मुंबई : रेल्वे विभागाने मोटर मंचा केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतला होता. (2021 -22) यावर्षी यासंदर्भात महत्त्वाची तरतूद देखील केली गेली. या तरतुदीनंतर रेल्वे विभागाच्या या निर्णयाला गतीप्राप्त झाली आहे. (CCTV Installation Started In The Motorman Coach) आता त्या गतीचाच परिणाम म्हणून पश्चिम रेल्वेवरील 112 लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याला सुरुवात झालेली आहे. दरम्यान, लोक ही मुंबईकरांसाठी जिवनवाहिनी आहे. यामध्ये कामगारांसह आयटी कंपनीत काम करणाऱ्या साहेब लोकांपर्यंत सर्व प्रवास करतात. तर, ही गाडी कायम गर्दीने भरलेली असते. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडतात. तर कधी अनेक टप्प्यावर अपघात घडण्याचीही शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हे पाऊल उचलल आहे.
एखादे स्टेशन विसरला जाते : पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसभरात (3000)पेक्षा अधिक लोकलच्या फेऱ्या होतात. लोकल फेऱ्यांच्या नियोजनासाठी रेल्वेकडे स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन आहेत. परंतु, अनेकदा लोकल उशिरा चालवल्या जातात. तसेच, उशिरा धावतात. मोटरमनकडूनच कधीतरी चुकते, कप कधी तांत्रिक बिघाड होतो. कधीतरी अपघात होतो किंवा लोकलचा जो चालक आहे त्याच्याकडून एखादे स्टेशन विसरला जाते. कधी कधी वेग अत्यंत गतिमान होतो तर कधी लाल सिग्नल असतो. परंतु, तरीही गाडी पुढे जाते. आणि यामुळे अनेक घटना घडलेल्या आणि लोक अचंबित देखील झालेले आहेत. त्या सर्व गोष्टींचा यामध्ये विचार केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर 112 लोकल : पश्चिम रेल्वे वरील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले, की आम्ही पश्चिम रेल्वेवर सीसीबी बसवण्यासंदर्भात विभागाने जो निर्णय घेतला आहे, त्यानुसार याची चाचणी करत आहोत. चाचणी जेव्हा यशस्वी होईल त्याच्यानंतर हे काम पूर्ण होईल. प्राथमिक स्वरूपात पश्चिम रेल्वेच्या मार्गावर 112 लोकल ट्रेनमधील मोटरमन 224 आणि गार्ड यांच्या डब्यातही सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवली जाणार आहे आणि यासाठी दोन कोटी 80 लाख रुपये खर्च तरतूद आहे.
लोकल ट्रेन सुरळीत चालू शकेल : सीसीटीव्ही कॅमेरे मोटरमनच्या डब्यात बसवण्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मदत होणार आहे. असे मत रेल्वे विभागाने व्यक्त केले आहे. तांत्रिक बिघाड किंवा लोकल एका स्टेशनवरने दुसऱ्या स्टेशनवर जाताना विनाकारण थांबणे. अचानक स्टेशन विसरून जाणे, अज्ञात लोकांकडून लोकलवर होणारी दगडफेक सिग्नल मध्ये होणारा बिघाड कुठली तांत्रिके किंवाे इलेेक्ट्रॉनिेक अेशा अनेक घडामोडी यामुळे टिपता येतील, जेणेकरून याबाबत लोकल ट्रेन सुरळीत चालू शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.