मुंबई - मुंबई शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईत रोज शेकडो कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असल्याने राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने उघडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही दुकाने उघडू नये असे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. नागरिकांकडून सुरक्षित अंतर न पाळणे, दुकानांमध्ये गर्दी करणे, लॉकडाऊनचे नियम न पाळणे यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
![No shops will be opened in Mumbai except for essential services said bmc](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-06-mumbai-shops-7205149_05052020221607_0505f_1588697167_988.png)
मुंबईत कोरोनाचे 9 हजार 758 रुग्ण असून 387 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना देशभरात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा कालावधी वाढवताना लॉकडाऊनमधून काही शिथिथीलता देत अत्यावश्यक सेवे बरोबर अत्यावश्यक सेवा नसलेली एका रस्त्यावरील 5 दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
![No shops will be opened in Mumbai except for essential services said bmc](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-06-mumbai-shops-7205149_05052020221607_0505f_1588697167_868.png)