ETV Bharat / state

चांदिवलीत रस्ता खचला, विकासकच जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटावे असा जोरदार आवाज झाला. काय घडले पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली असता भूस्खलन होत रस्ता, नाल्याचा काही भाग आणि शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हे सर्व शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या भागात कोसळले.

author img

By

Published : Jul 3, 2019, 8:29 AM IST

चांदिवलीत रस्ता खचला

मुंबई - चांदीवली संघर्षनगर इमारत क्रमांक १० जवळ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन आणि रस्ता खचून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कोसळला. विकासकाने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चांदिवलीत रस्ता खचला

अग्निशमन दल आणि साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील वाहतूक आणि वर्दळ बंद करत सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. घटनास्थळी शेजारच्या इमारतींना असणारा धोका पाहता आसपासच्या भागात असणाऱ्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून त्यातील रहिवाशांना तात्पुरते जवळच असणाऱ्या कम्युनिटी हॉलमध्ये हलवण्यात आले आहे.

मुंबईतील बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या कांदिवली, बोरवली, मलाड अशा भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत संघर्षनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. याच पुनर्वसन करण्यात आलेल्या इमारत क्रमांक १० समोर भूस्खलनाने मंगळवारी रात्री रस्ता आणि जमीन खचल्याची घटना घडली.

येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटावे असा जोरदार आवाज झाला. काय घडले पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली असता भूस्खलन होत रस्ता, नाल्याचा काही भाग आणि शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हे सर्व शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या भागात कोसळले. शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या विकासकाने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या घटनेला स्थानिक प्रशासन आणि बाजूच्या इमारतीचे काम करणारा विकासक जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल, असे मंगला कटके म्हणाल्या.

मुंबई - चांदीवली संघर्षनगर इमारत क्रमांक १० जवळ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन आणि रस्ता खचून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कोसळला. विकासकाने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चांदिवलीत रस्ता खचला

अग्निशमन दल आणि साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील वाहतूक आणि वर्दळ बंद करत सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. घटनास्थळी शेजारच्या इमारतींना असणारा धोका पाहता आसपासच्या भागात असणाऱ्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून त्यातील रहिवाशांना तात्पुरते जवळच असणाऱ्या कम्युनिटी हॉलमध्ये हलवण्यात आले आहे.

मुंबईतील बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या कांदिवली, बोरवली, मलाड अशा भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत संघर्षनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. याच पुनर्वसन करण्यात आलेल्या इमारत क्रमांक १० समोर भूस्खलनाने मंगळवारी रात्री रस्ता आणि जमीन खचल्याची घटना घडली.

येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटावे असा जोरदार आवाज झाला. काय घडले पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली असता भूस्खलन होत रस्ता, नाल्याचा काही भाग आणि शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हे सर्व शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या भागात कोसळले. शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या विकासकाने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या घटनेला स्थानिक प्रशासन आणि बाजूच्या इमारतीचे काम करणारा विकासक जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल, असे मंगला कटके म्हणाल्या.

Intro:चांदीवलीचा रस्ता खचला यास विकासकच जबाबदार स्थानिकांचा आरोप


चांदीवली संघर्ष नगर इमारत क्रमांक १० जवळ काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन आणि रस्ता खचून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडला. नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.सुदैवाने जिवित हानी टळलीBody:चांदीवलीचा रस्ता खचला यास विकासकच जबाबदार स्थानिकांचा आरोप


चांदीवली संघर्ष नगर इमारत क्रमांक १० जवळ काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन आणि रस्ता खचून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडला. नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.सुदैवाने जिवित हानी टळली .

अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील वाहतूक आणि वर्दळ बंद करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. घटनास्थळा शेजारच्या इमारतींना असणारा धोका पाहता आसपासच्या भागात असणाऱ्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून, त्यातील रहिवाशांना तात्पुरते जवळच असणाऱ्या कम्युनिटी हॉलमध्ये हलवण्यात आले आहे.

चांदीवलीतील हे रहिवाशी मुंबईतील बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या कांदिवली, बोरवली, मलाड अशा भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत संघर्षनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. याच पुनर्वसन करण्यात आलेल्या इमारत क्रमांक १० समोर भूस्खलनाने काल रात्री रस्ता आणि जमीन खचल्याची घटना घडली आहे.

येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटावे असा जोरदार आवाज झाला होता. काय घडले पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली असता भूस्खलन होत रस्ता, नाल्याचा काही भाग आणि शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हे सर्व बांधकाम सुरु असणाऱ्या भागात कोसळले. “शेजारी बांधकाम सुरु असणारा विकासकाने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडला आहे.” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या घटनेला स्थनीक प्रशासन व बाजूचे इमारतीचे काम करणारा विकासक जबाबदार आहे.त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल असे मंगला कटके म्हणाल्या.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.