ETV Bharat / state

Rana Couple Violated Conditions : राणा दांपत्याचा जमीन का रद्द करण्यात येऊ नये, उत्तर द्या; न्यायालयाची विचारणा

author img

By

Published : May 9, 2022, 2:58 PM IST

Updated : May 9, 2022, 5:38 PM IST

रवी-नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले ( Ravi-Navneet Rana have violated the bail condition ) आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असा अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केला ( Mumbai Police has filed an application ) आहे. त्या नुसार न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे.

rana couple
राणा दाम्पत्या विरोधात अर्ज

मुंबई - रवी-नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले ( Rana Couple Violated Conditions ) आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असा अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केला ( Mumbai Police has filed an application ) आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये, याविषयी त्यांचे म्हणणे मागितले आहे.


न्यायालयाची विचारणा - आज मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याविरोधात नोटीस काढली असून जमीन का रद्द करण्यात येऊ नये यासंदर्भात विचारले आहे 18 मे पर्यंत राणा दाम्पत्यांना नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य यांचे जामीन रद्द होते, काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत. राणा दाम्पत्याने मीडियाशी बोलू नये याच अटीशर्तीवर राणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तरीही नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यानंतर जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारतर्फे कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना आव्हान - राणांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावे आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवे, उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील, तेथे मी उभी राहून जिंकून दाखवते असेही नवनीत राणा यांनी म्हटले होते.

विशेष सरकारी वकिल प्रदिप भगत यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यावरून राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचले होते. पण शिसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील घरीच रोखून धरले. त्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अखेर 12 दिवसानंतर राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांना याप्रकरणी माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. नाहीतर त्यांचा जामीन रद्द केला जाईल असे न्यायालयाने म्हटले होते. पण नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा तसेच वक्तव्य केले. माध्यमांसोबत बोलून जामीनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा असा युक्तीवाद सरकारी वकील घरत यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस पाठवली आहे. आता राणा दाम्पत्यांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

न्यायालयाच्या शर्तीचे उलंघन - जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे त्यांनी जामीन देता वेळी न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे न्यायालयाने राणा पती पत्नीच्या नावे अजामीनपात्र वॉरंट काढावे अशी मागणी केले असल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.

14 वर्ष तुरुंगात रहायला तयार - नवनीत राणा यांनी म्हणले आहे की, मी अशी काय चूक केली होती, हनुमान चालीसा वाचणे आणि श्रीरामाचे नाव घेणे यासाठी मला 14 दिवसासाठी जेलमध्ये ठेवले, हा जर गुन्हा असेल तर मी चौदा दिवस नाही 14 वर्ष तुरुंगात रहायला तयार आहे. एखाद्या महिलेला राज्यसरकार दाबू शकत नाही, ही लढाई मी पुढेही सुरुच ठेवेल, माझ्यावर क्रूर बुद्धीने कारवाई करण्यात आली. मला अजूनही त्रास होतोय मात्र डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे.

  • Mumbai Sessions Court issues notice to MLA Ravi Rana and MP Navneet Rana seeking their say on why a Non-Bailable Warrant should not be issued against them as they have allegedly violated the conditions of the bail given to them.

    — ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आपले काम राज्य सरकारच्या विरोधात असेच सुरू ठेऊ' मुख्यमंत्र्यांनी अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला तुरुंगात डांबले. खुद्द न्यायालयाने सांगितले आहे की, राजद्रोहाचा गुन्हा आमच्यावर होऊ शकत नाही. मात्र राज्य सरकारने क्रूर बुद्धीने आमच्यावर कारवाई केली. या कारवाईनंतर ही आपण राज्य सरकारला घाबरणार नाही. आपले काम राज्य सरकारच्या विरोधात असेच सुरू ठेऊ असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.

असली-नकली सांगण्याची वेळ आली - आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोध्येत लावण्यात आलेल्या बॅनरवर देखील नवनीत राणा यांनी टीका केली होती, शिवसेनेला असली कोण? आणि नकली कोण? हे सांगण्यासाठी आता बॅनरबाजी करावी लागत आहे. मात्र बाळासाहेब हे एकटेच असली नेते होते. आता शिवसेनेत केवळ नकली लोक उरली आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता.

हेही वाचा - BMC Officer Inspected Rana House : राणांच्या घराची महापालिका अधिकाऱ्यांकडून तपासणी; अहवालानंतर बजावणार नोटीस

'शिवसेनेच्या विरोधात प्रचारामध्ये उतरेण' - मुख्यमंत्र्यांना आव्हान देते त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीला कुठेही उभे रहावे मी त्यांच्या विरोधात उभी राहिल, तसेच मुख्यमंत्र्यांना महिलांची ताकद काय असते ? हे आपण दाखवून देऊ. आधी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची लंका उध्वस्त करेल, त्यासाठी शिवसेनेच्या विरोधात प्रचारामध्ये उतरेण, कारण मुंबई महापालिकेत शिवसेनेने मोठा भ्रष्टाचार केला आहे. मी मुंबईची मुलगी आहे त्यांना त्यांची जागा दाखवेन असेही राणा यांनी यावेळी स्पष्ट केले.


राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना - पोलीस ठाणे, तुरुंगात आमच्याशी गैरव्यवहार झाला आहे. याबाबतची सर्व माहिती दिल्लीत जाऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज दिल्लाला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारविरोधात राणा दाम्पत्य दिल्लीत दरबारी तक्रार करणार आहेत.

