ETV Bharat / state

अखेर नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा

author img

By

Published : Jul 25, 2019, 9:00 PM IST

शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत होता. अखेर आज सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

अखेर नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर आज सांयकाळी मेघ-गर्जनेसह हजेरी लावली. शहरात अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

अखेर नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जुलै महिन्यात देखील नागपूरकरांना प्रचंड उकाडा सहन कराव लागला. तसेच थोडाफार पाऊस येताच शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या. मात्र, पावसाअभावी पिके करपायला लागली होती. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत होता. अखेर आज सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, आता दमदार पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यातील पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर आज सांयकाळी मेघ-गर्जनेसह हजेरी लावली. शहरात अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

अखेर नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जुलै महिन्यात देखील नागपूरकरांना प्रचंड उकाडा सहन कराव लागला. तसेच थोडाफार पाऊस येताच शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या. मात्र, पावसाअभावी पिके करपायला लागली होती. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत होता. अखेर आज सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, आता दमदार पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यातील पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Intro:गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पाऊसाने मेघ गर्जनेसह हजेरी लावलीय. जुलै महिन्यात देखील नागपुरकरांना प्रछंड उकड्याचा सामना करावा लागतोय. आज आलेल्या मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकड्या पासून नागरिकांना दिलासा मिळालाय.अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विद्यार्थी आणि गाडी वाल्यांना आडोसा घ्यावा लागला.


Body:पेरणी नंतर पाऊस नासल्यान पीक करपण्याचा मार्गवार होती.मात्र इतक्या दिवसा नंतर बरसरनाऱ्या पाऊसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला
जलसाठयांमध्ये पाणी नसल्यानं शहराला एक दिवस आड पाणी पुरठवा केला जातोय. अजून दमदार पाऊसाची अवशक्यता असून . जलसाठयाती पाणी पातळीत वाढ होण्याची नितांत आवश्यकता आहे. अधिक पाऊस आल्यास पाणी टंचाई ची समस्या कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.