ETV Bharat / state

Gopinath Munde Death Anniversary : गोपीनाथ मुंडे यांचा आज 8वा स्मृतीदिन, लालकृष्ण अडवाणींनी केला होता 'लोकनेता' असा उल्लेख

author img

By

Published : Jun 3, 2022, 12:07 AM IST

भाजपा नेते गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde Car Accident ) यांचे दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी निधन झाले. या दुर्घटनेला आठ वर्ष पूर्ण होत ( Gopinath Munde Death Anniversary ) आहेत. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली. असल्याने तळागाळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता, अशी त्यांची ओळख होती. त्यांचा ( दि. 3 जून ) रोजी आठवा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला आढावा.

Gopinath Munde Death Anniversary
Gopinath Munde Death Anniversary

मुंबई - भाजपा नेते गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde Car Accident ) यांचे दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी निधन झाले. या दुर्घटनेला आठ वर्ष पूर्ण होत ( Gopinath Munde Death Anniversary ) आहेत. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली. असल्याने तळागाळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता, अशी त्यांची ओळख होती. त्यांचा ( दि. 3 जून ) रोजी आठवा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला आढावा.

अध्यात्मिक वारसा व शालेय जीवन - गोपीनाथ मुंडे म्हणजे राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ बीड जिल्ह्यातील परळी तालुक्या तील नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी होते. आई आणि वडिलांसोबत मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. त्यामुळे मुंडेंच्या मनावर बालपणापासूनच आध्यात्मिक प्रभाव राहिला. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. १९६९ मध्ये त्यांचे पितृछत्र हपरले; पण आई व थोरले बंधू पंडितअण्णा यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे शालेय जीवनात फार हुशार नव्हते.पण शिक्षणाचं महत्व त्यांनी ओळखलं म्हणून, शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई गाठलं. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली ती महाविद्यालयीन जीवनात. महाविद्यालयात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंडे नेहमी किंग मेकर ठरायचे.

प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे मैत्री - अंबाजोगाईला त्यांची गाठ पडली, ती प्रमोद महाजन यांच्याशी, प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व गुण ओळखले. आणि त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले. मुंडे-महाजन यांचं मैत्रीपर्व महाविद्यालयात सुरू झालं. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ही मैत्री जपली. मुंडे-महाजन जोडीनं महाराष्ट्रात भाजपचे पाय पक्के रोवले. भाजपचा वटवृक्ष केला. महाविद्यालयीन काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचे प्रार्थमिक धडे गिरवले. जनसंघामध्ये असतांना त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची मोट बांधायला सुरुवात केली. जनसंघातून भाजप वेगळा झाला.आणि गोपीनाथ मुंडेंच्या कारकिर्दीनं वेग घ्यायला सुरवात केली.आणिबाणीच्या काळात मुंडेंनी तुरुंगवासही भोगला. आणिबाणीला विरोध करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. आणिबाणीतल्या तुरुंगवासात यशवंत केळकर यांच्यासारख्या कुशल संघटकाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता युवा मोर्चामधून राजकारणात प्रवेश केला. १९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातल्या उजनी गटातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. १९८० मध्ये रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळूण बघितलं नाही.

सभांना गर्दी जमविणारा नेता ते लोकनेता - महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचा चेहरा होते. महाराष्ट्रात एकमेव सभांना गर्दी जमविणारा नेता अशी मुंडेची ओळख होती. मुंडेच्या सभेला सर्वाधिक गर्दी होते हे पक्षाला चांगलेच माहित होते. विशेषतः वंजारी समाज हा गोपिनाथ मुंडेच्या सर्वाधिक जवळचा होता. ४० वर्षांपासुन गोपिनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले होते. सलग ३७ वर्षांपासुन निवडुन येत होते. मुंडेंचे बाळासाहेब ठाकरेंशी युती होण्यापुर्वीपासून २२ वर्ष जुने संबंध होते. गोपिनाथ मुंडे मुळात मराठवाड्यातील होते. त्यांना कोणताही राजकीय वारसा मिळालेला नव्हता. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं करण्याकरीता गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. पुण्यात २०१० साली १२ डिसेंबरला एका समारंभात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपिनाथ मुंडेंचा ’’लोकनेता’’ असा उल्लेख केला होता.

ओबीसी समाजाचे मोठे व झुंजार नेते - या देशातील ओबीसी चळवळीचे गोपीनाथ मुंडे हे मोठे व झुंजार नेते होते. ओबीसींच्या संपूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. मंडल आयोगाने ओबीसींसाठी करून ठेवलेल्या शिफारशींचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भाजपाचे नेते असल्यामुळे मुंडे यांना खुलेपणाने ओबीसी नेते म्हणून भूमिका बजावता येत नव्हती, हे वास्तवही नाकारता येत नाही. भाजपला अधिक व्यापक व मास पार्टी करण्याचे खरे श्रेय गोपीनाथ मुंडे यांना जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जाणीवपूर्वक नोंद करून ठेवलेल्या सोयी सवलती ओबीसींना मिळायलाच पाहिजेत अशी मुंडे यांची धारणा होती. ओबीसींच्या जनगणनेचे महत्त्व महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांना जेवढे पटले होते. तेवढे अन्य कुणालाही पटले नव्हते. म्हणूनच या प्रश्नावर मुंडे यांनी दिल्लीत संसद हलवून सोडली होती. सध्या ओबीसीच्या प्रश्नावरून जे काही राजकारण तापल आहे, त्यावरून राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ हे स्वतः म्हणाले आहेत की जर आज गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसीला फरफकट राहायची गरज नव्हती. यावरून गोपीनाथ मुंडे यांचे ओबीसी समाजाबद्दलचं योगदान समजून येतं.

केंद्रीय मंत्री पदाचा आनंद ठरला औटघटकेचा - मुंडे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिले. राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. हे सर्व करत असताना त्यांना राजकारणात असलेली अनिश्चितता, अपयश, जिवघेणी स्पर्धा याला सामोरे जावे लागले. ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून देखील गोपीनाथ मुंडेंकडे पाहिले जाते. युतीच्या कार्यकाळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला, मुंबईत उड्डाणपुलांचे जाळे निर्माण झाले त्यावेळी मुंडे उपमुख्यमंत्री होते. युतीसरकारचे हे मोठे यश मानले गेले. २०१४ मध्ये मे महिन्यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. परंतु हा आनंद त्यांच्या जीवनाच्या औटघटकेला ठरला. कारण त्यानंतर अवघ्या काही दिवसांमधेच दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी त्यांचे निधन झाले. या दुर्घटनेला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली. असल्याने तळागाळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या मृत्यूपश्चात ही पोकळी कधीही न भरून येण्यासारखी आहे.

हेही वाचा - UPSC Maharashtra Topper : लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार झाले; प्रियंवदा म्हाडदळकर यांची विशेष मुलाखत

मुंबई - भाजपा नेते गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde Car Accident ) यांचे दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी निधन झाले. या दुर्घटनेला आठ वर्ष पूर्ण होत ( Gopinath Munde Death Anniversary ) आहेत. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली. असल्याने तळागाळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता, अशी त्यांची ओळख होती. त्यांचा ( दि. 3 जून ) रोजी आठवा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला आढावा.

अध्यात्मिक वारसा व शालेय जीवन - गोपीनाथ मुंडे म्हणजे राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ बीड जिल्ह्यातील परळी तालुक्या तील नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी होते. आई आणि वडिलांसोबत मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. त्यामुळे मुंडेंच्या मनावर बालपणापासूनच आध्यात्मिक प्रभाव राहिला. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. १९६९ मध्ये त्यांचे पितृछत्र हपरले; पण आई व थोरले बंधू पंडितअण्णा यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे शालेय जीवनात फार हुशार नव्हते.पण शिक्षणाचं महत्व त्यांनी ओळखलं म्हणून, शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई गाठलं. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली ती महाविद्यालयीन जीवनात. महाविद्यालयात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंडे नेहमी किंग मेकर ठरायचे.

