ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाची निकाल प्रक्रिया सुधारणार, ३ आठवड्यात १०७ विषयांचे निकाल जाहीर - निकाल

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिरंगाई करणारे विद्यापीठ अशी मुंबई विद्यापीठाची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख पुसण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासाठी विद्यापीठाने १०७ विषयांच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर केले आहेत.

Mumbai University
author img

By

Published : Feb 2, 2019, 11:49 AM IST

मुंबई - परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिरंगाई करणारे विद्यापीठ अशी मुंबई विद्यापीठाची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख पुसण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासाठी विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि त्यादरम्यानच्या काळात घेतलेल्या तब्बल १०७ विषयांच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर केले आहेत.

Mumbai University
undefined

शुक्रवारी विद्यापीठाकडून अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या बी.कॉमच्या पाचव्या (सीबीएसजीएस) आणि सहाव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर केला. या दोन्हीही सेमिस्टरची परीक्षा ही ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १० हजार ४२३ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले होते. तर ८ हजार ३५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. टीवाय. बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरचा निकाल ३५.०५ टक्के निकाल लागला. तर टीवाय.बीकॉमच्या (सीबीएसजीएस) सहाव्या सेमिस्टरचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १३ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले होते. त्यामधून ९ हजार ९७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सहाव्या सेमिस्टरचा निकाल ४७.९३ टक्के लागल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

४ दिवसांपूर्वीच विद्यापीठाने तृतीय वर्ष बी.कॉमचा पाचव्या सेमिस्टर परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या सेमिस्टर परीक्षेत ५७,१६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५६,५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात ३१,९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ५७.११ टक्के इतकी होती. विद्यापीठाकडून आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये त्या-त्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. विद्यापीठाकडील ४ विषयाच्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले असल्याने हे निकाल लवकर लागत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

undefined

मुंबई - परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिरंगाई करणारे विद्यापीठ अशी मुंबई विद्यापीठाची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख पुसण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासाठी विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि त्यादरम्यानच्या काळात घेतलेल्या तब्बल १०७ विषयांच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर केले आहेत.

Mumbai University
undefined

शुक्रवारी विद्यापीठाकडून अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या बी.कॉमच्या पाचव्या (सीबीएसजीएस) आणि सहाव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर केला. या दोन्हीही सेमिस्टरची परीक्षा ही ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १० हजार ४२३ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले होते. तर ८ हजार ३५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. टीवाय. बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरचा निकाल ३५.०५ टक्के निकाल लागला. तर टीवाय.बीकॉमच्या (सीबीएसजीएस) सहाव्या सेमिस्टरचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १३ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले होते. त्यामधून ९ हजार ९७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सहाव्या सेमिस्टरचा निकाल ४७.९३ टक्के लागल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

४ दिवसांपूर्वीच विद्यापीठाने तृतीय वर्ष बी.कॉमचा पाचव्या सेमिस्टर परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या सेमिस्टर परीक्षेत ५७,१६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५६,५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात ३१,९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ५७.११ टक्के इतकी होती. विद्यापीठाकडून आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये त्या-त्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. विद्यापीठाकडील ४ विषयाच्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले असल्याने हे निकाल लवकर लागत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

undefined
Intro:मुंबई विद्यापीठाची निकाल प्रक्रिया सुधारली Body:मुंबई विद्यापीठाची निकाल प्रक्रिया सुधारली
मागील तीन आठवड्यात १०७ निकाल जाहीर

मुंबई, ता. १ :
परीक्षा आणि त्यानंतर त्यांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्याची ओळख असलेले मुंबई विद्यापीठ आपली ही ओळख पुसून टाकण्याच्या मार्गावर आहे. विद्यापीठात ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि त्यादरम्यानच्या काळात घेतलेल्या तब्बल १०७ विषयांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करून आता आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
आज विद्यापीठाकडून अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या बी.कॉमच्या पाचव्या (सीबीएसजीएस) आणि सहाव्या सेमिस्टरचा जाहीर करण्यात आला
या दोन्हीही सेमिस्टरची परीक्षा ही ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १० हजार ४२३ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदविले होते. तर ८ हजार ३५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. या टीवाय. बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरचा ३५.०५ टक्के निकाल लागला. दरम्यान, यावेळी टीवाय.बीकॉमच्या (सीबीएसजीएस) सहाव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर करण्यात आले. ही परीक्षा ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १३ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवीले होते. त्यामधून ९ हजार ९७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सहाव्या सेमिस्टरचा ४७.९३ टक्के निकाल लागल्याचे मुंबई विद्यापीठाच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वीच विद्यापीठाने तृतीय वर्ष बी.कॉम पाचव्या सेमिस्टर या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या सेमिस्टरच्या परीक्षेत ५७,१६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५६,५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील ३१,९६५ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ५७.११ टक्के इतकी होती.
विद्यापीठाकडून आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये त्या-त्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. विद्यापीठाकडच्या चार विषयाच्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले असल्याने हे निकाल लवकर लागत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.Conclusion:मुंबई विद्यापीठाची निकाल प्रक्रिया सुधारली
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.