हेही वाचा -Rana Couple Fly to Delhi : राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना; आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही - नवनीत राणा

मुंबई - रवी-नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले ( Rana Couple Violated Conditions ) आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असा अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केला ( Mumbai Police has filed an application ) आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये, याविषयी त्यांचे म्हणणे मागितले आहे.


न्यायालयाची विचारणा - आज मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याविरोधात नोटीस काढली असून जमीन का रद्द करण्यात येऊ नये यासंदर्भात विचारले आहे 18 मे पर्यंत राणा दाम्पत्यांना नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य यांचे जामीन रद्द होते, काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत. राणा दाम्पत्याने मीडियाशी बोलू नये याच अटीशर्तीवर राणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तरीही नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यानंतर जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारतर्फे कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना आव्हान - राणांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावे आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवे, उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील, तेथे मी उभी राहून जिंकून दाखवते असेही नवनीत राणा यांनी म्हटले होते.

विशेष सरकारी वकिल प्रदिप भगत यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यावरून राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचले होते. पण शिसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील घरीच रोखून धरले. त्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अखेर 12 दिवसानंतर राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांना याप्रकरणी माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. नाहीतर त्यांचा जामीन रद्द केला जाईल असे न्यायालयाने म्हटले होते. पण नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा तसेच वक्तव्य केले. माध्यमांसोबत बोलून जामीनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा असा युक्तीवाद सरकारी वकील घरत यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस पाठवली आहे. आता राणा दाम्पत्यांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

न्यायालयाच्या शर्तीचे उलंघन - जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे त्यांनी जामीन देता वेळी न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे न्यायालयाने राणा पती पत्नीच्या नावे अजामीनपात्र वॉरंट काढावे अशी मागणी केले असल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.

14 वर्ष तुरुंगात रहायला तयार - नवनीत राणा यांनी म्हणले आहे की, मी अशी काय चूक केली होती, हनुमान चालीसा वाचणे आणि श्रीरामाचे नाव घेणे यासाठी मला 14 दिवसासाठी जेलमध्ये ठेवले, हा जर गुन्हा असेल तर मी चौदा दिवस नाही 14 वर्ष तुरुंगात रहायला तयार आहे. एखाद्या महिलेला राज्यसरकार दाबू शकत नाही, ही लढाई मी पुढेही सुरुच ठेवेल, माझ्यावर क्रूर बुद्धीने कारवाई करण्यात आली. मला अजूनही त्रास होतोय मात्र डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे.

  • Mumbai Sessions Court issues notice to MLA Ravi Rana and MP Navneet Rana seeking their say on why a Non-Bailable Warrant should not be issued against them as they have allegedly violated the conditions of the bail given to them.

    — ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आपले काम राज्य सरकारच्या विरोधात असेच सुरू ठेऊ' मुख्यमंत्र्यांनी अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला तुरुंगात डांबले. खुद्द न्यायालयाने सांगितले आहे की, राजद्रोहाचा गुन्हा आमच्यावर होऊ शकत नाही. मात्र राज्य सरकारने क्रूर बुद्धीने आमच्यावर कारवाई केली. या कारवाईनंतर ही आपण राज्य सरकारला घाबरणार नाही. आपले काम राज्य सरकारच्या विरोधात असेच सुरू ठेऊ असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.

असली-नकली सांगण्याची वेळ आली - आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोध्येत लावण्यात आलेल्या बॅनरवर देखील नवनीत राणा यांनी टीका केली होती, शिवसेनेला असली कोण? आणि नकली कोण? हे सांगण्यासाठी आता बॅनरबाजी करावी लागत आहे. मात्र बाळासाहेब हे एकटेच असली नेते होते. आता शिवसेनेत केवळ नकली लोक उरली आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता.

हेही वाचा - BMC Officer Inspected Rana House : राणांच्या घराची महापालिका अधिकाऱ्यांकडून तपासणी; अहवालानंतर बजावणार नोटीस

'शिवसेनेच्या विरोधात प्रचारामध्ये उतरेण' - मुख्यमंत्र्यांना आव्हान देते त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीला कुठेही उभे रहावे मी त्यांच्या विरोधात उभी राहिल, तसेच मुख्यमंत्र्यांना महिलांची ताकद काय असते ? हे आपण दाखवून देऊ. आधी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची लंका उध्वस्त करेल, त्यासाठी शिवसेनेच्या विरोधात प्रचारामध्ये उतरेण, कारण मुंबई महापालिकेत शिवसेनेने मोठा भ्रष्टाचार केला आहे. मी मुंबईची मुलगी आहे त्यांना त्यांची जागा दाखवेन असेही राणा यांनी यावेळी स्पष्ट केले.


राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना - पोलीस ठाणे, तुरुंगात आमच्याशी गैरव्यवहार झाला आहे. याबाबतची सर्व माहिती दिल्लीत जाऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज दिल्लाला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारविरोधात राणा दाम्पत्य दिल्लीत दरबारी तक्रार करणार आहेत.

हेही वाचा -Rana Couple Fly to Delhi : राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना; आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही - नवनीत राणा

Last Updated : May 9, 2022, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.