ETV Bharat / state

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 48, 836 मुंबईकरांवर पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Aug 27, 2020, 12:34 PM IST

राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबई शहरात 20 मार्च ते 26 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 हजार 895 प्रकरणात तब्बल 48 हजार 836 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांची कारवाई
पोलिसांची कारवाई

मुंबई - कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला गेला आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 154 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबई शहरात 20 मार्च ते 26 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 हजार 895 प्रकरणात तब्बल 48 हजार 836 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करुन फरार झालेल्या 8 हजार 168 लोकांचा पोलीस शोध घेत असून तब्बल 19 हजार 120 जणांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर 21 हजार 548 जणांना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.

लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार, मुंबईतील दक्षिण मुंबईत 1 हजार 914 गुन्हे दाखल करण्यात आले असून मध्य मुंबईत 2 हजार 636 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, पूर्व मुंबईत तब्बल 3 हजार 344 गुन्हे, पश्चिम मुंबईत 3 हजार 493 उत्तर मुंबईत 9 हजार 508 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचा - 'पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे, हा तर नवा राजकीय कोरोना'

मुंबई - कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला गेला आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 154 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबई शहरात 20 मार्च ते 26 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 हजार 895 प्रकरणात तब्बल 48 हजार 836 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करुन फरार झालेल्या 8 हजार 168 लोकांचा पोलीस शोध घेत असून तब्बल 19 हजार 120 जणांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर 21 हजार 548 जणांना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.

लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार, मुंबईतील दक्षिण मुंबईत 1 हजार 914 गुन्हे दाखल करण्यात आले असून मध्य मुंबईत 2 हजार 636 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, पूर्व मुंबईत तब्बल 3 हजार 344 गुन्हे, पश्चिम मुंबईत 3 हजार 493 उत्तर मुंबईत 9 हजार 508 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचा - 'पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे, हा तर नवा राजकीय कोरोना'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.