ETV Bharat / state

वांगणी घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घेतली कर्मचाऱ्याची दखल - भारतीय रेल्वे लेटेस्ट न्यूज

वांगणी रेल्वे स्थानकावर रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ६ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला. दोन दिवसांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने मयूर यांच्या कामगीरीची दखल घेतली. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेच्या तोकड्या सुरक्षा यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वांगणी घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?
वांगणी घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?
author img

By

Published : Apr 19, 2021, 10:20 PM IST

मुंबई- वांगणी रेल्वे स्थानकावर रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ६ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला. दोन दिवसांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने मयूर यांच्या कामगीरीची दखल घेतली. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेच्या तोकड्या सुरक्षा यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधांमुळे तुर्तास सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास मुभा नाही. रेल्वे स्थानकांवर ओळखपत्र बघूनच प्रवेश देण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेवर सरसकट प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वांगणी रेल्वे स्थानकावरील या घटनेत अंध महिलेला प्रवेश कसा मिळाला ? रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा रक्षक कुठे होते ? या महिलेवर कोणाचेच लक्ष कसे गेले नाही? महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित महिलेसोबत चिमुरडा दिसून येतो. रेल्वेने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासास मज्जाव केलेला असतानाही हा चिमुरडा स्थानकावर पोहोचलाच कसा? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर विचारले जाऊ लागले आहेत. आज मध्य रेल्वे मार्गावर बरेचशे दिव्यांग प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. मात्र त्यांना आळा घालण्यासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेची कसलीही जबाबदारी रेल्वेकडून घेण्यात येत नाही. इतकंच नव्हे तर रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा किंवा कसलाही बंदोबस्त दिसून येत नाही. वांगणी रेल्वे स्थानक घटनेतील ही महिला दृष्टिहीन होती. ती जिवाच्या आकांताने ओरडली. सुदैवाने मयूर यांचे तिच्या हाकेकडे लक्ष गेले आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी मुलाला वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, रेल्वेच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

वांगणी घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?
रेल्वेला उशिरा का आली जाग ?

ही घटना 17 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी घडली. त्यानंतरही या घटनेचा रेल्वेला थांगपत्ता नव्हता. प्रवासी संघटनेकडून मयूर शेळके यांच्या कार्याची दखल घेतली गेली आणि नंतर स्थानिक वृत्तपत्रात याबाबत वृत्तांक करण्यात आले. वांगणी स्थानकात पॉईंट्समन मयूर शेळके यांचे कौतुक झाले. जेव्हा प्रवासी संघटनेकडून ही बाब लक्षात आणून दिली गेली तेव्हा वांगणी स्थानकांवरच्या घटनेचा व्हिडीओ रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला, आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. मयूरचे कौतुक व्हायलाच हवं, मात्र रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आता तरी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा वाढवायला हवी त्याचबरोबर दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आता गरजेचे झाले आहे.

'स्थानकांवरील कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी'

महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना अध्यक्ष वंदना सोनवणे यांनी ईटीव्हीला सांगितले की, सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास बंदी असताना संबंधित मुलगा प्लॅटफॉर्मवर पोहोचलाच कसा ? याची चौकशी रेल्वेने करायला हवी. त्या स्थानकावरील तिकीट तपासणीस, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस हे संबंधित मुलाला व त्याच्या पालकास प्लॅटफॉर्मवर येण्यापासून रोखू का शकले नाहीत ? याचाही तपास रेल्वेने या घटनेनंतर करण्याची गरज आहे. पॉईंट्समन मयूर शेळके यांनी केलेल्या कामाचे कौतुक नक्कीच व्हायला हवे, त्यांच्या धाडसाबद्दल त्यांना राष्ट्रीय पदकाने सन्मानित करण्यासाठी सर्व रेल्वे प्रवाशांततर्फे आम्ही मागणी करत आहोत.

'राष्ट्रपती पुरस्कार देण्याची मागणी'

उपनगरीय प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, पॉईंट्समन मयूर शेळके यांचा प्रवासी संघातर्फे आम्ही सत्कार केला आहे. तसेच मयूरच्या कार्याबद्दल त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळावा याकरीता आम्ही संघातर्फे प्रयत्न करणार आहोत. मात्र आता तरी या घटनेतून बोध घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा वाढवावी. याचबरोबर दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपाययोजना कराव्यात. जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत.

