मुंबई - मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली.
'मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे
मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.
रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकेच नाही. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक नसून हे प्रत्येकावर अवलंबून असेल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई - मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.
रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकेच नाही. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक नसून हे प्रत्येकावर अवलंबून असेल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
आज मंत्रिमंडळाला मी अवगत केली
२०१७ च्या जीआरप्रमाणे मुंबई २४ तास सुरू व्हायला पाहीजे होती
आता ऑनलाईन विक्रेते आपला व्यवसाय करत असतात
काही मंत्र्यांनी हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले
मी २०१३ मध्ये यासाठीची संकपल्पना मांडली हेाती
मुंबई ही २४ तास चालू असणारे शहर आहे
मुंबई कधी बंद होत नाही
रात्रीच्या वेळा आपल्याला कधी काही मिळत नाही, त्यातच
मुंबई ही एक सेफ सीटी आहे. महिला, पुरूष सुरक्षीत असतात
जे पर्यटक येतात, ते ३६ तास येऊन निघून जातात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी संकल्पना आणली
जे कोणती शॉप आणि मॉल तसेच
जे बिगरर हिवासी असे दुकाने, थिएटर यांना यासाठीच संधी देणार आहोत. आपण त्यांना २४ तास खुले राहण्यासाठी मुभा देणार आहोत
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो,
यात बेस्ट, टॅक्सी आणि याची सेवा वाढेल, यातून रोजगार मिळतील
कायदा सुव्यवस्था याचा कुठेही प्रश्न येणार नाही. पब आणि बार यांना वगळण्यात आलेले आहेत.
पोलीस सध्या रात्री दीड वाजता दुकाने सुरू आहेत का ते पाहतात, त्यामुळे त्यांचा व्याप कमी होणार आहे
या लोकांना पोलीस संरक्षण हवे असल्यास ती दिली जाणार आहे
महाविकास आघाडी हे जनतेचे सरकार आहे.
आत्तापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी भाजपाच्या काळात तरुण विरोधी झाल्या
आम्ही मात्र तरुणांना संधी देत आहोत..
कायद्याचे कुठेही उल्लंघन झाले तर त्याला कायमस्वरूपी बंदी आणली जाईल.
*****
अनिल देशमुख ...
आज सविस्तर चर्चा झाली
अनेक मंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत..
आज मंत्रिमंडळात मुंबई २४ तास यावर चर्चा झाली याची सविस्तर माहिती ज्यांनी हा विषय त्यांनी समजून घेतला...
बीकेसी, नरीमन पाईंट अशा दोन ठिकाणी २७ तारखेपासून आम्ही पहिला टप्पा सुरू करणार आहोत. ज्याला वाटेल तेच लोक आपली दुकाने सुरू ठेवतील..
Body:आदित्य ठाकरे पत्रकार परिषदConclusion: