ETV Bharat / state

Javed Akhtar : जावेद अख्तर यांना मुलुंड न्यायालयाचे समन्स; न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

author img

By

Published : Dec 14, 2022, 8:16 AM IST

जावेद अख्तर यांच्या विरोधात समन्स जारी ( Summons issued against Javed Akhtar ) केले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Javed Akhtar
जावेद अख्तर

मुंबई : प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर ( Famous poet and lyricist Javed Akhtar ) यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (Mulund Metropolitan Magistrate Court) जावेद अख्तर यांच्या विरोधात समन्स जारी केले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. जावेद अख्तर यांना 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.


प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश : या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात वकील संतोष दुबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने जावेद अख्तर यांना दिले असल्याने यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.



काय आहे प्रकरण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे. असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे.


अख्तर यांचे शब्द नक्की काय होते ? तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.

मुंबई : प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर ( Famous poet and lyricist Javed Akhtar ) यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (Mulund Metropolitan Magistrate Court) जावेद अख्तर यांच्या विरोधात समन्स जारी केले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. जावेद अख्तर यांना 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.


प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश : या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात वकील संतोष दुबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने जावेद अख्तर यांना दिले असल्याने यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.



काय आहे प्रकरण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे. असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे.


अख्तर यांचे शब्द नक्की काय होते ? तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.