ETV Bharat / state

Governor Bais On Maan Ki Baat: स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी जगाचा भारताप्रति दृष्टिकोन बदलला: राज्यपाल रमेश बैस

author img

By

Published : Apr 30, 2023, 5:19 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाच वेळी अनेक क्रांतिकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरू करून एक अभेद्य जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील विश्वधर्म संमेलनातील भाषणातून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे उद्‌गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज (रविवारी) राजभवन येथे काढले.

Governor Bais On Man Ki Baat
राज्यपाल रमेश बैस

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील 'मन की बात' या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामूहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा या दृष्टीने पंतप्रधानांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील आणि अपस्कीलचा मंत्र दिला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 'मन की बात' चे ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा रेडिओवरून प्रसारण झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. देशाला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून लाभले हे देशाचे सौभाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


लोकांची विकासाची चळवळ: स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पाण्याची बचत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह, खादी, भारतीय खेळण्यांचा उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष तसेच अंतराळातील प्रगती यांसह अनेक विषयांवर मोदी यांनी 'मन की बात' मधून भाष्य केले. संवादात्मक शैलीमुळे पंतप्रधान मोदी 'परीक्षेवर चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचले, असे राज्यपालांनी सांगितले. तसेच 'मन की बात' ही खऱ्या अर्थाने लोकांची विकासाची चळवळ झाली आहे, असे सांगून कार्यक्रमाचा शंभरावा भाग ही देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


अनेक मान्यवरांची उपस्थिती: यावेळी चित्रपट सृष्टीतील कलावंत माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौंडवाल आदी उपस्थित होते. तसेच हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, 'डिक्की'चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, 'मन की बात' कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा: Lakshmanrao Inamdar: कोण आहेत लक्ष्मण राव इनामदार? ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरू मानतात...

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील 'मन की बात' या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामूहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा या दृष्टीने पंतप्रधानांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील आणि अपस्कीलचा मंत्र दिला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 'मन की बात' चे ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा रेडिओवरून प्रसारण झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. देशाला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून लाभले हे देशाचे सौभाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


लोकांची विकासाची चळवळ: स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पाण्याची बचत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह, खादी, भारतीय खेळण्यांचा उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष तसेच अंतराळातील प्रगती यांसह अनेक विषयांवर मोदी यांनी 'मन की बात' मधून भाष्य केले. संवादात्मक शैलीमुळे पंतप्रधान मोदी 'परीक्षेवर चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचले, असे राज्यपालांनी सांगितले. तसेच 'मन की बात' ही खऱ्या अर्थाने लोकांची विकासाची चळवळ झाली आहे, असे सांगून कार्यक्रमाचा शंभरावा भाग ही देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


अनेक मान्यवरांची उपस्थिती: यावेळी चित्रपट सृष्टीतील कलावंत माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौंडवाल आदी उपस्थित होते. तसेच हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, 'डिक्की'चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, 'मन की बात' कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा: Lakshmanrao Inamdar: कोण आहेत लक्ष्मण राव इनामदार? ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरू मानतात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.