ETV Bharat / state

तृतीयपंथी सदिच्छा दूत असताना देखील मुंबईत सर्वात कमी तृतीयपंथीय मतदारांची नोंद - लोकसभा निवडणूक

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत केवळ 630 तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी केली आहे.

सदिच्छा दूत तृतीयपंथी श्रीगौरी सावंत
author img

By

Published : Apr 27, 2019, 9:14 PM IST

मुंबई - लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत केवळ 630 तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी केली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे. मात्र, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून 5 हजार तृतीयपंथीयांना सेवा दिली जात आहे. याचा अर्थ अजूनही तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी झालेली नाही. महत्वाचे म्हणजे, तृतीयपंथी सदिच्छा दूत असतानाही ही परिस्थिती असल्याने मतदार नाव नोंदणीसाठी शासनाला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

तृतीयपंथी सदिच्छा दूत असताना देखील मुंबईत सर्वात कमी तृतीयपंथीय मतदारांची नोंद

मुंबईतील जोगेश्‍वरी-पूर्व, विक्रोळी, विलेपार्ले, वडाळा, शिवडी आणि कुलाबा या 6 विधानसभा मतदारसंघात एकही तृतीयपंथीयाची मतदार म्हणून नोंद झालेली नाही. मुख्य म्हणजे यंदा निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून नेमणूक तृतीयपंथी श्रीगौरी सावंत यांची निवड केली आहे, असे असतानाही मतदार नोंदणीत वाढ झालेली दिसत नाही.


मुंबईत बहुतेक तृतीयपंथीय हे दक्षिणेकडील राज्यांतून स्थलांतरीत होऊन आलेले आहेत. त्यांचे मूळ रहिवाशी पुरावे 'त्या' राज्यातील आहेत. त्यामुळे बहुदा परिणामी, मतदार नोंदणीत त्यांचा आकडा कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही तृतीयपंथीयांसाठी सरकारने कल्याणकारी मंडळाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केल्याने त्यांना कोणतेही फायदे मिळणार नाहीत. हेही कारण मतदार नोंदणीत निरूत्साह असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

मुंबई - लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत केवळ 630 तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी केली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे. मात्र, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून 5 हजार तृतीयपंथीयांना सेवा दिली जात आहे. याचा अर्थ अजूनही तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी झालेली नाही. महत्वाचे म्हणजे, तृतीयपंथी सदिच्छा दूत असतानाही ही परिस्थिती असल्याने मतदार नाव नोंदणीसाठी शासनाला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

तृतीयपंथी सदिच्छा दूत असताना देखील मुंबईत सर्वात कमी तृतीयपंथीय मतदारांची नोंद

मुंबईतील जोगेश्‍वरी-पूर्व, विक्रोळी, विलेपार्ले, वडाळा, शिवडी आणि कुलाबा या 6 विधानसभा मतदारसंघात एकही तृतीयपंथीयाची मतदार म्हणून नोंद झालेली नाही. मुख्य म्हणजे यंदा निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून नेमणूक तृतीयपंथी श्रीगौरी सावंत यांची निवड केली आहे, असे असतानाही मतदार नोंदणीत वाढ झालेली दिसत नाही.


मुंबईत बहुतेक तृतीयपंथीय हे दक्षिणेकडील राज्यांतून स्थलांतरीत होऊन आलेले आहेत. त्यांचे मूळ रहिवाशी पुरावे 'त्या' राज्यातील आहेत. त्यामुळे बहुदा परिणामी, मतदार नोंदणीत त्यांचा आकडा कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही तृतीयपंथीयांसाठी सरकारने कल्याणकारी मंडळाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केल्याने त्यांना कोणतेही फायदे मिळणार नाहीत. हेही कारण मतदार नोंदणीत निरूत्साह असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Intro:तृतीयपंथी सदिच्छा दूत असताना देखील मुंबईत कमी तृतीयपंथीची नोंद

मुंबईत 29 एप्रिलला होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत केवळ 630 तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी केली आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडून माहिती मिळाली आहे .
मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून पाच हजार तृतीयपंथीयांना सेवा दिली जात आहे. याचाच अर्थ अद्यापही तृतीयपंथीयांची नाव नोंदणी करण्यासाठी शासनाला अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील जोगेश्‍वरी-पूर्व, विक्रोळी, विलेपार्ले, वडाळा, शिवडी आणि कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघात एकही तृतीयपंथीय म्हणून नोंद झालेली नाही, मुख्य म्हणजे यंदा निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून नेमणूक तृतीयपंथी श्रीगौरी सावंत यांची निवड केली असताना ही यात वाढ झालेली दिसत नाही. मुंबईत बहुतेक तृतीयपंथीय हे दक्षिणेकडील राज्यांतून स्थलांतरीत होऊन आलेले आहेत. त्यांचे मूळ रहिवाशी पुरावेे त्या-त्या राज्यातील आहेत. त्यामुळे बहुदा परिणामी, मतदार नोंदणीत त्यांचा आकडा कमी आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही तृतीयपंथीयांसाठी सरकारने कल्याणकारी मंडळाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केल्याने त्यांना कोणतेही फायदे मिळणार नाहीत. या आणखी एका कारणामुळे नोंदणीत निरूत्साह असू शकतो आहे. अशी माहिती मिळाली आहे.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.