ETV Bharat / state

शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'? ज्यामुळे घाबरतंय भाजप ?

author img

By

Published : Sep 25, 2019, 11:27 AM IST

" मी आत्तापर्यंत कधीच तुरूंगात गेलो नाही, हे सरकार मला जेलमध्ये टाकणार असेल तर त्याचा मला आनंदच होईल. हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे. त्यांचे हेच वक्तव्य त्यांच्या विरोधात ईडीने कारवाई करण्यास कारणीभूत ठरल्याचे आता राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.

शरद पवार

मुंबई - " मी आत्तापर्यंत कधीच तुरूंगात गेलो नाही, हे सरकार मला जेलमध्ये टाकणार असेल तर त्याचा मला आनंदच होईल. हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे. त्यांचे हेच वक्तव्य त्यांच्या विरोधात ईडीने कारवाई करण्यास कारणीभूत ठरल्याचे आता राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. याआधी ईडीनेच छगन भुजबळ, राज ठाकरे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना हैराण केले आहे. तीच रणनिती आता पवारांविरोधात वापरली जात आहे का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चीले जात आहे.

शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'?

हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार

भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर या सरकारवर विरोधकांना आणि स्वाय्यत संस्थांना संपवण्याचा आरोप होतो. ईडी सीबीआयचा वापर विरोधकांवर आकसाने केला जातोय. ईडीची भिती दाखवून विरोधकांना भाजपमध्ये घेतल्याची अनेक उदाहरणे दिसतात. त्यातूनच हे आरोप होत आहेत. त्यात आता थेट शरद पवारांवर ईडी अस्र उगारले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनीही भाजपची पोलखोल केली होती. त्यानंतर त्यांच्या मागे ईडीची पिडा लावण्यात आली. अर्थ व्यवस्थेवरूनही काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या नाकी दम आणला होता. तेही सध्या तुरूंगात आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यातूनच पवारांना लक्ष्य केले जात नाही ना अशी शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कारवाई करायची होती तर गेली पाच वर्षात कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही ? निवडणूकीच्या तोंडावरच अशी कारवाई करण्याचे नक्की कारण काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विरोधकांना संपवण्याचा डाव ?

राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. काँग्रेसमध्ये लढा देईल असा एकही नेता सध्या तरी राज्यात नाही. शरद पवार या वयातही भाजपला टक्कर देत आहे. त्यामुळे मुळावरच घाव घातला तर झाड पडेल, या रणनितीनुसार ही कारवाई केली गेल्याची शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने एकापाठोपाठ धक्के दिले. मातब्बर नेते पवारांना सोडून गेले. शरद पवारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने पूर्ण ताकदीने केला. पण, नमतील ते शरद पवार कसले. त्यांनी तेवढ्या जिद्दीने आणि ताकदीने मैदानात उडी घेतली. एखाद्या चवताळलेल्या वाघाप्रमाणे त्यांनी भाजपवर तुटून पडले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. गेले त्यांचा विचार न करता तरुणांना त्यांनी आपलेसे केलं. त्यांचे गेल्या आठवड्यात राज्यात झालेले झंझावाती दौरे आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता हेच तर त्यांच्यावरील कारवाईचे निमित्त ठरले नसावे ना अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

खरोखरच भाजपला भिती वाटते का?

राष्ट्रवादीचे एकापेक्षा एक शिलेदार भाजपने आपल्या गळाला लावले. त्यातून राष्ट्रवादी आणि पवार नामोहरम होतील अशी भाजपची रणनिती होती. मात्र, त्यातूनही पवारांनी जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. पायाला भिंगरी लावून त्यांनी राज्याचा दौरा केला. वयाच्या ८० वर्षातील त्यांचा हा उत्साह तरूणालाही लाजवणार आहे. त्यांनी एकामागून एक सभा घेत भाजपलाच दणके द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांत विशेषता: तरूणात उत्साह निर्माण केला. राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण केले.

हेही वाचा - अजित पवारांसह अन्य नेत्यांवर ईडीची कारवाई कायदेशीरच - माधव भांडारी

" लबाडांच्या सरकारला घरात बसवण्यासाठी मी पायाला भिंगरी बांधून घराबाहेर पडलोय, आता त्यांना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही". इथून पवारांनी जोरदार सुरूवात केली. ते त्यानंतर कुठेच थांबले नाहीत. जे मला सोडून गेले ते पुन्हा विधानसभेत कधीच दिसले नाही पाहिजे, असं वक्तव्य करून त्यांनी सोडून गेलेल्यांमध्ये पून्हा एकदा खळबळ उडवून दिली. सरकार आपलंच येणार हा आत्मविश्वास आणि लढण्याची ताकद मरगळ आलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी पहिल्याच टप्प्यात दिली. इथेच पाल शिंकली असावी असेही काही राजकीय विश्लेषक सांगतात.

