ETV Bharat / state

Rashmi Thackeray In Politics: रश्मी ठाकरे राजकारणाच्या मैदानात; महिला मुख्यमंत्री पदाची पुन्हा चर्चा?

शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. विश्वासू लोकप्रतिनिधींनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत, शिंदे गटाचा रस्ता धरला. पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. नाशकात पहिला-वहिला मेळावा देखील रश्मी ठाकरे घेणार असल्याने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा रंगली आहे.

author img

By

Published : Apr 13, 2023, 10:33 PM IST

Rashmi Thackeray In Politics
रश्मी ठाकरे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारला. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सत्ता हातून गेली. राज्यातील सत्ता संघर्षाचा वाद न्यायालयात पोहचला. अशातच, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष, चिन्ह बहाल केले. ठाकरेंच्या शिवसेनेला यानंतर गळती लागली. नाशिक सारख्या जिल्ह्यात जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. नाशिकची पडझड रोखण्याचे काम खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आले; मात्र राऊतांच्या दौऱ्यापूर्वीच पदाधिकारी फोडून शिंदेंनी दणका देण्यास सुरुवात केली.


रश्मी ठाकरे नाशिक रोखणार? सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे, दौरे, यात्रा काढत आहेत. दोघांनीही पक्षबांधणीवर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस ठाकरे यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. आता ठाण्या पाठोपाठ नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे रिंगणात उतरणार आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस रश्मी ठाकरेंचा मेळावा देखील होणार आहे. आघाडीची सत्ता गेल्यानंतर ठाकरे परिवाराने राज्यात मोट बांधणीला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यात फिरुन धग राखली आहे. आता रश्मी ठाकरे हाती मशाल घेऊन पक्षाला प्रकाशझोतात आणणार असल्याची चर्चा रंगली आहे.


विरोधकां विरोधात शंख फुंकणार: शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय होताना पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंसोबत राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. यापूर्वी मुंबईतील अनेक कार्यक्रमांत त्या दिसून आल्या आहेत. मात्र, आता रश्मी ठाकरे थेट राजकारणात सक्रिय होऊन, विरोधकांना चिपतट करण्याची रणनीती आखत आहे. नाशिकमध्ये पहिला-वहिला मेळावा घेऊन त्या विरोधकां विरोधात शंख फुंकणार आहेत.


महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा: राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार अशी घोषणा केली. महाविकास आघाडीतील अनेक महिला पदाधिकाऱ्यांची नावे यावेळी पुढे करण्यात आली होती. ठाकरेंच्या सेनेतून नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर यांच्यापासून पक्षात नव्या असलेल्या सुषमा अंधारे यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. रश्मी ठाकरे राजकीय आखाड्यात उतरल्याने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: आदित्य ठाकरेंच्या हैदराबादमधील विधानावर राज्यात तापले राजकारण, वाचा कोण काय म्हणाले?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारला. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सत्ता हातून गेली. राज्यातील सत्ता संघर्षाचा वाद न्यायालयात पोहचला. अशातच, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष, चिन्ह बहाल केले. ठाकरेंच्या शिवसेनेला यानंतर गळती लागली. नाशिक सारख्या जिल्ह्यात जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. नाशिकची पडझड रोखण्याचे काम खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आले; मात्र राऊतांच्या दौऱ्यापूर्वीच पदाधिकारी फोडून शिंदेंनी दणका देण्यास सुरुवात केली.


रश्मी ठाकरे नाशिक रोखणार? सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे, दौरे, यात्रा काढत आहेत. दोघांनीही पक्षबांधणीवर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस ठाकरे यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. आता ठाण्या पाठोपाठ नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे रिंगणात उतरणार आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस रश्मी ठाकरेंचा मेळावा देखील होणार आहे. आघाडीची सत्ता गेल्यानंतर ठाकरे परिवाराने राज्यात मोट बांधणीला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यात फिरुन धग राखली आहे. आता रश्मी ठाकरे हाती मशाल घेऊन पक्षाला प्रकाशझोतात आणणार असल्याची चर्चा रंगली आहे.


विरोधकां विरोधात शंख फुंकणार: शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय होताना पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंसोबत राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. यापूर्वी मुंबईतील अनेक कार्यक्रमांत त्या दिसून आल्या आहेत. मात्र, आता रश्मी ठाकरे थेट राजकारणात सक्रिय होऊन, विरोधकांना चिपतट करण्याची रणनीती आखत आहे. नाशिकमध्ये पहिला-वहिला मेळावा घेऊन त्या विरोधकां विरोधात शंख फुंकणार आहेत.


महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा: राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार अशी घोषणा केली. महाविकास आघाडीतील अनेक महिला पदाधिकाऱ्यांची नावे यावेळी पुढे करण्यात आली होती. ठाकरेंच्या सेनेतून नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर यांच्यापासून पक्षात नव्या असलेल्या सुषमा अंधारे यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. रश्मी ठाकरे राजकीय आखाड्यात उतरल्याने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: आदित्य ठाकरेंच्या हैदराबादमधील विधानावर राज्यात तापले राजकारण, वाचा कोण काय म्हणाले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.