ETV Bharat / state

सचिन वाझेंना ऑपरेट करणारे राजकीय बॉस कोण -देवेंद्र फडणवीस - devendra fadnavis sachin vaze delhi pc

सचिन वाझेंनी मनसुखकडून तक्रार नोंदविण्यास सांगितले. ज्या दिवशी मनसुखला रात्री एक फोन आला की गावडेने तुम्हाला बोलाविले आहे, तो तोच एरीआ आहे, ज्या एरिआत वाझेंवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गावडेंनी बोलविल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 17, 2021, 6:32 PM IST

Updated : Mar 17, 2021, 7:58 PM IST

दिल्ली : महाविकास आघाडी सरकार पत्रकारपरिषदेत सचिन वाझेंचा बचाव करत होते. याचा काय अर्थ आहे? हेदेखील तपास यंत्रणांना शोधावे लागेल. सचिन वाझेंना ऑपरेट करणारे लोक सरकारमध्ये बसले आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह याची उचलबांगणी करण्यात आली. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले फडणवीस?

यावेळी फडणवीस म्हणाले की, सचिन वाझेंनी मनसुखकडून तक्रार नोंदविण्यास सांगितले. ज्या दिवशी मनसुखला रात्री एक फोन आला की गावडेने तुम्हाला बोलाविले आहे, तो तोच परिसर आहे, ज्या परिसरात वाझेंवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गावडेंनी बोलविल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. मनसुख यांचा खून झाला आहे. पोलिसांच्या दबावात मनसुख यांचा मृतदेह वाहून गेला नाही. शवविच्छेदनाचा अहवाल पाहिला तर इतके रुमाल त्यांच्या तोंडात कसे आले. त्यांना दाबून बांधण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात पाणी नाही. जर खाडीतील पाणीत पडून ते मेले असते तर फुफ्फुसात पाणी असते. मात्र, त्यात पाणी नाही. त्यांचा खून झाला आहे, असा दावाही फडणवीसांनी केला.

हेही वाचा - स्कॉर्पिओ, इनोव्हा, मर्सडीज 'या' ३ कारमध्ये दडलेय वाझे प्रकरणाचे गुढ

मनसुख प्रकरणाचा तपासही एनआयएने करावा -

हत्येचे प्रकरण एटीएसकडे आहे. एटीएसने कारवाई केली नाही. जर माझ्याकडे इतके पुरावे आहेत तर पोलिसांजवळ खूप पुरावे आहेत. मनसुखची आवाजाची टेप तपास यंत्रणांकडे आहे. त्यात वाझेंचाही आवाज आहे. इतके सारे पुरावे असताना, तपासाला पुरेसी गती मिळताना दिसत नाही आहे. हे दोन्ही कनेक्टेट प्रकरणे आहेत. ते प्रकरणही एनआयएने घ्यावे. यात आणखी कोण-कोण आहे, याचा शोध घ्यायला हवा. तपास म्हणजे हे पोलिसांचे अपयश नसून सरकारचे अपयश आहे. कारण, ज्या व्यक्तीचा भूतकाळ असा आहे, तरी त्याला इतके मोठे प्रकरण सोपविले गेले, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त

दिल्ली : महाविकास आघाडी सरकार पत्रकारपरिषदेत सचिन वाझेंचा बचाव करत होते. याचा काय अर्थ आहे? हेदेखील तपास यंत्रणांना शोधावे लागेल. सचिन वाझेंना ऑपरेट करणारे लोक सरकारमध्ये बसले आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह याची उचलबांगणी करण्यात आली. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले फडणवीस?

यावेळी फडणवीस म्हणाले की, सचिन वाझेंनी मनसुखकडून तक्रार नोंदविण्यास सांगितले. ज्या दिवशी मनसुखला रात्री एक फोन आला की गावडेने तुम्हाला बोलाविले आहे, तो तोच परिसर आहे, ज्या परिसरात वाझेंवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गावडेंनी बोलविल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. मनसुख यांचा खून झाला आहे. पोलिसांच्या दबावात मनसुख यांचा मृतदेह वाहून गेला नाही. शवविच्छेदनाचा अहवाल पाहिला तर इतके रुमाल त्यांच्या तोंडात कसे आले. त्यांना दाबून बांधण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात पाणी नाही. जर खाडीतील पाणीत पडून ते मेले असते तर फुफ्फुसात पाणी असते. मात्र, त्यात पाणी नाही. त्यांचा खून झाला आहे, असा दावाही फडणवीसांनी केला.

हेही वाचा - स्कॉर्पिओ, इनोव्हा, मर्सडीज 'या' ३ कारमध्ये दडलेय वाझे प्रकरणाचे गुढ

मनसुख प्रकरणाचा तपासही एनआयएने करावा -

हत्येचे प्रकरण एटीएसकडे आहे. एटीएसने कारवाई केली नाही. जर माझ्याकडे इतके पुरावे आहेत तर पोलिसांजवळ खूप पुरावे आहेत. मनसुखची आवाजाची टेप तपास यंत्रणांकडे आहे. त्यात वाझेंचाही आवाज आहे. इतके सारे पुरावे असताना, तपासाला पुरेसी गती मिळताना दिसत नाही आहे. हे दोन्ही कनेक्टेट प्रकरणे आहेत. ते प्रकरणही एनआयएने घ्यावे. यात आणखी कोण-कोण आहे, याचा शोध घ्यायला हवा. तपास म्हणजे हे पोलिसांचे अपयश नसून सरकारचे अपयश आहे. कारण, ज्या व्यक्तीचा भूतकाळ असा आहे, तरी त्याला इतके मोठे प्रकरण सोपविले गेले, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त

Last Updated : Mar 17, 2021, 7:58 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.