भाजप एकीकडे कश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना पवारांनी त्यांना ही निवडणूक महाराष्ट्राची आहे याची आठवण करून दिली. शिवाय शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे विषय जोरदारपणे जनते पुढे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत असताना त्यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात पुरस्थिती आहे आणि मुख्यमंत्री यात्रांमध्ये दंग आहेत. हे सांगताना त्यांनी लातूर भूकंपात आपण कसे का केले हे सांगायला ते विसरले नाहीत. शिवाय बालाकोट सारखा प्रकार विधानसभा निवडणूत झाला नाही तर राज्यात सत्ता परिवर्तन नक्कीच होईल हे त्यांनी औरंगाबादमध्ये ठाम पणे सांगितले. २० तास काम करेन पण चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता जावू देणार नाही असा पणही त्यांनी केला.या सर्व घडामोडीमुळेच कारवाई केली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा - पवारांवर ईडीच्या कारवाईचे बारामतीत पडसाद, कडकडीत बंद

शरद पवार गेली ५२ वर्ष राजकीय जिवानात आहे. आमदार, मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, कृषीमंत्री यासारखी मोठी पदे त्यांनी भूषवली. शिवाय मोदी शाह शरद पवारांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यांनी तर ते जाहीर पणे मान्य केले आहे. देशाच्या राजकारणात सध्याच्या घडीला पवारां येवढा अनुभव असलेला नेता कोणी नाही. हे भाजपचे सर्वच नेते जाणून आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ते पवारां बरोबर जुळवून घेताना दिसत आहे. शिवाय २०१४ ला राज्यात भाजपचे सरकार अडचणीत होते तेंव्हा पवारांचीन त्यांना मदत केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. हे संदर्भ विसरता कामा नयेत.

मुंबई - " मी आत्तापर्यंत कधीच तुरूंगात गेलो नाही, हे सरकार मला जेलमध्ये टाकणार असेल तर त्याचा मला आनंदच होईल. हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे. त्यांचे हेच वक्तव्य त्यांच्या विरोधात ईडीने कारवाई करण्यास कारणीभूत ठरल्याचे आता राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. याआधी ईडीनेच छगन भुजबळ, राज ठाकरे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना हैराण केले आहे. तीच रणनिती आता पवारांविरोधात वापरली जात आहे का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चीले जात आहे.

शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'?

हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार

भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर या सरकारवर विरोधकांना आणि स्वाय्यत संस्थांना संपवण्याचा आरोप होतो. ईडी सीबीआयचा वापर विरोधकांवर आकसाने केला जातोय. ईडीची भिती दाखवून विरोधकांना भाजपमध्ये घेतल्याची अनेक उदाहरणे दिसतात. त्यातूनच हे आरोप होत आहेत. त्यात आता थेट शरद पवारांवर ईडी अस्र उगारले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनीही भाजपची पोलखोल केली होती. त्यानंतर त्यांच्या मागे ईडीची पिडा लावण्यात आली. अर्थ व्यवस्थेवरूनही काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या नाकी दम आणला होता. तेही सध्या तुरूंगात आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यातूनच पवारांना लक्ष्य केले जात नाही ना अशी शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कारवाई करायची होती तर गेली पाच वर्षात कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही ? निवडणूकीच्या तोंडावरच अशी कारवाई करण्याचे नक्की कारण काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विरोधकांना संपवण्याचा डाव ?

राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. काँग्रेसमध्ये लढा देईल असा एकही नेता सध्या तरी राज्यात नाही. शरद पवार या वयातही भाजपला टक्कर देत आहे. त्यामुळे मुळावरच घाव घातला तर झाड पडेल, या रणनितीनुसार ही कारवाई केली गेल्याची शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने एकापाठोपाठ धक्के दिले. मातब्बर नेते पवारांना सोडून गेले. शरद पवारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने पूर्ण ताकदीने केला. पण, नमतील ते शरद पवार कसले. त्यांनी तेवढ्या जिद्दीने आणि ताकदीने मैदानात उडी घेतली. एखाद्या चवताळलेल्या वाघाप्रमाणे त्यांनी भाजपवर तुटून पडले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. गेले त्यांचा विचार न करता तरुणांना त्यांनी आपलेसे केलं. त्यांचे गेल्या आठवड्यात राज्यात झालेले झंझावाती दौरे आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता हेच तर त्यांच्यावरील कारवाईचे निमित्त ठरले नसावे ना अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

खरोखरच भाजपला भिती वाटते का?

