ETV Bharat / state

सत्ता स्थापनेविषयी शरद पवारांचा मोठा खुलासा; वक्तव्यामुळे संभ्रम

author img

By

Published : Nov 15, 2019, 8:30 PM IST

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ता स्थापनेच्या चर्चा नेमक्या कोणत्या दिशेने सुरू आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शरद पवारांच्या वक्तव्याने संभ्रम

नागपूर - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटून गेले तरी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ता स्थापनेच्या चर्चा नेमक्या कोणत्या दिशेने सुरू आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सत्ता स्थापनेविषयी शरद पवारांचा मोठा खुलासा


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शरद पवार यांना एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला की, येत्या १७ नोव्हेंबरला राज्याचा इतिहास बदलावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, या गोष्टीला वेळ लागेल, धोरणात्मक गोष्टींवर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्तास्थापनेची वाटचाल कुठल्या दिशेने जाईल याचे गुढ वाढले आहे.

हेही वाचा - मी क्रिकेट खेळाडू नसून प्रशासक, पवारांचा गडकरींना टोला

हेही वाचा - राज्यात भाजपचेच सरकार, मुख्यमंत्री आमचाच - चंद्रकांत पाटील

शरद पवार हे २ दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमात ते सहभागी झाल्यावर त्यांनी आमदार नितीन राऊत यांच्या घरी भेट देऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिल देशमुख उपस्थित होते. यावेळी राजकीय चर्चा झाली नसली तरी काँगेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांमधील संबंध आणखी दृढ झाले आहेत.

नागपूर - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटून गेले तरी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ता स्थापनेच्या चर्चा नेमक्या कोणत्या दिशेने सुरू आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सत्ता स्थापनेविषयी शरद पवारांचा मोठा खुलासा


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शरद पवार यांना एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला की, येत्या १७ नोव्हेंबरला राज्याचा इतिहास बदलावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, या गोष्टीला वेळ लागेल, धोरणात्मक गोष्टींवर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्तास्थापनेची वाटचाल कुठल्या दिशेने जाईल याचे गुढ वाढले आहे.

हेही वाचा - मी क्रिकेट खेळाडू नसून प्रशासक, पवारांचा गडकरींना टोला

हेही वाचा - राज्यात भाजपचेच सरकार, मुख्यमंत्री आमचाच - चंद्रकांत पाटील

शरद पवार हे २ दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमात ते सहभागी झाल्यावर त्यांनी आमदार नितीन राऊत यांच्या घरी भेट देऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिल देशमुख उपस्थित होते. यावेळी राजकीय चर्चा झाली नसली तरी काँगेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांमधील संबंध आणखी दृढ झाले आहेत.

Intro:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली प्रसंगी नेत्यांन सोबत चर्चा सुरु असताना येत्या १७ नोव्हेंबर ला राज्यच इतिहास बदलावा या बिष्माचार्यांन असा आवेदनात्मक विचारणा शरद पावरांना एका वरिष्ठ कार्यकर्त्यां नि केली त्या वर उत्तर देत याला वेळ लागेल असे शरद पवार बोलले त्या मुळे सत्तास्थापनेची वाटचाल कुठल्या दिशेनी जाईल याच गुड अजून वाढलं ची चर्चा आहेBody:पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल ओला दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात सहभागी झाल्यावर त्यांनी राऊत यांच्या घरी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिल देशमुख उपस्थित होते. यावेळी राजकीय चर्चा झाली नसली तरी काँगेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांमधील संबंध आणखिन दृढ करण्याच्या अनुषंगानं महत्वाची होती.

बाईट : नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.