ETV Bharat / state

कोरोना मृतांच्या नोंदीसाठी रुग्णालयांना अखेरची संधी; अन्यथा होणार कायदेशीर कारवाई

author img

By

Published : Jun 19, 2020, 6:49 AM IST

Updated : Jun 19, 2020, 10:46 AM IST

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्ण आणि मृतांची आकडेवारी महापालिकेकडून लपवली जात असल्याची चर्चा होती. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेने मृतांची आकडेवारी लपवल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

Commissioner Iqbal Singh Chahal
आयुक्त इकबाल सिंह चहल

मुंबई - कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवल्याचा आरोप करण्यात येत असल्याने मुंबई महापालिकेने सर्व रुग्णालयांना 48 तासांची नोटीस बजावली आहे. यावेळेत कोरोनाच्या मृत्यूची नोंद राहिली असल्यास तसे पालिकेकडे स्पष्ट करावे. अन्यथा, अशी नोंद न केल्यास त्या रुग्णालयावर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्ण आणि मृतांची आकडेवारी महापालिकेकडून लपवली जात असल्याची चर्चा होती. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेने मृतांची आकडेवारी लपवल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्व पालिका आणि जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून आपल्या हद्दीतील मृतांची नोंद करण्याचे राहिले असल्यास त्याची नोंद करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने ८६२ मृतांची नोंद केली आहे. पालिकेने आकडेवारी लपवलेली नाही, प्रलंबित असलेल्या रिपोर्टच्या नोंदी पालिकेकडे उशिराने आल्या, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने दिले आहे.

महापालिका आयुक्तांचा रुग्णालयांना इशारा -

'कोविड १९' या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जूनला देण्यात आले होते. अद्यापही कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती निर्धारित वेळेत कळविलेली नसल्यास संबंधित रुग्णालयांना महापालिकेद्वारे शेवटची संधी देण्यात येत आहे. यानुसार मृत्यूनंतर ४८ तास उलटून गेलेल्या कोरोनाबाधित मृत्यूंची माहिती महापालिकेकडे कळविण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अशा रुग्णालयांना आता शेवटची संधी दिली आहे.

ज्यानुसार एखाद्या रुग्णालयाच्या स्तरावर अशी माहिती प्रलंबित असल्यास त्यांनी ती माहिती ४८ तासांत बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे कळवावयाची आहे. शेवटची संधी देऊनही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती महापालिकेकडे न कळविल्यास अशा रुग्णालयांवर 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

मुंबई - कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवल्याचा आरोप करण्यात येत असल्याने मुंबई महापालिकेने सर्व रुग्णालयांना 48 तासांची नोटीस बजावली आहे. यावेळेत कोरोनाच्या मृत्यूची नोंद राहिली असल्यास तसे पालिकेकडे स्पष्ट करावे. अन्यथा, अशी नोंद न केल्यास त्या रुग्णालयावर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्ण आणि मृतांची आकडेवारी महापालिकेकडून लपवली जात असल्याची चर्चा होती. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेने मृतांची आकडेवारी लपवल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्व पालिका आणि जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून आपल्या हद्दीतील मृतांची नोंद करण्याचे राहिले असल्यास त्याची नोंद करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने ८६२ मृतांची नोंद केली आहे. पालिकेने आकडेवारी लपवलेली नाही, प्रलंबित असलेल्या रिपोर्टच्या नोंदी पालिकेकडे उशिराने आल्या, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने दिले आहे.

महापालिका आयुक्तांचा रुग्णालयांना इशारा -

'कोविड १९' या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जूनला देण्यात आले होते. अद्यापही कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती निर्धारित वेळेत कळविलेली नसल्यास संबंधित रुग्णालयांना महापालिकेद्वारे शेवटची संधी देण्यात येत आहे. यानुसार मृत्यूनंतर ४८ तास उलटून गेलेल्या कोरोनाबाधित मृत्यूंची माहिती महापालिकेकडे कळविण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अशा रुग्णालयांना आता शेवटची संधी दिली आहे.

ज्यानुसार एखाद्या रुग्णालयाच्या स्तरावर अशी माहिती प्रलंबित असल्यास त्यांनी ती माहिती ४८ तासांत बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे कळवावयाची आहे. शेवटची संधी देऊनही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती महापालिकेकडे न कळविल्यास अशा रुग्णालयांवर 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

Last Updated : Jun 19, 2020, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.