ETV Bharat / state

ईडीने चौकशी करावी, काही फरक पडत नाही - राज ठाकरे

author img

By

Published : Aug 2, 2019, 4:28 PM IST

ईडीने खुशाल चौकशीला यावे, मला फरक पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ईडी प्रकरणावर भाष्य केले. आयएल अ‌ॅण्ड एफएस कंपनीच्या कोहिनूर सीटीएनएल मध्ये व्यवहार संशयास्पद आहेत. यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झालं आहे का या अनुषंगाने तपास सुरु आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशी साठी ईडीच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे.

राज ठाकरे

मुंबई - ईडीने खुशाल चौकशीला यावे, मला फरक पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ईडी प्रकरणावर भाष्य केले. आयएल अ‌ॅण्ड एफएस कंपनीच्या कोहिनूर सीटीएनएलमध्ये व्यवहार संशयास्पद आहेत. यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झालं आहे का या अनुषंगाने तपास सुरु आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशीसाठी ईडीच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. त्यावर राज ठाकरे यांनी मौन सोडत ईडीच्या कोणत्याही चौकशीने काही फरक पडत नाही. त्यांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

माध्यमांच्या मालकांमागेही सत्ताधाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावून पत्रकारांच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणली आहे. यातून कोणाचीच सुटका झाली नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सच्या उभे करण्यामागे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अ‌ॅण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.

काय आहे ईडी प्रकरण
उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ते कंपनीला चुकते करणे शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अ‌ॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अ‌ॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली. मात्र, या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचं ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई - ईडीने खुशाल चौकशीला यावे, मला फरक पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ईडी प्रकरणावर भाष्य केले. आयएल अ‌ॅण्ड एफएस कंपनीच्या कोहिनूर सीटीएनएलमध्ये व्यवहार संशयास्पद आहेत. यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झालं आहे का या अनुषंगाने तपास सुरु आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशीसाठी ईडीच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. त्यावर राज ठाकरे यांनी मौन सोडत ईडीच्या कोणत्याही चौकशीने काही फरक पडत नाही. त्यांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

माध्यमांच्या मालकांमागेही सत्ताधाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावून पत्रकारांच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणली आहे. यातून कोणाचीच सुटका झाली नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सच्या उभे करण्यामागे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अ‌ॅण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.

काय आहे ईडी प्रकरण
उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ते कंपनीला चुकते करणे शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अ‌ॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अ‌ॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली. मात्र, या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचं ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Intro:मुंबई - ईडीने खुशाल चौकशीला यावं, मला फरक पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ईडी प्रकरणावर भाष्य केलं.
आयएल अॅण्ड एफएस कंपनीच्या कोहिनूर सीटीएनएल मध्ये व्यवहार संशयास्पद आहेत यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झालं आहे का या अनुषंगाने तपास सुरु आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशी साठी ईडीच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. त्यावर राज ठाकरे यांनी मौन सोडत ईडीच्या कोणत्याही चौकशीने काही फरक पडत नाही , त्यांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.Body:माध्यमांच्या मालकांमागेही सत्ताधाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावून पत्रकारांच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणली आहे. यातून कोणाचीच सुटका झाली नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सच्या उभं करण्यामागे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अॅण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.Conclusion:काय आहे ईडी प्रकरण
उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.