ETV Bharat / state

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : 3 डिसेंबरला सुनावणीवेळी गैरहजर असलेल्या आरोपींना दोन हजारांचा दंड

author img

By

Published : Dec 3, 2020, 2:01 PM IST

Updated : Dec 3, 2020, 2:16 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नियमित सुनावणी 3 डिसेंबर पासून मुंबईतील एनआयए न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे. गुरुवारच्या सुनावणीत या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर उदयभान द्विवेदी व सुधाकर चतुर्वेदी हे आरोपी अनुपस्थित राहिले आहेत. सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे निर्देश असतानाही अनुपस्थित राहिल्याने या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण न्यूज
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण न्यूज

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नियमित सुनावणी 3 डिसेंबर पासून मुंबईतील एनआयए न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे. 2008 मध्ये झालेल्या या स्फोटासंदर्भात आतापर्यंत 475 साक्षीदार असून 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी आहे. यामुळे दैनंदिन सुनावणीसाठी या प्रकरणातील सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने अगोदरच दिले होते. मात्र, गुरुवारच्या सुनावणीत या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर उदयभान द्विवेदी व सुधाकर चतुर्वेदी हे आरोपी अनुपस्थित राहिले आहेत. सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे निर्देश असतानाही अनुपस्थित राहिल्याने या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश

2008 मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबार 2020 पासून नियमित सुनावणी सुरू होत आहे. या नियमित सुनावणीसाठी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिवेदी, अजय राहीलकर व संदीप डांगे यांना अटक करण्यात आली होती. 3 डिसेंबरला सुनावणीला गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.

475 साक्षीदार पैकी तीनशे साक्षीदारांची साक्ष अजूनही बाकी

या प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या खटल्याला होत असलेल्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, म्हणून मागणी केली होती. त्यानुसार विशेष न्यायालयाने या संदर्भात नियमित सुनावणी डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. एनआयए न्यायालयात गेल्या 6 महिन्यात केवळ 14 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून या प्रकरणी 475 साक्षीदार आहेत. अजूनही 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असल्यामुळे या संदर्भात न्यायालयाकडून नियमित सुनावणी सुरू होत असून या प्रकरणातील सर्व आरोपींना सुनावणीच्या वेळेस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ पार्क केलेल्या मोटारसायकलमध्ये लावलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन सहा जण ठार तर, 100 हून अधिक लोक जखमी झाले. एनआयएने म्हटले आहे की, आरोप निश्चित झाल्यानंतर या प्रकरणातील खटला त्वरेने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नियमित सुनावणी 3 डिसेंबर पासून मुंबईतील एनआयए न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे. 2008 मध्ये झालेल्या या स्फोटासंदर्भात आतापर्यंत 475 साक्षीदार असून 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी आहे. यामुळे दैनंदिन सुनावणीसाठी या प्रकरणातील सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने अगोदरच दिले होते. मात्र, गुरुवारच्या सुनावणीत या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर उदयभान द्विवेदी व सुधाकर चतुर्वेदी हे आरोपी अनुपस्थित राहिले आहेत. सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे निर्देश असतानाही अनुपस्थित राहिल्याने या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश

2008 मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबार 2020 पासून नियमित सुनावणी सुरू होत आहे. या नियमित सुनावणीसाठी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिवेदी, अजय राहीलकर व संदीप डांगे यांना अटक करण्यात आली होती. 3 डिसेंबरला सुनावणीला गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.

475 साक्षीदार पैकी तीनशे साक्षीदारांची साक्ष अजूनही बाकी

या प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या खटल्याला होत असलेल्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, म्हणून मागणी केली होती. त्यानुसार विशेष न्यायालयाने या संदर्भात नियमित सुनावणी डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. एनआयए न्यायालयात गेल्या 6 महिन्यात केवळ 14 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून या प्रकरणी 475 साक्षीदार आहेत. अजूनही 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असल्यामुळे या संदर्भात न्यायालयाकडून नियमित सुनावणी सुरू होत असून या प्रकरणातील सर्व आरोपींना सुनावणीच्या वेळेस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ पार्क केलेल्या मोटारसायकलमध्ये लावलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन सहा जण ठार तर, 100 हून अधिक लोक जखमी झाले. एनआयएने म्हटले आहे की, आरोप निश्चित झाल्यानंतर या प्रकरणातील खटला त्वरेने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Last Updated : Dec 3, 2020, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.