ETV Bharat / state

'चहावाल्या पंतप्रधानांचा अभिमान बाळगणाऱ्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला'

author img

By

Published : Dec 15, 2019, 7:57 PM IST

हिवाळी अधिवेशन सहा दिवसाचे असले तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. निश्चितपणे चांगले निर्णय होतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे

नागपूर - आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला याचा, अभिमान बाळगत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाने चहापानावरच बहिष्कार टाकावा, हे पक्षाच्या धोरणाला किती सुसंगत आहे याची मला कल्पना नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे ,अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नितीन राऊत हे यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले -

  • मी संपूर्ण राज्यातील माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, आपल्या शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. हे आशीर्वादचं आमचं पाठबळ आहे, हे आशीर्वादचं आमची शक्ती आहे.
  • आम्ही राज्यकारभार आणि सरकार म्हणून ज्या काही आशा अपेक्षा जनतेच्या आमच्याकडून आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरू.
  • मंत्रालयामध्ये जेव्हा मी पत्रकार कक्षात गेलो होतो तेव्हा मी हीच भावना व्यक्त केली होती की, पत्रकार हा या समाजाचा महत्वाचा घटक आहे, आणि समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये आपण सहकार्य कराल ही एक अपेक्षा व्यक्त करतो.
  • आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला याचा अभिमान बाळगत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाने चहापानावरच बहिष्कार टाकावा हे पक्षाच्या धोरणाला किती सुसंगत आहे याची मला कल्पना नाही.
  • ज्यावेळी आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवत होतो, तेव्हा मी बोललो होतो की मला शेतकऱ्याला कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचं आहे आणि त्या दिशेने आम्ही पावलं नक्कीच टाकत आहोत.
  • परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते
  • सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नाही.
  • मुंबईमध्ये कोणत्याही विकासकामांना किंबहुना राज्यातल्या कोणत्याही विकासकामाला आम्ही स्थगिती दिलेली नाही फक्त आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे.
  • पहिल्यांदा नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पास केले आहे, हे घटनेला धरून आहे का? याचा फैसला न्यायालयात होऊ द्या आणि आम्ही जे प्रश्न विचारले होते, त्यामध्ये स्पष्टता आल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही घेऊ.

नागपूर - आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला याचा, अभिमान बाळगत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाने चहापानावरच बहिष्कार टाकावा, हे पक्षाच्या धोरणाला किती सुसंगत आहे याची मला कल्पना नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे ,अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नितीन राऊत हे यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले -

  • मी संपूर्ण राज्यातील माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, आपल्या शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. हे आशीर्वादचं आमचं पाठबळ आहे, हे आशीर्वादचं आमची शक्ती आहे.
  • आम्ही राज्यकारभार आणि सरकार म्हणून ज्या काही आशा अपेक्षा जनतेच्या आमच्याकडून आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरू.
  • मंत्रालयामध्ये जेव्हा मी पत्रकार कक्षात गेलो होतो तेव्हा मी हीच भावना व्यक्त केली होती की, पत्रकार हा या समाजाचा महत्वाचा घटक आहे, आणि समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये आपण सहकार्य कराल ही एक अपेक्षा व्यक्त करतो.
  • आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला याचा अभिमान बाळगत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाने चहापानावरच बहिष्कार टाकावा हे पक्षाच्या धोरणाला किती सुसंगत आहे याची मला कल्पना नाही.
  • ज्यावेळी आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवत होतो, तेव्हा मी बोललो होतो की मला शेतकऱ्याला कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचं आहे आणि त्या दिशेने आम्ही पावलं नक्कीच टाकत आहोत.
  • परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते
  • सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नाही.
  • मुंबईमध्ये कोणत्याही विकासकामांना किंबहुना राज्यातल्या कोणत्याही विकासकामाला आम्ही स्थगिती दिलेली नाही फक्त आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे.
  • पहिल्यांदा नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पास केले आहे, हे घटनेला धरून आहे का? याचा फैसला न्यायालयात होऊ द्या आणि आम्ही जे प्रश्न विचारले होते, त्यामध्ये स्पष्टता आल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही घेऊ.
Intro:Body:
mh_mum_cm_nagpur_7204684

UddhavThakre live 3G 7
सरकारी चहापानावर बहिष्कार म्हणजे चहावाल्या पंतप्रधान असलेल्या पक्षाचा अवमान: उद्धव ठाकरे

नागपूर: एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला त्याचा अभिमानच, पण त्याच पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर आंतरराष्ट्रीय चहा दिनी बहिष्कार टाकला हा अवमान असल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे ,अशोक चव्हाण,छगन भुजबळ ,नितीन राऊत हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला त्याचा अभिमानच, पण त्याच पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय चहा दिनी चहापानावर बहिष्कार टाकला असा मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला.

शेतकऱ्याला कर्जमुक्तच नव्हे, तर चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं .बहिष्कार टाकण्याची पोटप्रथा सुरु झालीये.स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट, आम्हाला सावरकरांच्या मु्द्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.सावरकर प्रकरणी शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे; देशात बीजीपीने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे याचे उत्तर देणार ते सांगा? सावरकरांच्या स्वप्नातील एकसंध देश कधी निर्माण कराल ते सांगा?
देशाच उफाळलेल्या हिंसाचाराचं काय?, लोकं देशात असुरक्षित आहेत.नागरिकत्व सुधारणा कायदा हा सावरकरांच्या भूमिकेविरोधी आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदारी असेल कारवाई करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.सावरकरांच्या मुद्द्यावर आम्हाला अडचणीत आणणाऱ्यांच्या नितीबद्दल शंका वाटते.
सावरकरांच्या बाबतीत निर्णय घेण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं?
समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं .
आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधील, आम्ही वचनं पाळणारे आहोत.नागरिकत्व कायदा तत्त्वाला धरुन आहे का?
हिवाळी अधिवेशन सहा दिवसाचे असल तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षाचा आहे.निश्चितपणे निर्णय होतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हे सरकार स्थगिती सरकार नाही; अारे कारशेड वगळता कुठल्याही प्रकल्पाला राज्य सरकारने स्थगीती नाही.
देवस्थान घोटाळ्याबाबत कृती करून कारवाई करू.राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणे काम सुरू आहे यासंदर्भात राज्य सरकारची तो निर्णय लवकरच घेईल.
देशभरात उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असं सांगत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत शेवट केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.