मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही रुग्णांची संख्या वाढत असून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात मोठ्या संख्येने रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात संचारबंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडाभरासाठी बंद करण्यात आलेली आहे.
बाजार समिती बंद असल्याने मुंबईमध्ये होणारा भाजीपाला व फळांचा पुरवठा काही प्रमाणात कमी झालेला आहे. मुंबईतल्या भायखळा मंडई येथे पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेतच फळे पालेभाज्यांचा पुरवठा केला जात आहे. भायखळा मंडई येथून याचाआढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.