ETV Bharat / state

आम्ही सहकार्य करायचं आणि तुम्ही राजकारण करायचे हे योग्य नाही, फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेते आमच्याकडून आपेक्षा करतात की, आम्ही त्यांना मदत करावी. आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आणि आम्ही तो देतोय. त्यावेळी त्यांनी मात्र, राजकारण करायचं. हे योग्य होणार नाही. त्यांनीही राजकारण बंद केले पाहिजे, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांना सुनावले आहे.

author img

By

Published : Apr 5, 2021, 12:50 AM IST

bjp leader devendra fadnavis on CM uddhav thakrey, maha vikas aghadi and corona pandamic
आम्ही सहकार्य करायचं आणि तुम्ही राजकारण करायचे हे योग्य नाही - फडणवीस

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेते आमच्याकडून आपेक्षा करतात की, आम्ही त्यांना मदत करावी. आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आणि आम्ही तो देतोय. त्यावेळी त्यांनी मात्र, राजकारण करायचं. हे योग्य होणार नाही. त्यांनीही राजकारण बंद केले पाहिजे. ऊठसूट प्रत्येकाने केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि स्वत: मात्र हातावर हात धरून बसून राहायचं, हे चालणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनावले. ते रविवारी नागपूरात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस बोलताना....
स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवतात
संजय राऊत असो की मग महाविकास आघाडीचे नेते असो, हे स्वतःचा अकर्मण्यता लपवण्यासाठी ऊठसूट केंद्रकडे बोट दाखवण्याचे काम करत असल्याचे सांगत फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. केंद्राने केलेली मदतीचे पुरावे दाखवले असून कोणीही नाकारू शकले नाहीत. असेही ते म्हणाले. यामुळे आम्हाला प्रश्न करण्यापेक्षा केंद्राने दिलेली मदत गेली कुठे? हे सुद्धा महाविकास आघाडीने सांगावे, असे देखील फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने या महामारीकडे मधल्या काळात दुर्लक्ष केले. बजेटमधून यंत्रणा उभी करणे अपेक्षित होते. पण त्याकडेही दुर्लक्ष केले. यामुळे मागील परिस्थितीवरून काहीच धडा न घेता कुठलीच व्यवस्था उभी केलेली नाही. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. यामुळे आता लॉकडाऊनवरूनची चर्चा थांबवावी आणि यंत्रणा उभी करण्याकडे लक्ष सरकारने द्यावे, असा सल्लाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.



हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका, संदीप देशपांडे देणार सडेतोड उत्तर

हेही वाचा - राज्य सरकार कोविड कमी करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेली - फडणवीस

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेते आमच्याकडून आपेक्षा करतात की, आम्ही त्यांना मदत करावी. आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आणि आम्ही तो देतोय. त्यावेळी त्यांनी मात्र, राजकारण करायचं. हे योग्य होणार नाही. त्यांनीही राजकारण बंद केले पाहिजे. ऊठसूट प्रत्येकाने केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि स्वत: मात्र हातावर हात धरून बसून राहायचं, हे चालणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनावले. ते रविवारी नागपूरात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस बोलताना....
स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवतात
संजय राऊत असो की मग महाविकास आघाडीचे नेते असो, हे स्वतःचा अकर्मण्यता लपवण्यासाठी ऊठसूट केंद्रकडे बोट दाखवण्याचे काम करत असल्याचे सांगत फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. केंद्राने केलेली मदतीचे पुरावे दाखवले असून कोणीही नाकारू शकले नाहीत. असेही ते म्हणाले. यामुळे आम्हाला प्रश्न करण्यापेक्षा केंद्राने दिलेली मदत गेली कुठे? हे सुद्धा महाविकास आघाडीने सांगावे, असे देखील फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने या महामारीकडे मधल्या काळात दुर्लक्ष केले. बजेटमधून यंत्रणा उभी करणे अपेक्षित होते. पण त्याकडेही दुर्लक्ष केले. यामुळे मागील परिस्थितीवरून काहीच धडा न घेता कुठलीच व्यवस्था उभी केलेली नाही. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. यामुळे आता लॉकडाऊनवरूनची चर्चा थांबवावी आणि यंत्रणा उभी करण्याकडे लक्ष सरकारने द्यावे, असा सल्लाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.



हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका, संदीप देशपांडे देणार सडेतोड उत्तर

हेही वाचा - राज्य सरकार कोविड कमी करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेली - फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.