ETV Bharat / state

Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सरप्राईज देतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा, पवारांसोबत चर्चा

Prakash Ambedkar On PM Modi : एका कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी 'वंचित बहुजन आघाडी'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत भेट (Prakash Ambedkar and Sharad Pawar meet) घडवून आणली. भेटीनंतर 'वंचित' पक्ष महाविकास आघाडीत सामील होणार का? (Prakash Ambedkar) अशा चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीनंतर सरप्राईज देतील. हे सरप्राईज फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठीसुद्धा असेल, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 7:58 PM IST

Updated : Oct 21, 2023, 8:49 PM IST

Prakash Ambedkar On PM Modi
प्रकाश आंबेडकर

मुंबई : Prakash Ambedkar On PM Modi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईतील वाय. बी सेंटर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवार यांनाही आमंत्रण दिलं होतं. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाली. मात्र, 'इंडिया' आघाडीत सहभागी होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

फक्त कॉफी घेतली : कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉफी पिण्यासाठी बोलवलं होतं. त्या ठिकाणी शरद पवार देखील उपस्थित होते आणि आम्ही बाराजण त्या ठिकाणी होतो. 'इंडिया' आघाडी किंवा महाविकास आघाडीत येण्यासंदर्भात काही चर्चा झाली नाही. त्यामुळं त्या संदर्भात बोलणार नाही. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काहीतरी घडेल असं मला वाटत नाही. माझा भाजपाला कायम विरोध आहे. 'वंचित'ला काँग्रेस प्रवेश देणार नाही, अशा प्रकारची त्यांची जर धारणा असेल तर त्यांनी वाट बघत बसावी, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला लगावला आहे.

जरांगे पाटलांशी प्रामाणिक राहावं : मराठा आरक्षणा मुद्द्यावरून जरांगे पाटील यांना राज्यभर चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शासनानं जरांगे पाटलांशी इमानदारीनं बोलावं. आरक्षण आणि जातनिहाय जनगणना याचा कुठलाही संबंध नाही. बिहारच्या जातीनिहाय जनगणनेनुसार, असं समजतं की कुठलीही जात प्रबळ नाही. आरक्षणासंदर्भात शासनाने फसवू नये. मनोज जरांगे यांच्या निमित्तानं जे वादळ उभं राहिलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहावं. तरच ते नियंत्रित राहील नाहीतर ते शासनावर उलटेल, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिलाय.

भुजबळांनी सबुरीनं घ्यावं : अंतरवली सराटी येथील सभेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. सभेला फंडिंग कोण करतंय असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलता आला नाही. मात्र, त्यांनी छगन भुजबळ यांच्यामार्फत उपस्थित केला. इतर सगळ्यांना माझी विनंती आहे की, तुमचंही बाहेर काढायला ही माणसं वेळ लावणार नाही. जो राग आहे तो लक्षात घ्या, तुम्ही राग सांभाळायला शिका नाहीतर हे तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा सबुरीचा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना दिलाय.

शरद पवारांची भेट झाली : राज्यातील कंत्राटी नोकर भरतीवरून सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. अखेर सरकारनं तो निर्णय मागं घेतलाय. मात्र, सरकार अशा प्रकारची धूळफेक का करत होती? असं म्हणत उपमुख्यमंत्री पदही कंत्राटी पद्धतीनं दिलं पाहिजे. म्हणजे आपोआप अपप्रचार थांबेल, असंही आंबेडकर म्हणाले. मधल्या काळात देखील कर्नाटकविषयी शरद पवारांना माहिती हवी होती, त्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. Manoj Jarange Patil : चार वर्षांमध्ये ओबीसींची 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली? मनोज जरांगे पाटलांचा सवाल
  2. Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात संजय राऊत यांचे थेट लागेबांधे; संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
  3. BJP Leader Murder In Mohla Manpur : भाजपा नेत्याची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या; माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचा छत्तीसगड सरकारवर हल्लाबोल

मुंबई : Prakash Ambedkar On PM Modi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईतील वाय. बी सेंटर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवार यांनाही आमंत्रण दिलं होतं. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाली. मात्र, 'इंडिया' आघाडीत सहभागी होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

फक्त कॉफी घेतली : कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉफी पिण्यासाठी बोलवलं होतं. त्या ठिकाणी शरद पवार देखील उपस्थित होते आणि आम्ही बाराजण त्या ठिकाणी होतो. 'इंडिया' आघाडी किंवा महाविकास आघाडीत येण्यासंदर्भात काही चर्चा झाली नाही. त्यामुळं त्या संदर्भात बोलणार नाही. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काहीतरी घडेल असं मला वाटत नाही. माझा भाजपाला कायम विरोध आहे. 'वंचित'ला काँग्रेस प्रवेश देणार नाही, अशा प्रकारची त्यांची जर धारणा असेल तर त्यांनी वाट बघत बसावी, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला लगावला आहे.

जरांगे पाटलांशी प्रामाणिक राहावं : मराठा आरक्षणा मुद्द्यावरून जरांगे पाटील यांना राज्यभर चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शासनानं जरांगे पाटलांशी इमानदारीनं बोलावं. आरक्षण आणि जातनिहाय जनगणना याचा कुठलाही संबंध नाही. बिहारच्या जातीनिहाय जनगणनेनुसार, असं समजतं की कुठलीही जात प्रबळ नाही. आरक्षणासंदर्भात शासनाने फसवू नये. मनोज जरांगे यांच्या निमित्तानं जे वादळ उभं राहिलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहावं. तरच ते नियंत्रित राहील नाहीतर ते शासनावर उलटेल, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिलाय.

भुजबळांनी सबुरीनं घ्यावं : अंतरवली सराटी येथील सभेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. सभेला फंडिंग कोण करतंय असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलता आला नाही. मात्र, त्यांनी छगन भुजबळ यांच्यामार्फत उपस्थित केला. इतर सगळ्यांना माझी विनंती आहे की, तुमचंही बाहेर काढायला ही माणसं वेळ लावणार नाही. जो राग आहे तो लक्षात घ्या, तुम्ही राग सांभाळायला शिका नाहीतर हे तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा सबुरीचा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना दिलाय.

शरद पवारांची भेट झाली : राज्यातील कंत्राटी नोकर भरतीवरून सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. अखेर सरकारनं तो निर्णय मागं घेतलाय. मात्र, सरकार अशा प्रकारची धूळफेक का करत होती? असं म्हणत उपमुख्यमंत्री पदही कंत्राटी पद्धतीनं दिलं पाहिजे. म्हणजे आपोआप अपप्रचार थांबेल, असंही आंबेडकर म्हणाले. मधल्या काळात देखील कर्नाटकविषयी शरद पवारांना माहिती हवी होती, त्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. Manoj Jarange Patil : चार वर्षांमध्ये ओबीसींची 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली? मनोज जरांगे पाटलांचा सवाल
  2. Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात संजय राऊत यांचे थेट लागेबांधे; संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
  3. BJP Leader Murder In Mohla Manpur : भाजपा नेत्याची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या; माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचा छत्तीसगड सरकारवर हल्लाबोल
Last Updated : Oct 21, 2023, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.