राष्ट्रवादीचे एकापेक्षा एक शिलेदार भाजपने आपल्या गळाला लावले. त्यातून राष्ट्रवादी आणि पवार नामोहरम होतील अशी भाजपची रणनिती होती. मात्र, त्यातूनही पवारांनी जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. पायाला भिंगरी लावून त्यांनी राज्याचा दौरा केला. वयाच्या ८० वर्षातील त्यांचा हा उत्साह तरूणालाही लाजवणार आहे. त्यांनी एकामागून एक सभा घेत भाजपलाच दणके द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांत विशेषता: तरूणात उत्साह निर्माण केला. राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण केले.

हेही वाचा - अजित पवारांसह अन्य नेत्यांवर ईडीची कारवाई कायदेशीरच - माधव भांडारी

" लबाडांच्या सरकारला घरात बसवण्यासाठी मी पायाला भिंगरी बांधून घराबाहेर पडलोय, आता त्यांना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही". इथून पवारांनी जोरदार सुरूवात केली. ते त्यानंतर कुठेच थांबले नाहीत. जे मला सोडून गेले ते पुन्हा विधानसभेत कधीच दिसले नाही पाहिजे, असं वक्तव्य करून त्यांनी सोडून गेलेल्यांमध्ये पून्हा एकदा खळबळ उडवून दिली. सरकार आपलंच येणार हा आत्मविश्वास आणि लढण्याची ताकद मरगळ आलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी पहिल्याच टप्प्यात दिली. इथेच पाल शिंकली असावी असेही काही राजकीय विश्लेषक सांगतात.

भाजप एकीकडे कश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना पवारांनी त्यांना ही निवडणूक महाराष्ट्राची आहे याची आठवण करून दिली. शिवाय शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे विषय जोरदारपणे जनते पुढे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत असताना त्यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात पुरस्थिती आहे आणि मुख्यमंत्री यात्रांमध्ये दंग आहेत. हे सांगताना त्यांनी लातूर भूकंपात आपण कसे का केले हे सांगायला ते विसरले नाहीत. शिवाय बालाकोट सारखा प्रकार विधानसभा निवडणूत झाला नाही तर राज्यात सत्ता परिवर्तन नक्कीच होईल हे त्यांनी औरंगाबादमध्ये ठाम पणे सांगितले. २० तास काम करेन पण चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता जावू देणार नाही असा पणही त्यांनी केला.या सर्व घडामोडीमुळेच कारवाई केली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा - पवारांवर ईडीच्या कारवाईचे बारामतीत पडसाद, कडकडीत बंद

शरद पवार गेली ५२ वर्ष राजकीय जिवानात आहे. आमदार, मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, कृषीमंत्री यासारखी मोठी पदे त्यांनी भूषवली. शिवाय मोदी शाह शरद पवारांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यांनी तर ते जाहीर पणे मान्य केले आहे. देशाच्या राजकारणात सध्याच्या घडीला पवारां येवढा अनुभव असलेला नेता कोणी नाही. हे भाजपचे सर्वच नेते जाणून आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ते पवारां बरोबर जुळवून घेताना दिसत आहे. शिवाय २०१४ ला राज्यात भाजपचे सरकार अडचणीत होते तेंव्हा पवारांचीन त्यांना मदत केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. हे संदर्भ विसरता कामा नयेत.

Intro:Body:

मुंबई - " मी आत्तापर्यंत कधीच तुरूंगात गेलो नाही, हे सरकार मला जेलमध्ये टाकणार असेल तर त्याचा मला आनंदच होईल. हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे. त्यांचे हेच वक्तव्य त्यांच्या विरोधात ईडीने कारवाई करण्यास कारणीभूत ठरल्याचे आता राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. याआधी ईडीनेच छगन भुजबळ, राज ठाकरे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना हैराण केले आहे. तीच रणनिती आता पवारांविरोधात वापरली जात आहे का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चीले जात आहे.  

भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर या सरकारवर  विरोधकांना आणि स्वाय्यत संस्थांना संपवण्याचा आरोप होतो. ईडी सीबीआयचा वापर विरोधकांवर आकसाने केला जातोय. ईडीची भिती दाखवून विरोधकांना भाजपमध्ये घेतल्याची अनेक उदाहरणे दिसतात. त्यातूनच  हे आरोप होत आहेत. त्यात आता थेट शरद पवारांवर ईडी अस्र उगारले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनीही भाजपची पोलखोल केली होती. त्यानंतर त्यांच्या मागे ईडीची पिडा लावण्यात आली. अर्थ व्यवस्थेवरूनही काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या नाकी दम आणला होता. तेही सध्या तुरूंगात आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यातूनच पवारांना लक्ष्य केले जात नाही ना अशी शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कारवाई करायची होती तर गेली पाच वर्षात कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही ?  निवडणूकीच्या तोंडावरच अशी कारवाई करण्याचे नक्की कारण काय ?  असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

विरोधकांना संपवण्याचा डाव ? 

राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. काँग्रेसमध्ये लढा देईल असा एकही नेता सध्या तरी राज्यात नाही. शरद पवार या वयातही भाजपला टक्कर देत आहे. त्यामुळे मुळावरच घाव घातला तर झाड पडेल, या रणनितीनुसार ही कारवाई केली गेल्याची शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने एकापाठोपाठ धक्के दिले. मातब्बर नेते  पवारांना सोडून गेले.  शरद पवारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने पूर्ण ताकदीने केला. पण, नमतील ते शरद पवार कसले. त्यांनी तेवढ्या जिद्दीने आणि ताकदीने  मैदानात उडी घेतली. एखाद्या चवताळलेल्या वाघाप्रमाणे त्यांनी भाजपवर तुटून पडले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. गेले त्यांचा विचार न करता तरुणांना त्यांनी आपलेसे केलं. त्यांचे गेल्या आठवड्यात राज्यात झालेले झंझावाती दौरे आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता हेच तर त्यांच्यावरील कारवाईचे निमित्त ठरले नसावे ना अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

खरोखरच भाजपला भिती वाटते का? 

राष्ट्रवादीचे एकापेक्षा एक शिलेदार भाजपने आपल्या गळाला लावले. त्यातून राष्ट्रवादी आणि पवार नामोहरम होतील अशी भाजपची रणनिती होती. मात्र, त्यातूनही पवारांनी जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. पायाला भिंगरी लावून त्यांनी राज्याचा दौरा केला. वयाच्या ८० वर्षातील त्यांचा हा उत्साह तरूणालाही लाजवणार आहे. त्यांनी एकामागून एक सभा घेत भाजपलाच दणके द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांत विशेषता: तरूणात उत्साह निर्माण केला. राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण केले. 

" लबाडांच्या सरकारला घरात बसवण्यासाठी मी पायाला भिंगरी बांधून घराबाहेर पडलोय, आता त्यांना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही".  इथून पवारांनी जोरदार सुरूवात केली. ते त्यानंतर कुठेच थांबले नाहीत. जे मला सोडून गेले ते पुन्हा विधानसभेत कधीच दिसले नाही पाहिजे, असं वक्तव्य करून त्यांनी सोडून गेलेल्यांमध्ये पून्हा एकदा खळबळ उडवून दिली. सरकार आपलंच येणार हा आत्मविश्वास आणि लढण्याची ताकद मरगळ आलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी पहिल्याच टप्प्यात दिली. इथेच पाल शिंकली असावी असेही काही राजकीय विश्लेषक सांगतात. 

भाजप एकीकडे कश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना पवारांनी त्यांना ही निवडणूक महाराष्ट्राची आहे याची आठवण करून दिली. शिवाय शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे विषय जोरदारपणे जनते पुढे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत असताना त्यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात पुरस्थिती आहे आणि मुख्यमंत्री यात्रांमध्ये दंग आहेत. हे सांगताना त्यांनी लातूर भूकंपात आपण कसे का केले हे सांगायला ते विसरले नाहीत. शिवाय बालाकोट सारखा प्रकार विधानसभा निवडणूत झाला नाही तर राज्यात सत्ता परिवर्तन नक्कीच होईल हे त्यांनी औरंगाबादमध्ये ठाम पणे सांगितले. २० तास काम करेन पण चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता जावू देणार नाही असा पणही त्यांनी केला.या सर्व घडामोडीमुळेच कारवाई केली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.   

शरद पवार गेली ५२ वर्ष राजकीय जिवानात आहे. आमदार, मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, कृषीमंत्री यासारखी मोठी पदे त्यांनी भूषवली. शिवाय मोदी शाह  शरद पवारांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यांनी तर ते जाहीर पणे मान्य केले आहे. देशाच्या राजकारणात सध्याच्या घडीला पवारां येवढा अनुभव असलेला नेता कोणी नाही. हे भाजपचे सर्वच नेते जाणून आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ते पवारां बरोबर जुळवून घेताना दिसत आहे. शिवाय २०१४ ला राज्यात भाजपचे सरकार अडचणीत होते तेंव्हा पवारांचीन त्यांना मदत केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. हे संदर्भ विसरता कामा नयेत.  

 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.