मुंबई- वांगणी रेल्वे स्थानकावर रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ६ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला. दोन दिवसांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने मयूर यांच्या कामगीरीची दखल घेतली. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेच्या तोकड्या सुरक्षा यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधांमुळे तुर्तास सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास मुभा नाही. रेल्वे स्थानकांवर ओळखपत्र बघूनच प्रवेश देण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेवर सरसकट प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वांगणी रेल्वे स्थानकावरील या घटनेत अंध महिलेला प्रवेश कसा मिळाला ? रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा रक्षक कुठे होते ? या महिलेवर कोणाचेच लक्ष कसे गेले नाही? महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित महिलेसोबत चिमुरडा दिसून येतो. रेल्वेने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासास मज्जाव केलेला असतानाही हा चिमुरडा स्थानकावर पोहोचलाच कसा? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर विचारले जाऊ लागले आहेत. आज मध्य रेल्वे मार्गावर बरेचशे दिव्यांग प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. मात्र त्यांना आळा घालण्यासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेची कसलीही जबाबदारी रेल्वेकडून घेण्यात येत नाही. इतकंच नव्हे तर रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा किंवा कसलाही बंदोबस्त दिसून येत नाही. वांगणी रेल्वे स्थानक घटनेतील ही महिला दृष्टिहीन होती. ती जिवाच्या आकांताने ओरडली. सुदैवाने मयूर यांचे तिच्या हाकेकडे लक्ष गेले आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी मुलाला वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, रेल्वेच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

वांगणी घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?
रेल्वेला उशिरा का आली जाग ?

ही घटना 17 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी घडली. त्यानंतरही या घटनेचा रेल्वेला थांगपत्ता नव्हता. प्रवासी संघटनेकडून मयूर शेळके यांच्या कार्याची दखल घेतली गेली आणि नंतर स्थानिक वृत्तपत्रात याबाबत वृत्तांक करण्यात आले. वांगणी स्थानकात पॉईंट्समन मयूर शेळके यांचे कौतुक झाले. जेव्हा प्रवासी संघटनेकडून ही बाब लक्षात आणून दिली गेली तेव्हा वांगणी स्थानकांवरच्या घटनेचा व्हिडीओ रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला, आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. मयूरचे कौतुक व्हायलाच हवं, मात्र रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आता तरी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा वाढवायला हवी त्याचबरोबर दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आता गरजेचे झाले आहे.

'स्थानकांवरील कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी'

महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना अध्यक्ष वंदना सोनवणे यांनी ईटीव्हीला सांगितले की, सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास बंदी असताना संबंधित मुलगा प्लॅटफॉर्मवर पोहोचलाच कसा ? याची चौकशी रेल्वेने करायला हवी. त्या स्थानकावरील तिकीट तपासणीस, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस हे संबंधित मुलाला व त्याच्या पालकास प्लॅटफॉर्मवर येण्यापासून रोखू का शकले नाहीत ? याचाही तपास रेल्वेने या घटनेनंतर करण्याची गरज आहे. पॉईंट्समन मयूर शेळके यांनी केलेल्या कामाचे कौतुक नक्कीच व्हायला हवे, त्यांच्या धाडसाबद्दल त्यांना राष्ट्रीय पदकाने सन्मानित करण्यासाठी सर्व रेल्वे प्रवाशांततर्फे आम्ही मागणी करत आहोत.

'राष्ट्रपती पुरस्कार देण्याची मागणी'

उपनगरीय प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, पॉईंट्समन मयूर शेळके यांचा प्रवासी संघातर्फे आम्ही सत्कार केला आहे. तसेच मयूरच्या कार्याबद्दल त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळावा याकरीता आम्ही संघातर्फे प्रयत्न करणार आहोत. मात्र आता तरी या घटनेतून बोध घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा वाढवावी. याचबरोबर दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपाययोजना कराव्यात. जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.