ETV Bharat / state

...म्हणून मुंबईमधील ४० लसीकरण केंद्र बंद; महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती

author img

By

Published : Apr 20, 2021, 8:07 PM IST

लसीचा साठा कमी असल्याने तसेच खासगी रुग्णालयांनी लसीसाठी लागणारे पैसे भरले नसल्याने खासगी रुग्णालयातील ४० केंद्रांमधील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

fourty vaccination centre closed in mumbai
...म्हणून मुंबईमधील ४० लसीकरण केंद्र बंद; महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती

मुंबई - मुंबईमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या महापालिकेकडे १ लाख १० हजार इतकाच लसीचा साठा आहे. लसीचा साठा कमी असल्याने तसेच खासगी रुग्णालयांनी लसीसाठी लागणारे पैसे भरले नसल्याने खासगी रुग्णालयातील ४० केंद्रांमधील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यासाठी पालिका तयारी करत असून त्यासाठी पालिका लसीकरण केंद्र वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रतिक्रिया

म्हणून लसीकरण बंद -

मुंबईमध्ये लसीचा तुटवडा सुरु असल्याने काही लसीकरण केंद्र बंद आहेत. याबाबत बोलताना काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना महापालिकेकडे २१ लाख ५० हजार लसींचा साठा आला होता. त्यापैकी २० लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे पालिकेकडे १ लाख १० हजार लसींचा साठा आहे. हा साठा आजचा दिवस पुरेल इतकाच आहे. यामुळे ज्या ठिकाणी लसीकरणाला गर्दी होत आहे, अशा ठिकाणीच लस देण्यात आली आहे. आज रात्री लसीचा साठा येणार आहे. हा साठा आल्यावर सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरळीत सुरु होईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

पालिकेची तयारी -

केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. मुंबईत १८ वर्षावरील ८० लाख नागरिक आहेत. या लाखो नागरिकांना लस देण्यासाठी पालिका तयारी करत आहे. सध्या मुंबईत पालिकेची ४० व खासगी ७० तसेच राज्य व केंद्र सरकारची रुग्णालये, अशी एकूण १२० केंद्रे आहेत. पालिकेची ४० केंद्र वाढवून १०० पर्यंत ही संख्या वाढवली जाणार आहे. खासगी आस्थापना ज्यात जास्त संख्येने कामगार आहेत, अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम विभागात लसीकरण केंद्र उभारली जातील, असे काकाणी म्हणाले.

लसीसाठी प्रयत्न -

मुंबईत लसीकरणादरम्यान लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र ५० टक्के, तर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन लसीचा ५० टक्के साठा विकत घेऊ शकतात. यानुसार पालिका लस खरेदी करण्याचा विचार करत असल्याचेही असेही काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - निर्बंध लावल्याने किती फायदा होतो याचा सरकारने विचार करावा - फडणवीस

मुंबई - मुंबईमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या महापालिकेकडे १ लाख १० हजार इतकाच लसीचा साठा आहे. लसीचा साठा कमी असल्याने तसेच खासगी रुग्णालयांनी लसीसाठी लागणारे पैसे भरले नसल्याने खासगी रुग्णालयातील ४० केंद्रांमधील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यासाठी पालिका तयारी करत असून त्यासाठी पालिका लसीकरण केंद्र वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रतिक्रिया

म्हणून लसीकरण बंद -

मुंबईमध्ये लसीचा तुटवडा सुरु असल्याने काही लसीकरण केंद्र बंद आहेत. याबाबत बोलताना काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना महापालिकेकडे २१ लाख ५० हजार लसींचा साठा आला होता. त्यापैकी २० लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे पालिकेकडे १ लाख १० हजार लसींचा साठा आहे. हा साठा आजचा दिवस पुरेल इतकाच आहे. यामुळे ज्या ठिकाणी लसीकरणाला गर्दी होत आहे, अशा ठिकाणीच लस देण्यात आली आहे. आज रात्री लसीचा साठा येणार आहे. हा साठा आल्यावर सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरळीत सुरु होईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

पालिकेची तयारी -

केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. मुंबईत १८ वर्षावरील ८० लाख नागरिक आहेत. या लाखो नागरिकांना लस देण्यासाठी पालिका तयारी करत आहे. सध्या मुंबईत पालिकेची ४० व खासगी ७० तसेच राज्य व केंद्र सरकारची रुग्णालये, अशी एकूण १२० केंद्रे आहेत. पालिकेची ४० केंद्र वाढवून १०० पर्यंत ही संख्या वाढवली जाणार आहे. खासगी आस्थापना ज्यात जास्त संख्येने कामगार आहेत, अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम विभागात लसीकरण केंद्र उभारली जातील, असे काकाणी म्हणाले.

लसीसाठी प्रयत्न -

मुंबईत लसीकरणादरम्यान लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र ५० टक्के, तर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन लसीचा ५० टक्के साठा विकत घेऊ शकतात. यानुसार पालिका लस खरेदी करण्याचा विचार करत असल्याचेही असेही काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - निर्बंध लावल्याने किती फायदा होतो याचा सरकारने विचार करावा - फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.