ETV Bharat / state

आकसापोटीच विरोधी पक्षांच्या नेत्यांची चौकशी, पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका

निवडणुकांच्या कालावधीतच विरोधी पक्षातील नेत्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी केली जात असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

author img

By

Published : Aug 23, 2019, 6:52 PM IST

पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका

मुंबई - निवडणुकांच्या कालावधीतच विरोधी पक्षातील नेत्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी केली जात असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ही सर्व चौकशी आकसाने केली जात असल्याचा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला.

ईडी आणि सीबीआय या सरकारी चौकशी संस्था आहेत. त्यांच्याकडून होत असलेल्या कारवाई पाहिल्या तर ठराविक लोकांवर ही कारवाई होताना दिसत आहेत. भाजप सरकार ५ वर्षाहून अधिक काळ दिल्लीत सत्तेत आहे. त्यामुळे ते आकसाने हे सर्व करत आहे. आता निवडणुका जवळ आल्या असल्याने या चौकशी वाढल्याचे चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका

आम्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कितीतरी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यात कुठेही ईडी आणि सीबीआय ही अॅक्शन घेताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रातील सरकारकडून प्रत्येक संस्थेचा गैरवापर सुरू आहे. ज्याला इन्स्टिट्यूटशल कॅप्चर म्हणतात त्या, लोकशाहीच्या सर्व संस्था या लोकांनी हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे काम करण्याऐवजी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे काम केले जात आहे. हे फार धोकादायक असल्याचे चव्हाण म्हणाले.

सहकारी बँकांच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की, मी यावर माहिती आत्ता घेत आहे. राज्य सहकारी बँकेवर कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मी त्या जजमेंटची कॉपी पाहतोय. त्यात नेमके काय म्हटले आहे, त्यातही काही ठराविक लोकांवर कारवाई केली जाणार आहे का? कोणावर करायची नाही, हे पाहावे लागेल असेही चव्हाण म्हणाले.

शिवसेनेने नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे विधान केले आहे. त्यावर विचारले असता चव्हाण म्हणाले, की शिवसेनेची ही एक कायम स्टाईल आहे. ते कॅबीनेटमध्ये काही बोलत नाहीत आणि बाहेर येऊन लोकांना, आम्ही तुमचे कसे आहोत हे त्यांना दाखवायचे असते. जे मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी सरकारमध्ये असताना लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यामुळे मंत्रिमंडळात न बोलता बाहेर येऊन बोलणे, हा शिवसेनेचा निव्वळ दांभिकपणा असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

मुंबई - निवडणुकांच्या कालावधीतच विरोधी पक्षातील नेत्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी केली जात असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ही सर्व चौकशी आकसाने केली जात असल्याचा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला.

ईडी आणि सीबीआय या सरकारी चौकशी संस्था आहेत. त्यांच्याकडून होत असलेल्या कारवाई पाहिल्या तर ठराविक लोकांवर ही कारवाई होताना दिसत आहेत. भाजप सरकार ५ वर्षाहून अधिक काळ दिल्लीत सत्तेत आहे. त्यामुळे ते आकसाने हे सर्व करत आहे. आता निवडणुका जवळ आल्या असल्याने या चौकशी वाढल्याचे चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका

आम्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कितीतरी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यात कुठेही ईडी आणि सीबीआय ही अॅक्शन घेताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रातील सरकारकडून प्रत्येक संस्थेचा गैरवापर सुरू आहे. ज्याला इन्स्टिट्यूटशल कॅप्चर म्हणतात त्या, लोकशाहीच्या सर्व संस्था या लोकांनी हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे काम करण्याऐवजी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे काम केले जात आहे. हे फार धोकादायक असल्याचे चव्हाण म्हणाले.

सहकारी बँकांच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की, मी यावर माहिती आत्ता घेत आहे. राज्य सहकारी बँकेवर कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मी त्या जजमेंटची कॉपी पाहतोय. त्यात नेमके काय म्हटले आहे, त्यातही काही ठराविक लोकांवर कारवाई केली जाणार आहे का? कोणावर करायची नाही, हे पाहावे लागेल असेही चव्हाण म्हणाले.

