ETV Bharat / state

नवी मुंबईत दिवसभर मुसळधार; शीव-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी - sayan rain

बुधवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांना धडकी भरवली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने शीव-पनवेल महामार्गावर कोंडी झाली होती. नवी मुंबईतील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली होती.

महामार्गावर वाहतूक कोंडी
author img

By

Published : Jul 24, 2019, 8:20 PM IST

मुंबई - बुधवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांना धडकी भरवली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने शीव-पनवेल महामार्गावर कोंडी झाली होती. नवी मुंबईतील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली होती.

नवी मुंबईत दिवसभर कोसळधार

बऱ्याच दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा एंट्री करणाऱ्या पावसाने सकाळपासूनच मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईवर 'धार' धरली आहे. शहरातील अनेक सबवेमध्ये पाणी साचले होते. त्यात कोपरखैरणेमधील सबवेचाही समावेश होता. सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरले होते. फाटा मार्गावर रस्त्यावर मोट्या प्रमाणावर पाणी साचल्याने येथे वाहनांना मार्ग काढता येत नव्हता.

नेरूळ ते सानपाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. बेलापूर आणि ऐरोली भागातील बसडेपोमध्ये पाणी भरले होते. वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी, पाण्यावर तरंगणारी वाहने, एखाद्या नदीसारखे प्रवाहीत झालेले रस्ते हे चित्र पाहिल्यावर ही ‘नवी तुंबई’ ची नांदी तर नव्हे ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मुंबई - बुधवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांना धडकी भरवली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने शीव-पनवेल महामार्गावर कोंडी झाली होती. नवी मुंबईतील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली होती.

नवी मुंबईत दिवसभर कोसळधार

बऱ्याच दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा एंट्री करणाऱ्या पावसाने सकाळपासूनच मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईवर 'धार' धरली आहे. शहरातील अनेक सबवेमध्ये पाणी साचले होते. त्यात कोपरखैरणेमधील सबवेचाही समावेश होता. सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरले होते. फाटा मार्गावर रस्त्यावर मोट्या प्रमाणावर पाणी साचल्याने येथे वाहनांना मार्ग काढता येत नव्हता.

नेरूळ ते सानपाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. बेलापूर आणि ऐरोली भागातील बसडेपोमध्ये पाणी भरले होते. वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी, पाण्यावर तरंगणारी वाहने, एखाद्या नदीसारखे प्रवाहीत झालेले रस्ते हे चित्र पाहिल्यावर ही ‘नवी तुंबई’ ची नांदी तर नव्हे ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

Intro:नवी मुंबई


बातमीला सोबत व्हिडिओ जोडला आहे.


सकाळ पासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांना धडकी भरवली. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली होती; पावसाचं
पाणी रस्त्यावर साचल्याने शीव-पनवेल महामार्गावर कोंडी झाली होती. नवी मुंबईतील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली होती. Body:बऱ्याच दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा एंट्री करणाऱ्या पावसानं सकाळपासून मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईवर 'धार' धरली आहे. शहरातील अनेक सबवेमध्ये पाणी साचले होते. त्यात कोपरखैरणेमधील सब वेचा समावेश होता. सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरले होते. फाटा मार्गावर रस्त्यावर मोट्या प्रमाणावर पाणी साचल्याने येथे वाहनांना मार्ग काढता येत नव्हता. नेरूळ ते सानपाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. बेलापूर आणि ऐरोली भागातील बसडेपोमध्ये पाणी भरले होते.
Conclusion:वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी, पाण्यावर तरंगणारी वाहने, एखाद्या नदीसारखे प्रवाहीत झालेले रस्ते हे चित्र पाहिल्यावर ही ‘नवी तुंबई’ ची नांदी तर नव्हे ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.