प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे मैत्री - अंबाजोगाईला त्यांची गाठ पडली, ती प्रमोद महाजन यांच्याशी, प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व गुण ओळखले. आणि त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले. मुंडे-महाजन यांचं मैत्रीपर्व महाविद्यालयात सुरू झालं. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ही मैत्री जपली. मुंडे-महाजन जोडीनं महाराष्ट्रात भाजपचे पाय पक्के रोवले. भाजपचा वटवृक्ष केला. महाविद्यालयीन काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचे प्रार्थमिक धडे गिरवले. जनसंघामध्ये असतांना त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची मोट बांधायला सुरुवात केली. जनसंघातून भाजप वेगळा झाला.आणि गोपीनाथ मुंडेंच्या कारकिर्दीनं वेग घ्यायला सुरवात केली.आणिबाणीच्या काळात मुंडेंनी तुरुंगवासही भोगला. आणिबाणीला विरोध करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. आणिबाणीतल्या तुरुंगवासात यशवंत केळकर यांच्यासारख्या कुशल संघटकाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता युवा मोर्चामधून राजकारणात प्रवेश केला. १९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातल्या उजनी गटातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. १९८० मध्ये रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळूण बघितलं नाही.

सभांना गर्दी जमविणारा नेता ते लोकनेता - महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचा चेहरा होते. महाराष्ट्रात एकमेव सभांना गर्दी जमविणारा नेता अशी मुंडेची ओळख होती. मुंडेच्या सभेला सर्वाधिक गर्दी होते हे पक्षाला चांगलेच माहित होते. विशेषतः वंजारी समाज हा गोपिनाथ मुंडेच्या सर्वाधिक जवळचा होता. ४० वर्षांपासुन गोपिनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले होते. सलग ३७ वर्षांपासुन निवडुन येत होते. मुंडेंचे बाळासाहेब ठाकरेंशी युती होण्यापुर्वीपासून २२ वर्ष जुने संबंध होते. गोपिनाथ मुंडे मुळात मराठवाड्यातील होते. त्यांना कोणताही राजकीय वारसा मिळालेला नव्हता. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं करण्याकरीता गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. पुण्यात २०१० साली १२ डिसेंबरला एका समारंभात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपिनाथ मुंडेंचा ’’लोकनेता’’ असा उल्लेख केला होता.

ओबीसी समाजाचे मोठे व झुंजार नेते - या देशातील ओबीसी चळवळीचे गोपीनाथ मुंडे हे मोठे व झुंजार नेते होते. ओबीसींच्या संपूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. मंडल आयोगाने ओबीसींसाठी करून ठेवलेल्या शिफारशींचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भाजपाचे नेते असल्यामुळे मुंडे यांना खुलेपणाने ओबीसी नेते म्हणून भूमिका बजावता येत नव्हती, हे वास्तवही नाकारता येत नाही. भाजपला अधिक व्यापक व मास पार्टी करण्याचे खरे श्रेय गोपीनाथ मुंडे यांना जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जाणीवपूर्वक नोंद करून ठेवलेल्या सोयी सवलती ओबीसींना मिळायलाच पाहिजेत अशी मुंडे यांची धारणा होती. ओबीसींच्या जनगणनेचे महत्त्व महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांना जेवढे पटले होते. तेवढे अन्य कुणालाही पटले नव्हते. म्हणूनच या प्रश्नावर मुंडे यांनी दिल्लीत संसद हलवून सोडली होती. सध्या ओबीसीच्या प्रश्नावरून जे काही राजकारण तापल आहे, त्यावरून राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ हे स्वतः म्हणाले आहेत की जर आज गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसीला फरफकट राहायची गरज नव्हती. यावरून गोपीनाथ मुंडे यांचे ओबीसी समाजाबद्दलचं योगदान समजून येतं.

केंद्रीय मंत्री पदाचा आनंद ठरला औटघटकेचा - मुंडे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिले. राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. हे सर्व करत असताना त्यांना राजकारणात असलेली अनिश्चितता, अपयश, जिवघेणी स्पर्धा याला सामोरे जावे लागले. ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून देखील गोपीनाथ मुंडेंकडे पाहिले जाते. युतीच्या कार्यकाळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला, मुंबईत उड्डाणपुलांचे जाळे निर्माण झाले त्यावेळी मुंडे उपमुख्यमंत्री होते. युतीसरकारचे हे मोठे यश मानले गेले. २०१४ मध्ये मे महिन्यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. परंतु हा आनंद त्यांच्या जीवनाच्या औटघटकेला ठरला. कारण त्यानंतर अवघ्या काही दिवसांमधेच दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी त्यांचे निधन झाले. या दुर्घटनेला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली. असल्याने तळागाळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या मृत्यूपश्चात ही पोकळी कधीही न भरून येण्यासारखी आहे.

हेही वाचा - UPSC Maharashtra Topper : लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार झाले; प्रियंवदा म्हाडदळकर यांची विशेष मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.