शिवसेनेने नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे विधान केले आहे. त्यावर विचारले असता चव्हाण म्हणाले, की शिवसेनेची ही एक कायम स्टाईल आहे. ते कॅबीनेटमध्ये काही बोलत नाहीत आणि बाहेर येऊन लोकांना, आम्ही तुमचे कसे आहोत हे त्यांना दाखवायचे असते. जे मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी सरकारमध्ये असताना लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यामुळे मंत्रिमंडळात न बोलता बाहेर येऊन बोलणे, हा शिवसेनेचा निव्वळ दांभिकपणा असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

Intro:निवडणुकांच्या कालावधीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या चौकशा केल्या जातात - पृथ्वीराज चव्हाण

mh-mum-01-cong-pruthvirqj-byte-7201153 (mojoवर पाठवले आहे)

मुंबई, ता. २३ :
केंद्रात मागील पाच वर्षाहून अधिक काळ भाजपाचे सरकार दिल्लीत आहे. मात्र निवडणुकाच्या कालावधी तच विरोधीपक्ष आणि त्यांचे नेते यांच्या इडी आणि सीबीआयकडून चौकशी केल्या जात आहेत, आणि हे सर्व आकसाने केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुंबईत केला.
माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांना काल सीबीआयने केलेल्या अटकेनंतर काल आपण दिल्लीत होतो तर त्याच वेळी तिकडं मुंबईत राज ठाकरे यांची इडीकडून चौकशी केली होती पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील सरकार विरोधकांच्या जाणीवपूर्वक चौकशा लावत असल्याचा आरोप केला.सर्व काही आकसाने सुरू आहे, इडी आणि सीबीआय या सरकारी चौकशी संस्था आहेत, त्यांच्याकडून होत असलेल्या कारवाई पाहिल्या तर ठराविक लोकांवर ही कारवाई होताना दिसत आहेत. खरोखरच या चौकशी आणि त्यातून गुन्हा शोधून त्यांना शिक्षा दिली तर आपण पाहू शकतो, परंतु हे सरकार पाच वर्षे आणि त्याहून अधिक काळ दिल्लीत सतेत आहे, त्यामुळे ते आकसाने हे सर्व करत आहे. आता बरोबर निवडणुका आल्या की या चौकशी संस्थांच्या कारवाया वाढल्या आहेत. जे सरकारचे विरोधक आहेत, त्यांच्या विरोधातच कारवाई होताना दिसते.
आज आम्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही किती तरी तक्रारी नोंदवल्या आहेत, त्यात कुठेही इडी आणि सीबीआय ही अँक्शन घेताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रातील सरकारकडून प्रत्येक संस्थेचा गैरवापर सुरू आहे. ज्याला इन्स्टिट्यूटशल कॅप्चर म्हणतात त्या, लोकशाहीच्या सर्व संस्था या लोकांनी हस्तगत केल्या आहेत, त्यामुळे कायद्याप्रमाणे काम करायच्या ऐवजी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे काम केले जात आहे. हे फार धोकादायक असल्याचे चव्हाण म्हणाले.
सहकारी बँकांच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की, मी यावर माहिती आत्ता घेत आहे, आत्ता दिल्लीहून आलो आहे, जे काही वाचले ते माध्यमातूनच. राज्य सहकारी बँकेवर कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, मी त्या जजमेंट ची कॉपी पाहतोय, त्यात नेमके काय म्हटले आहे, त्यातही काही ठराविक लोकांवर कारवाई केली जाणार आहे का, आणि कोणावर करायची नाही, हे पाहावे लागेल
आज माहिती घेऊन पाहतो असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्ज माफी साठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे विधान केले आहे, त्यावर विचारले असता चव्हाण म्हणाले की, शिवसेनेची ही एक कायम स्टाईल आहे, ते कॅबिनेटमध्ये काही बोलत नाहीत, आणि बाहेर येऊन लोकांना आम्ही तुमचे कसे आहोत हे त्यांना दाखवायचे असते. लोकांनी त्यांच्या आमदार, खासदार यांना निवडून दिलेले आहे, त्यांनी आणि जे मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी सरकारमध्ये असताना लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्यामुळे मंत्रिमंडळात न बोलता बाहेर येऊन बोलणे, हा शिवसेनेचा निव्वळ दांभिकपणा असल्याचा आरोप त्यांनी केला.Body:निवडणुकांच्या कालावधीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या चौकशा केल्या जातात - पृथ्वीराज चव्हाण
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.