ETV Bharat / state

जनता कर्फ्यूनंतर नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई - आयुक्त तुकाराम मुंढे

नागपुरात शनिवार आणि रविवार असा दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्याला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या दोन दिवसीय कर्फ्यूनंतरही प्रशासनाची करडी नजर राहणार, असल्याचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

author img

By

Published : Jul 26, 2020, 5:54 PM IST

Updated : Jul 26, 2020, 10:40 PM IST

Tukaram Mundhe
आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागपुरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. आज जनता कर्फ्यूचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. जनता कर्फ्यूनंतर नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. या दोन दिवसीय कर्फ्यूनंतरही प्रशासनाची करडी नजर राहणार, असल्याचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. या जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी या कर्फ्यूप्रमाणेच आपल्या जीवनशैलीत बदल करा, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले.

जनता कर्फ्यूनंतर नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूनंतरही दुकानांवर अनावश्यक गर्दी करू नये, दुकानदारांनी देखील नियमांचे पालन करावे, जर नियमांचे पालन केले नाही तर प्रशासनाला कडक कारवाई करावी लागेल, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

बाजारपेठेतील दुकानदारांनी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेतच काम करावे. दुकानांसाठी सम-विषम पद्धत पुढेही कायम असणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. नागरिकांनी व दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक दंड देखील भरावा लागेल. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंढे यांनी केले.

नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागपुरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. आज जनता कर्फ्यूचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. जनता कर्फ्यूनंतर नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. या दोन दिवसीय कर्फ्यूनंतरही प्रशासनाची करडी नजर राहणार, असल्याचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. या जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी या कर्फ्यूप्रमाणेच आपल्या जीवनशैलीत बदल करा, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले.

जनता कर्फ्यूनंतर नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूनंतरही दुकानांवर अनावश्यक गर्दी करू नये, दुकानदारांनी देखील नियमांचे पालन करावे, जर नियमांचे पालन केले नाही तर प्रशासनाला कडक कारवाई करावी लागेल, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

बाजारपेठेतील दुकानदारांनी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेतच काम करावे. दुकानांसाठी सम-विषम पद्धत पुढेही कायम असणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. नागरिकांनी व दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक दंड देखील भरावा लागेल. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंढे यांनी केले.

Last Updated : Jul 26, 2020, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.