ETV Bharat / state

पूरस्थिती हळूहळू कमी, अलमट्टी, कोयनासह राधानगरीतून विसर्ग सुरुच

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख ३० हजार, कोयनेतून ५३ हजार ८८२, तर राधानगरी धरणातून ४ हजार २५६ क्युसेकने विसर्ग सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

author img

By

Published : Aug 11, 2019, 7:03 PM IST

मुख्यमंत्री

मुंबई - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख ३० हजार, कोयनेतून ५३ हजार ८८२, तर राधानगरी धरणातून ४ हजार २५६ क्युसेकने विसर्ग सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आत्तापर्यंत कोल्हापूरमधील शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर केले असून, अद्यापही महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अलमट्टी, राधानगरी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हळूहळू पूर ओसरत आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे. आज पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी ५० फुट ११ इंच होती. एकून १०४ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती पूर नियत्रंण कक्षाचे समन्वय अधिकारी एस एम शिंदे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३२.४६ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा

धरण क्षमता

  • १) कोयना - १०३ टीएमसी १०५ टीएमसी
  • २) धोम - १२.३० टीएमसी १३.५० टीएमसी-
  • ३) कन्हेर - ९.१२ टीएमसी १०,१० टीएमसी
  • ४) दूधगंगा - २३.५३ टीएमसी २४.४० टीएमसी
  • ५) राधानगरी - ८.२६ टीएमसी ८.३६ टीएमसी
  • ६) अलमट्टी - ८८.७६ टीएमसी १२३ टीएमसी

मुंबई - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख ३० हजार, कोयनेतून ५३ हजार ८८२, तर राधानगरी धरणातून ४ हजार २५६ क्युसेकने विसर्ग सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आत्तापर्यंत कोल्हापूरमधील शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर केले असून, अद्यापही महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अलमट्टी, राधानगरी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हळूहळू पूर ओसरत आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे. आज पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी ५० फुट ११ इंच होती. एकून १०४ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती पूर नियत्रंण कक्षाचे समन्वय अधिकारी एस एम शिंदे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३२.४६ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा

धरण क्षमता

  • १) कोयना - १०३ टीएमसी १०५ टीएमसी
  • २) धोम - १२.३० टीएमसी १३.५० टीएमसी-
  • ३) कन्हेर - ९.१२ टीएमसी १०,१० टीएमसी
  • ४) दूधगंगा - २३.५३ टीएमसी २४.४० टीएमसी
  • ५) राधानगरी - ८.२६ टीएमसी ८.३६ टीएमसी
  • ६) अलमट्टी - ८८.७६ टीएमसी १२३ टीएमसी
Intro:Body:

state


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.