ETV Bharat / state

'राज्यात लॉकडाऊन आणखी वाढणार, पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज'

येत्या १७ तारखेला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर काय होणार असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लॉकडाऊन वाढीचे संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा आहे.

author img

By

Published : May 13, 2020, 8:00 AM IST

Lockdown in maharashtra will  extended d
राज्यात लॉकडाऊन आणखी वाढणार

मुंबई - येत्या १७ तारखेला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर काय होणार असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लॉकडाऊन वाढीचे संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे त्यांनी संवाद साधला. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही सामना करावा लागेल. यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील, हे पाहावे असेही ते म्हणाले. आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी औरंगाबादमधून या कॉन्फरन्सिंमध्ये सहभागी होऊन आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल, असा मुद्दा मांडला. तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी विचार मांडले.

पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडण्यात येणार नाहीत. याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले, की आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे येणे- जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे, आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात कोरोना रुग्णांची मोठी संख्या पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. मात्र, येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते, हे पाहावे लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल, तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. एकीकडे आरोग्य आणीबाणी आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यावसायही सुरु करावे लागत आहेत. मात्र, ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोनमध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे, पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.

राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे. मात्र, आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत. तसेच एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत, त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल, असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. असेही ते म्हणाले.

गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली. आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा. एकीकडे उद्योग सरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे, हे पाहा आणि स्थानिकांमधून कामगार उपलब्ध करून द्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - येत्या १७ तारखेला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर काय होणार असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लॉकडाऊन वाढीचे संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे त्यांनी संवाद साधला. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही सामना करावा लागेल. यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील, हे पाहावे असेही ते म्हणाले. आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी औरंगाबादमधून या कॉन्फरन्सिंमध्ये सहभागी होऊन आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल, असा मुद्दा मांडला. तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी विचार मांडले.

पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडण्यात येणार नाहीत. याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले, की आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे येणे- जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे, आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात कोरोना रुग्णांची मोठी संख्या पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. मात्र, येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते, हे पाहावे लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल, तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. एकीकडे आरोग्य आणीबाणी आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यावसायही सुरु करावे लागत आहेत. मात्र, ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोनमध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे, पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.

राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे. मात्र, आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत. तसेच एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत, त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल, असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. असेही ते म्हणाले.

गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली. आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा. एकीकडे उद्योग सरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे, हे पाहा आणि स्थानिकांमधून कामगार उपलब्ध करून द्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.