ETV Bharat / state

शरद पवारांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा; सामूहिक सहकार्याची करून दिली आठवण - Sharad Pawar Discussion Union Health Minister

महाराष्ट्राला कोरोना लसीचा होणारा तुटपुंजा पुरवठा आणि राज्यातल्या उल्लेखनीय लसीकरणाचा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विसर पडल्याने, त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून त्यांना सामूहिक सहकार्याची आठवण करून दिली.

Sharad Pawar Discussion Union Health Minister
शरद पवार केंद्रीय आरोग्य मंत्री चर्चा
author img

By

Published : Apr 8, 2021, 4:18 PM IST

मुंबई - महाराष्ट्राला कोरोना लसीचा होणारा तुटपुंजा पुरवठा आणि राज्यातल्या उल्लेखनीय लसीकरणाचा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विसर पडल्याने, त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून त्यांना सामूहिक सहकार्याची आठवण करून दिली. पवार यांनी फेसबुकवरून केलेल्या थेट प्रक्षेपणात जनतेला अधिक काळजी घेण्याचेही आवाहन केले.

हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी 'सीबीआय'ने नोंदवून घेतला जयश्री पाटील यांचा जबाब

भाजप शासित राज्याच्या तुलनेत इतर बिगर भाजप पक्षांच्या सरकारला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली. मात्र, पवारांनी याला बागल देत केंद्राला सहकार्याचे आवाहन केले आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घ्यावी. आरोग्य मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आता सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे पवार यांनी म्हंटले.

राज्यातील स्तिथी भयावह, स्थितीला धैर्याने सामोर जा

कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने सामूहिकपणे आपण सामोर गेलेच पाहिजे. आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्यसरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केले.

गेल्यावर्षीच्या तुलनेत, यावर्षी सक्रिय रुग्ण वाढले

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ३४ हजार २५९ होते. तर, यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ७९ हजार २६८ इतके आहेत.

२ वर्षांमधील रुग्णसंख्या वाढीचा आलेख मांडला

ठाणे - सप्टेंबर - २०२० - ३८, ३७८, एप्रिल - २०२१ - ६१, १२७, पुणे - सप्टेंबर - २०२० - ८२, १७२, एप्रिल २०२१ - ८४, ३०९, नाशिक - सप्टेंबर - २०२० - १६, ५५४, एप्रिल - २०२१ - ३१, ६८८, औरंगाबाद - सप्टेंबर - २०२० - १० हजार ५८, एप्रिल - २०२१ - २७, ८२१, नागपूर - सप्टेंबर - २०२० - २१, ७४६, एप्रिल - २०२१ - ५७, ३७२

कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही

रुग्णांसाठी बेड, वैद्यकीय उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधा यांचादेखील प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे, नाईलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्यसरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. आता पर्याय राहिलेला नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सगळे घटक त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र कष्ट करत आहेत. अहोरात्र कष्ट करून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत त्यांना जनतेने सहकार्य करावे, असेही पवार यांनी म्हंटले.

समाजातल्या प्रत्येक घटकाला निर्बंधांची झळ

बंधने आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकांना या संकटामुळे फार मोठी झळ बसली आहे. व्यवसाय, दुकाने बंद झाल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. फळ, भाज्यासारख्या नाशवंत शेतीमाल तयार करणार्‍या शेतकऱ्याला आपल्या मालाचे करायचे काय? विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर्गाचे देखील अपरिमित नुकसान होत आहे. या सगळ्यातून पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु, पुढे जात असताना काही मार्गदर्शक सूचना, ज्या काही उपाययोजना यासंबंधी आलेल्या आहेत त्या नजरेसमोर ठेवून आपल्याला निर्णय घ्यावे लागत असल्याने स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा - मुंबईतून गावी परतण्यासाठी धावपळ, रेल्वे-बस स्थानकावर गर्दी

मुंबई - महाराष्ट्राला कोरोना लसीचा होणारा तुटपुंजा पुरवठा आणि राज्यातल्या उल्लेखनीय लसीकरणाचा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विसर पडल्याने, त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून त्यांना सामूहिक सहकार्याची आठवण करून दिली. पवार यांनी फेसबुकवरून केलेल्या थेट प्रक्षेपणात जनतेला अधिक काळजी घेण्याचेही आवाहन केले.

हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी 'सीबीआय'ने नोंदवून घेतला जयश्री पाटील यांचा जबाब

भाजप शासित राज्याच्या तुलनेत इतर बिगर भाजप पक्षांच्या सरकारला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली. मात्र, पवारांनी याला बागल देत केंद्राला सहकार्याचे आवाहन केले आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घ्यावी. आरोग्य मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आता सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे पवार यांनी म्हंटले.

राज्यातील स्तिथी भयावह, स्थितीला धैर्याने सामोर जा

कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने सामूहिकपणे आपण सामोर गेलेच पाहिजे. आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्यसरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केले.

गेल्यावर्षीच्या तुलनेत, यावर्षी सक्रिय रुग्ण वाढले

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ३४ हजार २५९ होते. तर, यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ७९ हजार २६८ इतके आहेत.

२ वर्षांमधील रुग्णसंख्या वाढीचा आलेख मांडला

ठाणे - सप्टेंबर - २०२० - ३८, ३७८, एप्रिल - २०२१ - ६१, १२७, पुणे - सप्टेंबर - २०२० - ८२, १७२, एप्रिल २०२१ - ८४, ३०९, नाशिक - सप्टेंबर - २०२० - १६, ५५४, एप्रिल - २०२१ - ३१, ६८८, औरंगाबाद - सप्टेंबर - २०२० - १० हजार ५८, एप्रिल - २०२१ - २७, ८२१, नागपूर - सप्टेंबर - २०२० - २१, ७४६, एप्रिल - २०२१ - ५७, ३७२

कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही

रुग्णांसाठी बेड, वैद्यकीय उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधा यांचादेखील प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे, नाईलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्यसरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. आता पर्याय राहिलेला नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सगळे घटक त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र कष्ट करत आहेत. अहोरात्र कष्ट करून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत त्यांना जनतेने सहकार्य करावे, असेही पवार यांनी म्हंटले.

समाजातल्या प्रत्येक घटकाला निर्बंधांची झळ

बंधने आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकांना या संकटामुळे फार मोठी झळ बसली आहे. व्यवसाय, दुकाने बंद झाल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. फळ, भाज्यासारख्या नाशवंत शेतीमाल तयार करणार्‍या शेतकऱ्याला आपल्या मालाचे करायचे काय? विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर्गाचे देखील अपरिमित नुकसान होत आहे. या सगळ्यातून पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु, पुढे जात असताना काही मार्गदर्शक सूचना, ज्या काही उपाययोजना यासंबंधी आलेल्या आहेत त्या नजरेसमोर ठेवून आपल्याला निर्णय घ्यावे लागत असल्याने स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा - मुंबईतून गावी परतण्यासाठी धावपळ, रेल्वे-बस स्थानकावर गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.