टक्केवारी घटलेली आहे. एवढेच काय तर नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जलसंधारणाची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

पावसाच्या पाण्याला म्हणजेच धावणाऱ्या पाण्याला चालायला लावले पाहिजे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावले पाहिजे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरवायला शिकले पाहिजे. यामुळे पाण्याची पातळी वाढेल, यातून जलसंकटासारख्या प्रश्नावर तोडगा निघेल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

नागपूर - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाच्या बाजूला जलसंधारणाची कामे केली, त्याचा चांगला फायदा झाला. त्यामुळे हा प्रयोग देशभरात राबवणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते इंडियन बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राज्यासह देशभरात पावसाची टक्केवारी घटलेली आहे. एवढेच काय तर नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जलसंधारणाची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

पावसाच्या पाण्याला म्हणजेच धावणाऱ्या पाण्याला चालायला लावले पाहिजे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावले पाहिजे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरवायला शिकले पाहिजे. यामुळे पाण्याची पातळी वाढेल, यातून जलसंकटासारख्या प्रश्नावर तोडगा निघेल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Intro:राज्यासह देशभरात पावसाची टक्केवारी घटलेली आहे....एवढंच काय तर नागपूर सह विदर्भाच्या बहुतांश दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे...या वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या शेजारी जलसंधारणाचा प्रयोग देशभरात करणार असल्याची माहिती दिली आहे
Body:पाण्याचे सूत्र समजावताना नितीन गडकरी याणी पावसाच्या पाण्याला म्हणजेच धावणार्या पाण्याला चालायला लावले पाहिजे,पाणी,चालणाऱ्या पाण्याला थांबवण्यासाठी लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरवायला शिका म्हणजे पाण्याची पातळी वाढेल ,ज्यातून जलसंकटा सारख्या प्रश्नावर तोडगा निघेल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीय.....याचाच एक भाग म्हणून केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाच्या बाजूला जलसंधारणाची कामंही केलीय, त्याचा चांगला फायदा झालाय. हाच प्रकल्प देशभरात राबवणार असल्याचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगीतलं...ते आज इंडियन बॅंकेच्या कार्यक्रमा दरम्यान बोलत होते.

बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.