ETV Bharat / state

शेतकऱ्यांची गंभीर स्थिती सरकारच्या कानावर घालून मदतीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार

विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

author img

By

Published : Nov 14, 2019, 11:17 PM IST

शरद पवार

नागपूर - विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रपती राजवटीत केंद्र सरकारचे अधिकार वाढत असले तरी आम्ही संसदेत खासदार आहोत. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती केंद्र सरकारच्या कानावर घालून शेतकऱ्यांना गतीने सरकारी मदत कशी मिळेल, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही पवार म्हणाले.

Nagpur
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करताना शरद पवार

आज शरद पवार यांनी नागपूरमधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाची पाहणी केली. तसेच ज्या संत्र्याच्या बागांचे नुकसान झाले आहे, त्याचीही पवार यांनी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल शेतकऱ्यांनी मांडल्या.

हेही वाचा - राष्ट्रपती राजवटीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद

हेही वाचा - सत्ता स्थापनेच्या दिशेने सकारात्मक पाऊल - छगन भुजबळ

यापूर्वीही राज्यपाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेऊन राज्ये चालवली आहेत. १९८० साली माझ्या अधिपत्याखालील सरकार बरखास्त केले गेले. पण नंतरच्या काळात सरकार चालू शकले व लोकांची मदत करू शकल्याचे पवार म्हणाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बँक किंवा क्रेडिट सोसायटीकडून घेतलेली आर्थिक मदत सरकारने पूर्णपणाने भरावी, अशी मागणी केल्याचे पवार म्हणाले.

नागपूर - विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रपती राजवटीत केंद्र सरकारचे अधिकार वाढत असले तरी आम्ही संसदेत खासदार आहोत. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती केंद्र सरकारच्या कानावर घालून शेतकऱ्यांना गतीने सरकारी मदत कशी मिळेल, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही पवार म्हणाले.

Nagpur
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करताना शरद पवार

आज शरद पवार यांनी नागपूरमधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाची पाहणी केली. तसेच ज्या संत्र्याच्या बागांचे नुकसान झाले आहे, त्याचीही पवार यांनी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल शेतकऱ्यांनी मांडल्या.

हेही वाचा - राष्ट्रपती राजवटीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद

हेही वाचा - सत्ता स्थापनेच्या दिशेने सकारात्मक पाऊल - छगन भुजबळ

यापूर्वीही राज्यपाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेऊन राज्ये चालवली आहेत. १९८० साली माझ्या अधिपत्याखालील सरकार बरखास्त केले गेले. पण नंतरच्या काळात सरकार चालू शकले व लोकांची मदत करू शकल्याचे पवार म्हणाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बँक किंवा क्रेडिट सोसायटीकडून घेतलेली आर्थिक मदत सरकारने पूर्णपणाने भरावी, अशी मागणी केल्याचे पवार म्हणाले.

Intro:Body:

शेतकऱ्यांची गंभीर स्थिती सरकारच्या कानावर घालून, मदतीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार

 

नागपूर -  विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रपती राजवटीत केंद्र सरकारचे अधिकार वाढत असले तरी आम्ही संसदेत खासदार आहोत. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती केंद्र सरकारच्या कानावर घालून शेतकऱ्यांना गतीने सरकारी मदत कशी मिळेल, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही पवार म्हणाले.



आज शरद पवार यांनी नागपूरमधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाची पाहणी केली. तसेच ज्या संत्र्याच्या बागांचे नुकसान झाले आहे, त्याचीही पवार यांनी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल शेतकऱ्यांनी मांडल्या.



यापूर्वीही राज्यपाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेऊन राज्ये चालवली आहेत. १९८० साली माझ्या अधिपत्याखालील सरकार बरखास्त केले गेले. पण नंतरच्या काळात सरकार चालू शकले व लोकांची मदत करू शकल्याचे पवार म्हणाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी  बँक किंवा क्रेडिट सोसायटीकडून घेतलेली आर्थिक मदत सरकारने पूर्णपणाने भरावी, अशी मागणी केल्याचे पवार म्हणाले. 


Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.